शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

२२ हजार व्यक्ती गृह विलगीकरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दक्षतेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. इतर कुणालाही असे आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन : अन्य राज्यातून आलेल्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात परदेशातून तसेच दिल्ली, नागपूर, मुंबई, पुणे व बाहेरून आलेल्या २२ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. वैद्यकीय पथके त्यांच्या सतत संपर्कात आहेत. या व्यक्तींच्या हातांवर शिक्का मारण्यात आलेला आहे. सर्वच तालुक्यातील आरोग्य पथक या व्यक्तींच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दक्षतेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. इतर कुणालाही असे आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे. घाबरून न जाता दक्ष राहावे. आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी केलेल्या ३४८७ नागरिकांनाही होम व्कारंटाइन राहण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. या व्यक्तीरिक्त परदेशातून आलेले ११७ प्रवाशी नागरिकांची देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यात येऊन यापैकी ९१ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. त्यांच्याही हातावर शिक्का मारण्यात आलेला आहे. यापैकी २७ नागरिकांना ‘फॅसिलिटी आयसोलेशन ’ करण्यात आलेले आहे.बेघरांसाठी १४०० ठिकाणी भोजनाची व्यवस्थाया संचारबंदीच्या काळात राहण्याची व जेवण, पाण्याची व्यवस्था नसलेल्या बेघर नागरिकांना सुरक्षित राहता यावे, या हेतूने शासनाद्वारा जिल्ह्यात १००० ठिकाणी व खासगी संस्था, व्यक्तींद्वारा ४०० ठिकाणी नागरिकांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. अमरावती शहरात देखिल ठिकठिकाणी बेघरांसाठीच्या संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे.संचारबंदी असताना हजारो नागरिक आलेत कसे?जिल्ह्यासह राज्यात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली. गाव, तालुके, जिल्हा व राज्य सीमेवर चेक पॉर्इंट लावण्यात आलेले आहे. असे असताना देखिल जिल्ह्यात अधिकृत २२ हजार नागरिक आले. अनधिकृत किती याची माहिती प्रशासनाजवळ नाही. यासर्व बाबींचा ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधीत उपाययोजना जरी शासन राबवित असले, तरी अमंलबजावणी करणाºया यंत्रणेची पोलखोल या आकडेवारीने केली असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या