शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

वऱ्हाडातील केवळ २० तालुक्यांत पावसाचे शतक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 19:42 IST

यवतमाळ, वाशीम माघारले : अमरावती, अकोल्याने गाठली सरासरी

- प्रदीप भाकरेअमरावती : पावसाचा उणापुरा एक आठवडा शिल्लक असताना पश्चिम विदर्भातील केवळ २० तालुक्यांनी सरासरी गाठली आहे. उर्वरित तालुके ५० ते ९० टक्क्यांच्या आसपास आहेत. त्यातही यवतमाळ आणि वाशीम या दोन जिल्ह्यांत सरासरी ६० टक्के पाऊस झाला. आता आठवडाभरात ४० टक्के तूट भरून निघणारी नाही.

पावसाळ्याच्या १ जून ते २३ सप्टेंबर या कालावधीत अमरावती जिल्ह्यात १०५.५ टक्के, अकोला जिल्ह्यात ११५.१ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात नीचांकी ५९.८ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात १००.४ टक्के व वाशीम जिल्ह्यात ७१.४ असा सरासरी ९०.४ टक्के पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाच्या ११३ दिवसांमध्ये अमरावतीत १००.३, अकोल्यात १०९.४, यवतमाळमध्ये ५६.९, बुलडाण्यात ९५.२ व वाशिम जिल्ह्यामध्ये ६७.९ टक्के असा सरासरी ८५.९ टक्के पाऊस पडला. पावसाळ्याचा एक आठवडा शिल्लक असताना ही विभागाची सरासरी तूट १४ टक्के असली तरी यवतमाळ जिल्ह्यात ती तूट सर्वाधिक ४३ टक्के अशी उच्चांकी आहे. सोबतच वाशिम जिल्ह्यातही ३२ टक्के पाऊस कमी पडल्याची यंदाची नोंद आहे.

पावसाच्या ११३ दिवसांची आकडेवारी बघितल्यास अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, धारणी व चिखलदरा या सात तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यात सरासरीपेक्षा ४५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर व पातूर या पाच तालुक्यांनी पावसाचे शतक गाठले. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यात बुलडाणा, मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात आतापर्यंत ६६.४, माळेगावमध्ये ७३, रिसोडमध्ये ८३.५, मंगरुळपीरमध्ये ७४.९, मानोºयात ६०.५ व कारंजा तालुक्यात ७१.३ टक्के पावसाची नोंद झाली. 

यवतमाळ जिल्हा सरासरी ६० टक्केयवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी आर्णी तालुक्यात ७९.६ टक्के असा उच्चांकी पाऊस नोंदविला गेला. १६ पैकी एकाही तालुक्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत पुरेपूर पाऊस पडला नाही. पावसाचा केवळ आठवडा शिल्लक असताना यवतमाळ तालुक्यात केवळ ४२ टक्केच पाऊस पडला. कळंब, दारव्हा, केळापूर, घाटंजी, राळेगाव, झरी जामणी या तालुक्यांत पाऊस ५२ टक्क्यांवर स्थिरावला. १२० दिवसांच्या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ४३ टक्के तूट नोंदविली गेली. गतवर्षीही यवतमाळ जिल्ह्यावरच पाऊस रुसला होता. सलग दुसºया वर्षी यवतमाळात पावसाची तूट नोंदविली गेली.