शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
2
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
3
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
4
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
5
"कृपया, माझे पैसे द्या...", तान्या मित्तलने ८०० साड्यांचं पेमेंट बुडवलं? स्टायलिस्टचा गंभीर आरोप
6
TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर
7
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
8
'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
9
डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती
10
करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
11
Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट
13
नवीन कामगार कायद्यांमुळे हातात येणारा पगार खरंच कमी होणार?; कामगार मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा, सगळं गणित समजावलं
14
रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या पगारात होणार मोठी घट; शुभमन गिलला मिळणार 'बंपर फायदा'?
15
पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ
16
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
17
Western Overseas Study Abroad IPO: पहिल्याच दिवशी IPO नं दिला झटका, आपटून ५२ रुपयांवर आला; लागलं लोअर सर्किट
18
Travel : दुबई स्वप्ननगरी! किती खर्चात होईल ५ दिवसांची शाही सफर; वाचा संपूर्ण बजेट आणि जाणून घ्या व्हिसाबद्दल..
19
Relationship Tips: बायकोला खुश कसे ठेवावे? प्रेमानंद महाराज म्हणाले, 'मी यात तज्ज्ञ नाही पण...'
20
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील २४ पाड्यांमध्ये आजही काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 11:31 IST

जन्मलो तेव्हा वाटलं, आपले पूर्वज अंधारात जन्मले. निदान आपली मुलं-बाळं तरी जन्म घेतील तेव्हा गावात वीज आलेली असेल. मात्र, ते काही प्रत्यक्षात उतरले नाही.

ठळक मुद्देव्यथा शापित मेळघाटचीआदिवासींच्या पिढ्यांच्या नशिबी अंधार

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : जन्मलो तेव्हा वाटलं, आपले पूर्वज अंधारात जन्मले. निदान आपली मुलं-बाळं तरी जन्म घेतील तेव्हा गावात वीज आलेली असेल. मात्र, ते काही प्रत्यक्षात उतरले नाही. नातू-पणतूही रात्रीचा अंधार झेलत आहेत. आयुष्यातला काळोख केव्हा दूर होणार, हे सांगणे कठीण असल्याचे मत अतिदुर्गम चुनखडी येथील गानू बेठेकर या ६५ वर्षीय वृद्धाने व्यक्त करीत आपल्या व्यथा सांगितल्या.देश जागतिक महासत्ता बनण्याच्या तयारीत असताना, धारणी व चिखलदरा तालुक्याचा समावेश असलेल्या मेळघाटातील २४ आदिवासी पाड्यांमध्ये स्वातंत्र्याची ७२ वर्षे उलटल्यानंतरही वीज पोहोचलेली नाही.धारणी व चिखलदरा तालुक्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या योजना शासनस्तरावरून पाठविल्या जातात. मात्र, वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या पायाभूत गरजा कुठपर्यंत पोहोचल्या, तर अजूनही २४ गावांमध्ये विजेची व्यवस्था झालेली नाही. धारणी तालुक्यातील रंगूबेली, ढोकळा, खामदा, किन्हीखेडा व कुंड या पाच गावांसह चिखलदरा तालुक्यातील एकताई, सलीता, भांडुम, चोबिता, लाखेवाडा, बोदू, मारिता, खडीमल, बिच्छुखेडा, चुनखडी, माडीझडप, नवलगाव, माखला, पिपल्या, टेंभ्रू, रायपूर, बोराट्याखेडा, रेहट्याखेडा आदी गावांचा समावेश आहे. वीजपुरवठा हा येथील आदिवासींसाठी परवलीचा शब्द बनला आहे.कंदील, बॅटरी आणि सौरदिवाव्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असल्याने मेळघाटातील या अतिदुर्गम गावांना कोअर झोन आणि विविध कारणास्तव विद्युत पुरवठा पोहोचला नाही. शेतात जागली तसेच मुलांचा अभ्यास पूर्वी कंदील व बॅटरीच्या उजेडात व्हायचा. आता काही प्रमाणात सौरदिवे खरेदी करून त्यांनी वापरात आणले आहेत.शासनदरबारी उदासीनताचिखलदरा तालुक्यातील एकताई, सुमिता, सलीता, भांडुम, चोबिता व लाखेवाडा या सहा गावांमध्ये डीपीडीसी अंतर्गत प्रस्तावित वीजपुरवठ्याची कामे अडकून पडली आहे. माडीझडप, माखला, रायपूर, बोराट्याखेडा, रेहट्याखेडा ही पाच गावे व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात येतात. हातरूण येथील उपसरपंच नानकराम ठाकरे, चिलाटी येथील मेळघाट मित्र या स्वयंसेवी संघटनेचे रामेश्वर फडसह आदिवासी युवकांनी महावितरणला निवेदन ते निवडणुकांवर बहिष्कारापर्यंत अनेक आंदोलने केली. मात्र, काळोख कायम आहे.४२ गावांना मध्य प्रदेशातून पुरवठा, लाखोंचा घाटाचिखलदरा तालुक्यातील सरिता सबस्टेशन अंतर्गत ४२ गावांना मध्य प्रदेशातून विद्युत पुरवठा केला जातो. पूर्वी येथे ३८०० विद्युत ग्राहक होते; आता केवळ १३०० ग्राहक आहेत. महावितरण एक कोटी रुपये महिन्याची वीज विकत घेते, तर केवळ तीन लाखांपर्यंत वसुली होत असल्याने लाखो रुपये घाट्याचे वास्तव आहे. वीजचोरी करताना अपघात होऊन आदिवासींना जीव गमवावा लागत आहे

टॅग्स :electricityवीज