शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

मेळघाटातील २४ पाड्यांमध्ये आजही काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 11:31 IST

जन्मलो तेव्हा वाटलं, आपले पूर्वज अंधारात जन्मले. निदान आपली मुलं-बाळं तरी जन्म घेतील तेव्हा गावात वीज आलेली असेल. मात्र, ते काही प्रत्यक्षात उतरले नाही.

ठळक मुद्देव्यथा शापित मेळघाटचीआदिवासींच्या पिढ्यांच्या नशिबी अंधार

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : जन्मलो तेव्हा वाटलं, आपले पूर्वज अंधारात जन्मले. निदान आपली मुलं-बाळं तरी जन्म घेतील तेव्हा गावात वीज आलेली असेल. मात्र, ते काही प्रत्यक्षात उतरले नाही. नातू-पणतूही रात्रीचा अंधार झेलत आहेत. आयुष्यातला काळोख केव्हा दूर होणार, हे सांगणे कठीण असल्याचे मत अतिदुर्गम चुनखडी येथील गानू बेठेकर या ६५ वर्षीय वृद्धाने व्यक्त करीत आपल्या व्यथा सांगितल्या.देश जागतिक महासत्ता बनण्याच्या तयारीत असताना, धारणी व चिखलदरा तालुक्याचा समावेश असलेल्या मेळघाटातील २४ आदिवासी पाड्यांमध्ये स्वातंत्र्याची ७२ वर्षे उलटल्यानंतरही वीज पोहोचलेली नाही.धारणी व चिखलदरा तालुक्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या योजना शासनस्तरावरून पाठविल्या जातात. मात्र, वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या पायाभूत गरजा कुठपर्यंत पोहोचल्या, तर अजूनही २४ गावांमध्ये विजेची व्यवस्था झालेली नाही. धारणी तालुक्यातील रंगूबेली, ढोकळा, खामदा, किन्हीखेडा व कुंड या पाच गावांसह चिखलदरा तालुक्यातील एकताई, सलीता, भांडुम, चोबिता, लाखेवाडा, बोदू, मारिता, खडीमल, बिच्छुखेडा, चुनखडी, माडीझडप, नवलगाव, माखला, पिपल्या, टेंभ्रू, रायपूर, बोराट्याखेडा, रेहट्याखेडा आदी गावांचा समावेश आहे. वीजपुरवठा हा येथील आदिवासींसाठी परवलीचा शब्द बनला आहे.कंदील, बॅटरी आणि सौरदिवाव्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असल्याने मेळघाटातील या अतिदुर्गम गावांना कोअर झोन आणि विविध कारणास्तव विद्युत पुरवठा पोहोचला नाही. शेतात जागली तसेच मुलांचा अभ्यास पूर्वी कंदील व बॅटरीच्या उजेडात व्हायचा. आता काही प्रमाणात सौरदिवे खरेदी करून त्यांनी वापरात आणले आहेत.शासनदरबारी उदासीनताचिखलदरा तालुक्यातील एकताई, सुमिता, सलीता, भांडुम, चोबिता व लाखेवाडा या सहा गावांमध्ये डीपीडीसी अंतर्गत प्रस्तावित वीजपुरवठ्याची कामे अडकून पडली आहे. माडीझडप, माखला, रायपूर, बोराट्याखेडा, रेहट्याखेडा ही पाच गावे व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात येतात. हातरूण येथील उपसरपंच नानकराम ठाकरे, चिलाटी येथील मेळघाट मित्र या स्वयंसेवी संघटनेचे रामेश्वर फडसह आदिवासी युवकांनी महावितरणला निवेदन ते निवडणुकांवर बहिष्कारापर्यंत अनेक आंदोलने केली. मात्र, काळोख कायम आहे.४२ गावांना मध्य प्रदेशातून पुरवठा, लाखोंचा घाटाचिखलदरा तालुक्यातील सरिता सबस्टेशन अंतर्गत ४२ गावांना मध्य प्रदेशातून विद्युत पुरवठा केला जातो. पूर्वी येथे ३८०० विद्युत ग्राहक होते; आता केवळ १३०० ग्राहक आहेत. महावितरण एक कोटी रुपये महिन्याची वीज विकत घेते, तर केवळ तीन लाखांपर्यंत वसुली होत असल्याने लाखो रुपये घाट्याचे वास्तव आहे. वीजचोरी करताना अपघात होऊन आदिवासींना जीव गमवावा लागत आहे

टॅग्स :electricityवीज