शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

राज्यातील २०६५ स्वयंचलित हवामान केंद्रे कुचकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 16:31 IST

शेतक-यांना दर १० मिनिटाला हवामानाच्या अचूक माहिती मिळण्याकरिता राज्यातील २ हजार ६५ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे सहा महिन्यांपूर्वी उभारण्यात आली.

गजानन मोहोडअमरावती : शेतक-यांना दर १० मिनिटाला हवामानाच्या अचूक माहिती मिळण्याकरिता राज्यातील २ हजार ६५ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे सहा महिन्यांपूर्वी उभारण्यात आली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाअभावी अद्याप एकाही केंद्रावरून शेतक-यांना हवामान माहितीचा एसएमएस पाठविण्यात आलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.हवामानातील बदलांमुळे शेतक-यांना कायम नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. यामध्ये पिकांच्या नासाडीतून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल २०१७ मध्ये हवामानाच्या अचूक माहितीचा वेध घेण्यासाठी स्कायमेट वेदर सर्व्हिसेसच्या माध्यमातून राज्यातील सर्व २,०६५ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला. या केंद्रांमुळे शेतक-यांना पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वा-याचा वेग आणि दिशा या घटकांसह १२ किमी परिघातील हवामानाची अचूक माहिती दर १० मिनिटांनी एसएमएसद्वारे मिळणार आहे.यासंदर्भात संबंधित कंपनीसोबत कृषी विभागाचा सात वर्षांसाठी करारदेखील झाला. जागेव्यतिरिक्त या प्रकल्पात शासनाची कोणतीही आर्थिक गुंतवणूक नाही. कृषी विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव विजय कुमार यांच्या पुढाकारामुळे शासनाची किमान १५० कोटींची बचत झाली. राज्यातील पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३० एप्रिल २०१७ ला उद्घाटन झाले. त्यानंतर राज्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये ही केंद्रे उभारण्यात आली. यामधून डेटा पुण्याच्या सर्व्हरला पाठविण्यात येतो.मात्र राज्य प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांच्या तारखेचा मुहूर्त न गवसल्याने योजना कितीही महत्त्वाची असली तरी अंमलबजावणी सहा महिन्यांपासून अद्याप सुरू झालेली नाही. येत्या २६ जानेवारीला मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन असल्याची माहिती कंपनीचे विदर्भ व्यवस्थापक भूषण रिनके यांनी सांगितले.सर्वाधिक केंद्र पुणे व यवतमाळ जिल्ह्यातमहावेध प्रकल्पांतर्गत २०६५ केंद्रे राज्यात उभारण्यात आली. यामध्ये सर्वाधिक १०१ केंद्रे यवतमाळ व १०० पुणे जिल्ह्यात आहेत. सोलापूर ९१, नाशिक ९२, बुलडाणा ९०, सातारा ९१, अहमदनगर ९७, गडचिरोली ४०, चंद्रपूर ५०, गोंदिया २५, वर्धा ४७ व अमरावती जिल्ह्यात ८९ केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. याव्यतिरिक्त दुर्गम व डोंगराळ भागातही केंद्रे सुरू करण्यात आली असली तरी शेतक-यांना माहिती मिळत नसल्याने ती कुचकामी ठरली आहेत.दर १० मिनिटांनी डेटा लॉगरलासर्व महसूल मंडळांतील केंद्रांद्वारी दर १० मिनिटांनी हवामान घटकांचा डेटा लॉगरला मिळणार आहे. ही माहिती पुढे दर तासाला पुणे येथील सर्व्हरला पाठविली जाणार आहे. ही माहिती पीक विम्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, यासाठी विमा कंपन्यांना स्कायमेटकडून माहिती खरेदी करावी लागेल. यासाठीदेखील कंपनीला ३,२५० रुपये दरमहापेक्षा जास्त दराने माहिती विकता येणार नाही, असे बंधन घालण्यात आले आहे.