शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

नरखेड मार्गावर मालगाडीचे २२ डबे घसरले; दोन दिवसांनंतरही मार्ग पूर्ववत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:18 IST

फोटो १६एएमपीएच०२, ०३, ०४ कॅप्श्न - शिराळा येथे मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्यानंतर असे विस्कळीत झाले. (छाया - मनीष तसरे, ...

फोटो १६एएमपीएच०२, ०३, ०४

कॅप्श्न - शिराळा येथे मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्यानंतर असे विस्कळीत झाले. (छाया - मनीष तसरे, अमरावती)

अमरावती : अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावरील वलगावनजीकच्या शिराळा येथे रेल्वे रुळाच्या चाव्या (फिश प्लेट) गायब झाल्याने कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरल्याची घटना शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व रात्रीला ही घटना घडल्याने हा घातपात तर नाही ना, या दिशेने रेल्वे अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. दोन दिवसांनंतरही हा मार्ग पूर्ववत झालेला नाही. सोमवारी भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत, हे विशेष.

बल्लारशा येथून अमरावती जिल्ह्यातील नवीन एमआयडीसी येथील सोफिया औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात मालगाडीने कोळसा जात होता. मालगाडीचे एकूण २९ डबे होते. मात्र, वलगाव ओलांडताच शिराळा येथे अचानक मालगाडीचे २२ डबे रुळाखालून घसरले. नरखेड रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा आणला गेला. सोमवारी रेल्वे रूळाचे काम आणि अपघातग्रस्त मालगाडीचे डबे उचलण्यात आले होते. नरखेड मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याने नरखेड- काचीगुडा एक्स्प्रेस, जयपूर ते सिकंदराबाद एक्स्प्रेस या रेल्वे दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. रेल्वे मार्गाचे काम पूर्ववत होण्यासाठी दोन दिवसांपेक्षा अधिक अवधी लागणार आहे. घटनास्थळी भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे प्रबंधक एस.एस.केडिया, अतिरिक्त प्रबंधक मनोज सिन्हा, सहायक वाणिज्य प्रबंधक अनिल बागडे यांच्यासह अमरावती, बडनेरा, अकोला येथील रेल्वे अधिकारी पाेहोचले आहेत.

बॉक्स

रेल्वे सुरक्षा बलाचे सुरक्षेकडे दुर्लक्ष

अमरावती- नरखेड रेल्वे मार्गावर सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाने नियमित गस्त करणे अनिवार्य आहे. मात्र, मोठ्या अंतरापर्यंत रेल्वे रुळाच्या चाव्या गायब होत असताना ते सुरक्षा बलाच्या जवानांना दिसू नये, याचे आश्चर्य आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची गस्त कागदोपत्री असल्याचे चित्र आहे. रुळाच्या तपासणीची जबाबदारी असलेल्या गँगमनलादेखील चाव्या गायब झाल्याचे दिसून आल्या नाहीत. परिणामी रेल्वे प्रशासनाने नरखेड मार्ग वाऱ्यावर सोडून प्रवाशांच्या जीविताशी खेळ चालविल्याचे दिसून येते.