शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पीक विमा कंपन्याद्वारे २.३६ कोटींचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:28 IST

गतवर्षीचा खरीप हंगाम अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झाला. १३ तालुक्यांत ५० पैशांचे आत पैसेवारी असल्याने दुष्काळस्थिती जाहीर झालेली आहे. अशा स्थितीत ७७ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ६ कोटी ४१ लाखांचा पीक विमा हप्ता भरणा केला.

ठळक मुद्देजिल्हा दुष्काळी : ७७ हजार शेतकऱ्यांचा ६.४१ कोटी हप्ता, भरपाई ४.०५ कोटी

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीचा खरीप हंगाम अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झाला. १३ तालुक्यांत ५० पैशांचे आत पैसेवारी असल्याने दुष्काळस्थिती जाहीर झालेली आहे. अशा स्थितीत ७७ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ६ कोटी ४१ लाखांचा पीक विमा हप्ता भरणा केला. प्रत्यक्षात ५ हजार ३७१ शेतकºयांना ४ कोटी ५ लाख ९६ हजारांची भरपाई कंपन्यांद्वारे जाहीर करण्यात आली. दुष्काळग्रस्त तालुक्यांना पीक विमा भरपाई तर दूरच, शेतकरी हप्ता इतकीही भरपाई विमा कंपनीद्वारे मिळालेली नाही. त्यातही २ कोटी ३६ लाखांचा डल्ला मारल्याचे वास्तव आहे.सलग दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पीकविम्याचे संरक्षण मिळेल, या आशेने सन २०१७-१८ हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ६५६ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. योजनेत समाविष्ट पिकांपैकी उडीद, मूग, भुईमूग, भात, तीळ, खरीप ज्वार, सोयाबीन आदी पिकांची भरपाई कंपनीस्तरावर आता जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कपाशी व तूर व्यतिरिक्त७७ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ६ कोटी ४१ लाख ३ हजारांचा विमा हप्ता भरणा केला होता. या तुलनेत ५ हजार ३७१ शेतकऱ्यांना ४ कोटी ५ लाख ९६ हजारांची पीक भरपाई जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच अमरावती या दुष्काळी जिल्ह्यात ७२ हजार २१७ शेतकऱ्यांना त्यांनी भरणा केलेल्या विमा हप्त्या इतकीही भरपाई देण्यात आलेली नसल्याची बाब उघड झाली आहे. शेतकऱ्यांनी भरणा केलेल्या विमा हप्तयाच्या तुलनेत विमा कंपन्यांनी भरपाई न देता दोन कोटी ३५ लाखांचा डल्ला मारल्याचा आरोप होत आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरास प्रोत्साहन देणे तसेच पिकांच्या नुकसानीच्या कठीण काळात आर्थिक स्थैर्य वाढविणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची अशी ही योजना आहे. मागच्या खरिपात पेरणीपासूनच पावसात खंड राहिला. त्यामुळे अल्प कालावधीतील सोयाबीन, मूग, उडीद आदी पीक बाद झालीत. खरिपाची पैसेवारी धारणी वगळता सर्व तालुक्यांत ५० पैशांच्या आत आहे. त्यामुळे पाच तालुक्यांत दुष्काळ व आठ तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती शासनाने यापूर्वीच जाहीर केलेली आहे. पीक विमा योजनेत सहभागी सर्वच शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळण्याची अपेक्षा असताना कंपन्यांनी घात केला. पीक विमा काढण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यात येतो. बँकाही पीक कर्जामधून परस्पर विमा हप्ता कपात करतात. प्रत्यक्षात कंपन्यांची तुंबडी भरण्याचा हा प्रकार ठरत असल्याचा आरोप होत आहे.योजनेत १,३८,६५६ शेतकऱ्यांचा सहभागपंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ६५६ शेतकºयांनी सहभाग नोंदविला. यामध्ये ६२ हजार ६८९ शेतकरी कर्जदार व ७५ हजार ९६९ शेतकऱ्यांचा ऐच्छिक सहभाग आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ८,४१३, भातकुली १२,९५३, नांदगाव खंडेश्वर २४,६८०, चांदूर रेल्वे ६७४६, धामणगाव रेल्वे ७,५८२, मोर्शी ७,८४४, वरूड २,२८६, तिवसा ५५४७, चांदूर बाजार ७,९९३, तिवसा ५,५४७, चांदूर बाजार ७९९३, अचलपूर ७,७९६, दर्यापूर २६,९७०, अंजनगाव सुर्जी १६,८०१, चिखलदरा १,१६२ व धारणी १,१८३ शेतकऱ्यांचा सहभाग आहे.सोयाबीन, मूग, उडीद सर्वाधिक बाधित तरीही ठेंगागतवर्षीच्या खरिपात पेरणीपासूनच पावसाची दडी असल्याने १०० दिवसांच्या कालावधीतील सोयाबीन व ६० दिवसांच्या कालावधीतील मूग व उडीद पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. सोयाबीनसाठी ६० हजार ७३६ शेतकऱ्यांनी ७१ हजार ४४४ हेक्टरसाठी विमा काढला व पाच कोटी ७१ लाखांचा विमा हप्ता भरणा केला. प्रत्यक्षात ४ हजार ६८७ शेतकऱ्यांना ३ कोटी ८८ लाख ९७ हजाराची भरपाई देण्यात आलेली आहे. उडदासाठी ५३०० पैकी ८१ शेतकऱ्यांना तर मुगासाठी १०,६७८ शेतकºयांपैकी ५३२ शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा