शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २४६ शाळांमध्ये रुजला ‘ज्ञान रचनावाद’

By admin | Updated: February 17, 2016 00:08 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षण विभागाने स्वीकारलेला ...

कृतीतून शिक्षण : कागद, फरशीवर स्वयंअध्ययन, हजार शाळांचे लक्ष्य प्रदीप भाकरे अमरावतीप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षण विभागाने स्वीकारलेला ‘ज्ञान रचनावाद’ जिल्ह्यातील २४६ शाळांमध्ये रुजला आहे. जिल्ह्यातील २ हजारांहून अधिक शाळांमधून या शाळा ‘मानरचनावादी’ या व्याख्येत आल्या आहेत. या शाळांमध्ये हसत, खेळत स्वयंअध्ययनावर भर दिला जात आहे. राज्यात २२ जून २०१५ अन्वये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेमध्ये सुधारणा करण्यासाठी यात ज्ञान रचनावादाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. विविध साहित्यातून मुलांना आकलन व्हावे, त्यासाठी या शाळांमध्ये साहित्य निर्मिती करण्यात आली. बनावट नोटा, पुष्ठे, फरक, चित्रतक्ता, कार्ड, काड्यांचे गठ्ठे याचा यात समावेश आहे. वाचन, आकलन, लेखन व उपयोजन यात एकही मूल अप्रगत राहणार नाही, असा हेतू आहे. राज्यात मिरज आणि कुमठे येथे ज्ञान रचनावादास धरुन बहुवर्ग/ बहुस्तर अध्ययन करण्याचे उत्कृष्ट उदाहरणे आहेत. अशाठिकाणी एकही अप्रगत विद्यार्थी नाही. त्याचप्रमाणे प्रगत विद्यार्थीसुद्धा अधिक प्रगती करीत आहेत. तीच पद्धत जिल्ह्यातील २४६ शाळांनी अंगीकारली आहे. रचनावादी शाळेत काय?शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये फरशीवर बसून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाला प्रेरित करतो. अंकाचे स्थान समजून देण्यासाठी शिक्षक काड्यांचे गठ्ठे, मणी, माळा, याशिवाय एक, दहा, शंभर, पाचसे व एक हजारांच्या खोट्या नोटा जमवून अथवा मुलांच्या मदतीने कार्डावर लिहून संख्या तयार करतात. जमिनीवरील फरशीवर किंवा पाटीवर आखलेल्या कोष्टकांमध्ये ती मांडणे व त्यानुसार संख्या अंकात लिहिणे, असे हे संस्करण आहे. विद्यार्थ्यांची भाषा आणि गणित या दोन्ही विषयांची समज वाढविण्यासाठी ‘मुलगा स्वत: शिकू शकतो, ज्ञानाची निर्मिती करू शकतो, या संकल्पेवर आधारित साहित्य निर्मिती या शाळांमध्ये करण्यात आली आहे. २४६ शाळा ज्ञान रचनावादी झाल्या असून जवळपास एक हजार शाळांचे डायरने उद्दिष्ट ठेवले आहे. सांस्कृतिक भवनात आज कार्यशाळा जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा प्रगत व्हाव्यात, ज्ञान रचनावाद वृद्धींगत व्हावा, यासाठी १७ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता कार्यशाळा होणार आहे. यात डायटच्या प्राचार्यांसह, शिक्षक, पर्यवेक्षीय यंत्रणा, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि शिक्षण उपसंचालक येणार आहेत. यात कल्पक प्रयोग साकारणाऱ्या शिक्षकांचा सत्कार होत असून मिरजचे गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी आणि कुमठे बिटच्या विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांचे मार्गदर्शन होणार आहे. वर्गरचना बदलली ज्ञान रचनावाद ही पद्धत अंगिकारलेल्या शाळांमध्ये वर्गरचनाच बदलली आहे. डेस्क बेंचच्याऐवजी जमिनीवर बसवून गटपद्धतीने मुलांना स्वत: आकलन होईल त्या पद्धतीने साहित्य निर्मिती करण्यात आली आहे. मुले स्वत: शिकतात चांगला संस्कार मुले स्वत:वर करुन घेतात. कुणी मोठ्यांना न सांगता एकत्र येतात. नियोजन करतात. नेतृत्व करतात. कामाची वाटणी करतात. सहकार्याने वागतात. वाद-विवाद करतात. गट्टी-फू म्हणतात. ‘सुटली’ म्हणून लगेच गळ्यात गळे घालतात. स्वत:च निर्मिती करतात. या प्रकारे या शाळा ‘अ‍ॅक्टिव्हिटी बेस’ झाल्या आहेत. भाषा आणि गणित अभ्यासक्रमावर आधारित साहित्यनिर्मिती करण्यात आली. चिखलदऱ्यात १९ शाळा रचनावादी कोरकू भाषिक व आदिवासीबहुल चिखलदरा तालुक्यातील १९ शाळा रचनावादी झाल्या आहेत. हसत-खेळत आणि साहित्यातून मुलांना शिक्षण दिले जात आहे. शिक्षकही मुलांसमवेत फरशीवर बसून या आनंददायी शिक्षणात भूमिका बजावतो आहे. इयत्तानिहाय साहित्याचा वापर इयत्तानिहाय साहित्य वापरल्यास संकल्पना स्पष्ट होतात. ही यामागील भूमिका आहे. ज्ञान रचनावादी शाळा घडविण्यासाठी जानेवारीत साहित्यनिर्मिती कार्यशाळा घेण्यात आल्यात.