शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

२१ कोटींचे रेतीघाट तस्करांच्या घशात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

धामणगाव रेल्वे तालुका रेतीघाटाच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा तालुका म्हणून ओळखले जाते. वर्धा नदीच्या पात्रात तालुक्यात आष्टा, गोकुळसरा, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, नायगाव, इसापूर, रायपूर कासारखेडा, चिंचोली, विटाळा, निंबापूर हे रेतीघाट येतात. या घाटांचा सन २०१५-१६ या वर्षात लिलाव होऊन तब्बल २१ कोटी ५४ लाख रुपयांचा महसूल या तालुक्याला मिळाला होता.

ठळक मुद्देधामणगावात दरवर्षी खड्डा : चार वर्षांपासून लिलावात हुलकावणी

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तालुक्यातील वर्धा नदीपात्रात असलेल्या सात रेतीघाटांना चार वर्षांपासून ई-लिलावात हुलकावणी मिळत आहे. त्यामुळे मागे पडलेल्या या घाटांतील रेतीचा २१ कोटींचा महसूल तस्करांच्या घशात जात आहे. या सातही रेतीघाटांवर दरवर्षी खड्डे दिसून येतात.धामणगाव रेल्वे तालुका रेतीघाटाच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा तालुका म्हणून ओळखले जाते. वर्धा नदीच्या पात्रात तालुक्यात आष्टा, गोकुळसरा, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, नायगाव, इसापूर, रायपूर कासारखेडा, चिंचोली, विटाळा, निंबापूर हे रेतीघाट येतात. या घाटांचा सन २०१५-१६ या वर्षात लिलाव होऊन तब्बल २१ कोटी ५४ लाख रुपयांचा महसूल या तालुक्याला मिळाला होता. त्यानंतर चार वर्षांमध्ये या रेतीघाटाचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे रेती उत्खनन करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे.रेतीघाटांचा लिलाव करण्यापूर्वी जनसुनावणी व उत्खनन करावयाच्या नदीपात्राच्या खोलीसंदर्भात पर्यावरण विभागाकडून मंजुरी घ्यावी लागते. जिल्ह्यातील पर्यावरण विभागाचे अधिकारी रेतीघाट पाहणी व मोजणीसाठी येतात. या नदीच्या पात्रात काही ठिकाणी रेती असते, तर काही ठिकाणी पात्र खोल गेल्याचे दिसते. विशेष म्हणजे, पर्यावरण विभागाचे अधिकारी मोजणीसाठी आले असताना, काही रेती तस्कर स्वत: हजर राहून पर्यावरण विभागाची दिशाभूल करतात.लिलाव झाला नसला तरी मागील वर्षी रेतीघाटात खोल खड्डे कसे झाले, यासंदर्भात पर्यावरण विभाग महसूल प्रशासनाची परीक्षा घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते. काहीअंशी पर्यावरण विभाग आणि जिल्हास्तरीय यंत्रणेकडून परवानगी मिळाली, तर राज्याच्या पर्यावरण विभागाची अनुमती दर्शविण्यास उशीर होतो. त्यानंतर ई-प्रकिया लिलावात हे रेतीघाट अडकतात व अवैध उत्खननाचा फायदा रेती तस्कर घेत असल्याच दरवर्षीचे चित्र आहे.भरारी पथक नावापुरतेचतालुक्यातील रेतीघाटांचा लिलाव न झाल्याने तहसीलदारांच्या नेतृत्वात या घाटांचे संरक्षण करण्यासाठी दरवेळी भरारी पथके नेमली जातात. या पथकाने इमाने-इतबारे काम करणे गरजेचे आहे. सोन्यासारखा भाव रेतीला असताना, भरारी पथकाचे नेमके या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होते. भरारी पथक गौण खनिज उत्खनन करणाऱ्या पथकावर कारवाईसाठी घटनास्थळावर दाखल होण्यापूर्वीच त्यांना फोन जातात. त्यामुळे या पथकाच्या हाती काहीच मिळत नाही. दरवर्षी रेतीने भरलेले नदीचे पात्र कसे सपाट होते, याविषयी मोबाईल सीडीआर तपासावे अथवा घाटाचा लिलाव होण्यापूर्वीच्या कालावधीत सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. गौण खनिजातील गौडबंगाल पुढे येईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :sandवाळू