शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

२२ हजार व्यक्ती गृह विलगीकरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दक्षतेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. इतर कुणालाही असे आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन : अन्य राज्यातून आलेल्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात परदेशातून तसेच दिल्ली, नागपूर, मुंबई, पुणे व बाहेरून आलेल्या २२ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. वैद्यकीय पथके त्यांच्या सतत संपर्कात आहेत. या व्यक्तींच्या हातांवर शिक्का मारण्यात आलेला आहे. सर्वच तालुक्यातील आरोग्य पथक या व्यक्तींच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दक्षतेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. इतर कुणालाही असे आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे. घाबरून न जाता दक्ष राहावे. आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी केलेल्या ३४८७ नागरिकांनाही होम व्कारंटाइन राहण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. या व्यक्तीरिक्त परदेशातून आलेले ११७ प्रवाशी नागरिकांची देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यात येऊन यापैकी ९१ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. त्यांच्याही हातावर शिक्का मारण्यात आलेला आहे. यापैकी २७ नागरिकांना ‘फॅसिलिटी आयसोलेशन ’ करण्यात आलेले आहे.बेघरांसाठी १४०० ठिकाणी भोजनाची व्यवस्थाया संचारबंदीच्या काळात राहण्याची व जेवण, पाण्याची व्यवस्था नसलेल्या बेघर नागरिकांना सुरक्षित राहता यावे, या हेतूने शासनाद्वारा जिल्ह्यात १००० ठिकाणी व खासगी संस्था, व्यक्तींद्वारा ४०० ठिकाणी नागरिकांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. अमरावती शहरात देखिल ठिकठिकाणी बेघरांसाठीच्या संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे.संचारबंदी असताना हजारो नागरिक आलेत कसे?जिल्ह्यासह राज्यात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली. गाव, तालुके, जिल्हा व राज्य सीमेवर चेक पॉर्इंट लावण्यात आलेले आहे. असे असताना देखिल जिल्ह्यात अधिकृत २२ हजार नागरिक आले. अनधिकृत किती याची माहिती प्रशासनाजवळ नाही. यासर्व बाबींचा ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधीत उपाययोजना जरी शासन राबवित असले, तरी अमंलबजावणी करणाºया यंत्रणेची पोलखोल या आकडेवारीने केली असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या