शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

मेळघाटातील २४ पाड्यांमध्ये आजही काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 11:31 IST

जन्मलो तेव्हा वाटलं, आपले पूर्वज अंधारात जन्मले. निदान आपली मुलं-बाळं तरी जन्म घेतील तेव्हा गावात वीज आलेली असेल. मात्र, ते काही प्रत्यक्षात उतरले नाही.

ठळक मुद्देव्यथा शापित मेळघाटचीआदिवासींच्या पिढ्यांच्या नशिबी अंधार

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : जन्मलो तेव्हा वाटलं, आपले पूर्वज अंधारात जन्मले. निदान आपली मुलं-बाळं तरी जन्म घेतील तेव्हा गावात वीज आलेली असेल. मात्र, ते काही प्रत्यक्षात उतरले नाही. नातू-पणतूही रात्रीचा अंधार झेलत आहेत. आयुष्यातला काळोख केव्हा दूर होणार, हे सांगणे कठीण असल्याचे मत अतिदुर्गम चुनखडी येथील गानू बेठेकर या ६५ वर्षीय वृद्धाने व्यक्त करीत आपल्या व्यथा सांगितल्या.देश जागतिक महासत्ता बनण्याच्या तयारीत असताना, धारणी व चिखलदरा तालुक्याचा समावेश असलेल्या मेळघाटातील २४ आदिवासी पाड्यांमध्ये स्वातंत्र्याची ७२ वर्षे उलटल्यानंतरही वीज पोहोचलेली नाही.धारणी व चिखलदरा तालुक्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या योजना शासनस्तरावरून पाठविल्या जातात. मात्र, वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या पायाभूत गरजा कुठपर्यंत पोहोचल्या, तर अजूनही २४ गावांमध्ये विजेची व्यवस्था झालेली नाही. धारणी तालुक्यातील रंगूबेली, ढोकळा, खामदा, किन्हीखेडा व कुंड या पाच गावांसह चिखलदरा तालुक्यातील एकताई, सलीता, भांडुम, चोबिता, लाखेवाडा, बोदू, मारिता, खडीमल, बिच्छुखेडा, चुनखडी, माडीझडप, नवलगाव, माखला, पिपल्या, टेंभ्रू, रायपूर, बोराट्याखेडा, रेहट्याखेडा आदी गावांचा समावेश आहे. वीजपुरवठा हा येथील आदिवासींसाठी परवलीचा शब्द बनला आहे.कंदील, बॅटरी आणि सौरदिवाव्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असल्याने मेळघाटातील या अतिदुर्गम गावांना कोअर झोन आणि विविध कारणास्तव विद्युत पुरवठा पोहोचला नाही. शेतात जागली तसेच मुलांचा अभ्यास पूर्वी कंदील व बॅटरीच्या उजेडात व्हायचा. आता काही प्रमाणात सौरदिवे खरेदी करून त्यांनी वापरात आणले आहेत.शासनदरबारी उदासीनताचिखलदरा तालुक्यातील एकताई, सुमिता, सलीता, भांडुम, चोबिता व लाखेवाडा या सहा गावांमध्ये डीपीडीसी अंतर्गत प्रस्तावित वीजपुरवठ्याची कामे अडकून पडली आहे. माडीझडप, माखला, रायपूर, बोराट्याखेडा, रेहट्याखेडा ही पाच गावे व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात येतात. हातरूण येथील उपसरपंच नानकराम ठाकरे, चिलाटी येथील मेळघाट मित्र या स्वयंसेवी संघटनेचे रामेश्वर फडसह आदिवासी युवकांनी महावितरणला निवेदन ते निवडणुकांवर बहिष्कारापर्यंत अनेक आंदोलने केली. मात्र, काळोख कायम आहे.४२ गावांना मध्य प्रदेशातून पुरवठा, लाखोंचा घाटाचिखलदरा तालुक्यातील सरिता सबस्टेशन अंतर्गत ४२ गावांना मध्य प्रदेशातून विद्युत पुरवठा केला जातो. पूर्वी येथे ३८०० विद्युत ग्राहक होते; आता केवळ १३०० ग्राहक आहेत. महावितरण एक कोटी रुपये महिन्याची वीज विकत घेते, तर केवळ तीन लाखांपर्यंत वसुली होत असल्याने लाखो रुपये घाट्याचे वास्तव आहे. वीजचोरी करताना अपघात होऊन आदिवासींना जीव गमवावा लागत आहे

टॅग्स :electricityवीज