शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

वऱ्हाडातील केवळ २० तालुक्यांत पावसाचे शतक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 19:42 IST

यवतमाळ, वाशीम माघारले : अमरावती, अकोल्याने गाठली सरासरी

- प्रदीप भाकरेअमरावती : पावसाचा उणापुरा एक आठवडा शिल्लक असताना पश्चिम विदर्भातील केवळ २० तालुक्यांनी सरासरी गाठली आहे. उर्वरित तालुके ५० ते ९० टक्क्यांच्या आसपास आहेत. त्यातही यवतमाळ आणि वाशीम या दोन जिल्ह्यांत सरासरी ६० टक्के पाऊस झाला. आता आठवडाभरात ४० टक्के तूट भरून निघणारी नाही.

पावसाळ्याच्या १ जून ते २३ सप्टेंबर या कालावधीत अमरावती जिल्ह्यात १०५.५ टक्के, अकोला जिल्ह्यात ११५.१ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात नीचांकी ५९.८ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात १००.४ टक्के व वाशीम जिल्ह्यात ७१.४ असा सरासरी ९०.४ टक्के पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाच्या ११३ दिवसांमध्ये अमरावतीत १००.३, अकोल्यात १०९.४, यवतमाळमध्ये ५६.९, बुलडाण्यात ९५.२ व वाशिम जिल्ह्यामध्ये ६७.९ टक्के असा सरासरी ८५.९ टक्के पाऊस पडला. पावसाळ्याचा एक आठवडा शिल्लक असताना ही विभागाची सरासरी तूट १४ टक्के असली तरी यवतमाळ जिल्ह्यात ती तूट सर्वाधिक ४३ टक्के अशी उच्चांकी आहे. सोबतच वाशिम जिल्ह्यातही ३२ टक्के पाऊस कमी पडल्याची यंदाची नोंद आहे.

पावसाच्या ११३ दिवसांची आकडेवारी बघितल्यास अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, धारणी व चिखलदरा या सात तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यात सरासरीपेक्षा ४५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर व पातूर या पाच तालुक्यांनी पावसाचे शतक गाठले. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यात बुलडाणा, मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात आतापर्यंत ६६.४, माळेगावमध्ये ७३, रिसोडमध्ये ८३.५, मंगरुळपीरमध्ये ७४.९, मानोºयात ६०.५ व कारंजा तालुक्यात ७१.३ टक्के पावसाची नोंद झाली. 

यवतमाळ जिल्हा सरासरी ६० टक्केयवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी आर्णी तालुक्यात ७९.६ टक्के असा उच्चांकी पाऊस नोंदविला गेला. १६ पैकी एकाही तालुक्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत पुरेपूर पाऊस पडला नाही. पावसाचा केवळ आठवडा शिल्लक असताना यवतमाळ तालुक्यात केवळ ४२ टक्केच पाऊस पडला. कळंब, दारव्हा, केळापूर, घाटंजी, राळेगाव, झरी जामणी या तालुक्यांत पाऊस ५२ टक्क्यांवर स्थिरावला. १२० दिवसांच्या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ४३ टक्के तूट नोंदविली गेली. गतवर्षीही यवतमाळ जिल्ह्यावरच पाऊस रुसला होता. सलग दुसºया वर्षी यवतमाळात पावसाची तूट नोंदविली गेली.