शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यातील २०६५ स्वयंचलित हवामान केंद्रे कुचकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 16:31 IST

शेतक-यांना दर १० मिनिटाला हवामानाच्या अचूक माहिती मिळण्याकरिता राज्यातील २ हजार ६५ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे सहा महिन्यांपूर्वी उभारण्यात आली.

गजानन मोहोडअमरावती : शेतक-यांना दर १० मिनिटाला हवामानाच्या अचूक माहिती मिळण्याकरिता राज्यातील २ हजार ६५ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे सहा महिन्यांपूर्वी उभारण्यात आली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाअभावी अद्याप एकाही केंद्रावरून शेतक-यांना हवामान माहितीचा एसएमएस पाठविण्यात आलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.हवामानातील बदलांमुळे शेतक-यांना कायम नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. यामध्ये पिकांच्या नासाडीतून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल २०१७ मध्ये हवामानाच्या अचूक माहितीचा वेध घेण्यासाठी स्कायमेट वेदर सर्व्हिसेसच्या माध्यमातून राज्यातील सर्व २,०६५ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला. या केंद्रांमुळे शेतक-यांना पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वा-याचा वेग आणि दिशा या घटकांसह १२ किमी परिघातील हवामानाची अचूक माहिती दर १० मिनिटांनी एसएमएसद्वारे मिळणार आहे.यासंदर्भात संबंधित कंपनीसोबत कृषी विभागाचा सात वर्षांसाठी करारदेखील झाला. जागेव्यतिरिक्त या प्रकल्पात शासनाची कोणतीही आर्थिक गुंतवणूक नाही. कृषी विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव विजय कुमार यांच्या पुढाकारामुळे शासनाची किमान १५० कोटींची बचत झाली. राज्यातील पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३० एप्रिल २०१७ ला उद्घाटन झाले. त्यानंतर राज्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये ही केंद्रे उभारण्यात आली. यामधून डेटा पुण्याच्या सर्व्हरला पाठविण्यात येतो.मात्र राज्य प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांच्या तारखेचा मुहूर्त न गवसल्याने योजना कितीही महत्त्वाची असली तरी अंमलबजावणी सहा महिन्यांपासून अद्याप सुरू झालेली नाही. येत्या २६ जानेवारीला मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन असल्याची माहिती कंपनीचे विदर्भ व्यवस्थापक भूषण रिनके यांनी सांगितले.सर्वाधिक केंद्र पुणे व यवतमाळ जिल्ह्यातमहावेध प्रकल्पांतर्गत २०६५ केंद्रे राज्यात उभारण्यात आली. यामध्ये सर्वाधिक १०१ केंद्रे यवतमाळ व १०० पुणे जिल्ह्यात आहेत. सोलापूर ९१, नाशिक ९२, बुलडाणा ९०, सातारा ९१, अहमदनगर ९७, गडचिरोली ४०, चंद्रपूर ५०, गोंदिया २५, वर्धा ४७ व अमरावती जिल्ह्यात ८९ केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. याव्यतिरिक्त दुर्गम व डोंगराळ भागातही केंद्रे सुरू करण्यात आली असली तरी शेतक-यांना माहिती मिळत नसल्याने ती कुचकामी ठरली आहेत.दर १० मिनिटांनी डेटा लॉगरलासर्व महसूल मंडळांतील केंद्रांद्वारी दर १० मिनिटांनी हवामान घटकांचा डेटा लॉगरला मिळणार आहे. ही माहिती पुढे दर तासाला पुणे येथील सर्व्हरला पाठविली जाणार आहे. ही माहिती पीक विम्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, यासाठी विमा कंपन्यांना स्कायमेटकडून माहिती खरेदी करावी लागेल. यासाठीदेखील कंपनीला ३,२५० रुपये दरमहापेक्षा जास्त दराने माहिती विकता येणार नाही, असे बंधन घालण्यात आले आहे.