शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड मार्गावर मालगाडीचे २२ डबे घसरले; दोन दिवसांनंतरही मार्ग पूर्ववत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:18 IST

फोटो १६एएमपीएच०२, ०३, ०४ कॅप्श्न - शिराळा येथे मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्यानंतर असे विस्कळीत झाले. (छाया - मनीष तसरे, ...

फोटो १६एएमपीएच०२, ०३, ०४

कॅप्श्न - शिराळा येथे मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्यानंतर असे विस्कळीत झाले. (छाया - मनीष तसरे, अमरावती)

अमरावती : अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावरील वलगावनजीकच्या शिराळा येथे रेल्वे रुळाच्या चाव्या (फिश प्लेट) गायब झाल्याने कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरल्याची घटना शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व रात्रीला ही घटना घडल्याने हा घातपात तर नाही ना, या दिशेने रेल्वे अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. दोन दिवसांनंतरही हा मार्ग पूर्ववत झालेला नाही. सोमवारी भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत, हे विशेष.

बल्लारशा येथून अमरावती जिल्ह्यातील नवीन एमआयडीसी येथील सोफिया औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात मालगाडीने कोळसा जात होता. मालगाडीचे एकूण २९ डबे होते. मात्र, वलगाव ओलांडताच शिराळा येथे अचानक मालगाडीचे २२ डबे रुळाखालून घसरले. नरखेड रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा आणला गेला. सोमवारी रेल्वे रूळाचे काम आणि अपघातग्रस्त मालगाडीचे डबे उचलण्यात आले होते. नरखेड मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याने नरखेड- काचीगुडा एक्स्प्रेस, जयपूर ते सिकंदराबाद एक्स्प्रेस या रेल्वे दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. रेल्वे मार्गाचे काम पूर्ववत होण्यासाठी दोन दिवसांपेक्षा अधिक अवधी लागणार आहे. घटनास्थळी भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे प्रबंधक एस.एस.केडिया, अतिरिक्त प्रबंधक मनोज सिन्हा, सहायक वाणिज्य प्रबंधक अनिल बागडे यांच्यासह अमरावती, बडनेरा, अकोला येथील रेल्वे अधिकारी पाेहोचले आहेत.

बॉक्स

रेल्वे सुरक्षा बलाचे सुरक्षेकडे दुर्लक्ष

अमरावती- नरखेड रेल्वे मार्गावर सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाने नियमित गस्त करणे अनिवार्य आहे. मात्र, मोठ्या अंतरापर्यंत रेल्वे रुळाच्या चाव्या गायब होत असताना ते सुरक्षा बलाच्या जवानांना दिसू नये, याचे आश्चर्य आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची गस्त कागदोपत्री असल्याचे चित्र आहे. रुळाच्या तपासणीची जबाबदारी असलेल्या गँगमनलादेखील चाव्या गायब झाल्याचे दिसून आल्या नाहीत. परिणामी रेल्वे प्रशासनाने नरखेड मार्ग वाऱ्यावर सोडून प्रवाशांच्या जीविताशी खेळ चालविल्याचे दिसून येते.