शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

जिल्ह्यातील २४६ शाळांमध्ये रुजला ‘ज्ञान रचनावाद’

By admin | Updated: February 17, 2016 00:08 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षण विभागाने स्वीकारलेला ...

कृतीतून शिक्षण : कागद, फरशीवर स्वयंअध्ययन, हजार शाळांचे लक्ष्य प्रदीप भाकरे अमरावतीप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षण विभागाने स्वीकारलेला ‘ज्ञान रचनावाद’ जिल्ह्यातील २४६ शाळांमध्ये रुजला आहे. जिल्ह्यातील २ हजारांहून अधिक शाळांमधून या शाळा ‘मानरचनावादी’ या व्याख्येत आल्या आहेत. या शाळांमध्ये हसत, खेळत स्वयंअध्ययनावर भर दिला जात आहे. राज्यात २२ जून २०१५ अन्वये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेमध्ये सुधारणा करण्यासाठी यात ज्ञान रचनावादाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. विविध साहित्यातून मुलांना आकलन व्हावे, त्यासाठी या शाळांमध्ये साहित्य निर्मिती करण्यात आली. बनावट नोटा, पुष्ठे, फरक, चित्रतक्ता, कार्ड, काड्यांचे गठ्ठे याचा यात समावेश आहे. वाचन, आकलन, लेखन व उपयोजन यात एकही मूल अप्रगत राहणार नाही, असा हेतू आहे. राज्यात मिरज आणि कुमठे येथे ज्ञान रचनावादास धरुन बहुवर्ग/ बहुस्तर अध्ययन करण्याचे उत्कृष्ट उदाहरणे आहेत. अशाठिकाणी एकही अप्रगत विद्यार्थी नाही. त्याचप्रमाणे प्रगत विद्यार्थीसुद्धा अधिक प्रगती करीत आहेत. तीच पद्धत जिल्ह्यातील २४६ शाळांनी अंगीकारली आहे. रचनावादी शाळेत काय?शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये फरशीवर बसून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाला प्रेरित करतो. अंकाचे स्थान समजून देण्यासाठी शिक्षक काड्यांचे गठ्ठे, मणी, माळा, याशिवाय एक, दहा, शंभर, पाचसे व एक हजारांच्या खोट्या नोटा जमवून अथवा मुलांच्या मदतीने कार्डावर लिहून संख्या तयार करतात. जमिनीवरील फरशीवर किंवा पाटीवर आखलेल्या कोष्टकांमध्ये ती मांडणे व त्यानुसार संख्या अंकात लिहिणे, असे हे संस्करण आहे. विद्यार्थ्यांची भाषा आणि गणित या दोन्ही विषयांची समज वाढविण्यासाठी ‘मुलगा स्वत: शिकू शकतो, ज्ञानाची निर्मिती करू शकतो, या संकल्पेवर आधारित साहित्य निर्मिती या शाळांमध्ये करण्यात आली आहे. २४६ शाळा ज्ञान रचनावादी झाल्या असून जवळपास एक हजार शाळांचे डायरने उद्दिष्ट ठेवले आहे. सांस्कृतिक भवनात आज कार्यशाळा जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा प्रगत व्हाव्यात, ज्ञान रचनावाद वृद्धींगत व्हावा, यासाठी १७ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता कार्यशाळा होणार आहे. यात डायटच्या प्राचार्यांसह, शिक्षक, पर्यवेक्षीय यंत्रणा, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि शिक्षण उपसंचालक येणार आहेत. यात कल्पक प्रयोग साकारणाऱ्या शिक्षकांचा सत्कार होत असून मिरजचे गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी आणि कुमठे बिटच्या विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांचे मार्गदर्शन होणार आहे. वर्गरचना बदलली ज्ञान रचनावाद ही पद्धत अंगिकारलेल्या शाळांमध्ये वर्गरचनाच बदलली आहे. डेस्क बेंचच्याऐवजी जमिनीवर बसवून गटपद्धतीने मुलांना स्वत: आकलन होईल त्या पद्धतीने साहित्य निर्मिती करण्यात आली आहे. मुले स्वत: शिकतात चांगला संस्कार मुले स्वत:वर करुन घेतात. कुणी मोठ्यांना न सांगता एकत्र येतात. नियोजन करतात. नेतृत्व करतात. कामाची वाटणी करतात. सहकार्याने वागतात. वाद-विवाद करतात. गट्टी-फू म्हणतात. ‘सुटली’ म्हणून लगेच गळ्यात गळे घालतात. स्वत:च निर्मिती करतात. या प्रकारे या शाळा ‘अ‍ॅक्टिव्हिटी बेस’ झाल्या आहेत. भाषा आणि गणित अभ्यासक्रमावर आधारित साहित्यनिर्मिती करण्यात आली. चिखलदऱ्यात १९ शाळा रचनावादी कोरकू भाषिक व आदिवासीबहुल चिखलदरा तालुक्यातील १९ शाळा रचनावादी झाल्या आहेत. हसत-खेळत आणि साहित्यातून मुलांना शिक्षण दिले जात आहे. शिक्षकही मुलांसमवेत फरशीवर बसून या आनंददायी शिक्षणात भूमिका बजावतो आहे. इयत्तानिहाय साहित्याचा वापर इयत्तानिहाय साहित्य वापरल्यास संकल्पना स्पष्ट होतात. ही यामागील भूमिका आहे. ज्ञान रचनावादी शाळा घडविण्यासाठी जानेवारीत साहित्यनिर्मिती कार्यशाळा घेण्यात आल्यात.