शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
3
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
4
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
5
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
6
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
7
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
8
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
9
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
10
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
11
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
12
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
13
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
14
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
15
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
16
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
17
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
18
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
19
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
20
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील केवळ २० तालुक्यांत पावसाचे शतक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 19:42 IST

यवतमाळ, वाशीम माघारले : अमरावती, अकोल्याने गाठली सरासरी

- प्रदीप भाकरेअमरावती : पावसाचा उणापुरा एक आठवडा शिल्लक असताना पश्चिम विदर्भातील केवळ २० तालुक्यांनी सरासरी गाठली आहे. उर्वरित तालुके ५० ते ९० टक्क्यांच्या आसपास आहेत. त्यातही यवतमाळ आणि वाशीम या दोन जिल्ह्यांत सरासरी ६० टक्के पाऊस झाला. आता आठवडाभरात ४० टक्के तूट भरून निघणारी नाही.

पावसाळ्याच्या १ जून ते २३ सप्टेंबर या कालावधीत अमरावती जिल्ह्यात १०५.५ टक्के, अकोला जिल्ह्यात ११५.१ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात नीचांकी ५९.८ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात १००.४ टक्के व वाशीम जिल्ह्यात ७१.४ असा सरासरी ९०.४ टक्के पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाच्या ११३ दिवसांमध्ये अमरावतीत १००.३, अकोल्यात १०९.४, यवतमाळमध्ये ५६.९, बुलडाण्यात ९५.२ व वाशिम जिल्ह्यामध्ये ६७.९ टक्के असा सरासरी ८५.९ टक्के पाऊस पडला. पावसाळ्याचा एक आठवडा शिल्लक असताना ही विभागाची सरासरी तूट १४ टक्के असली तरी यवतमाळ जिल्ह्यात ती तूट सर्वाधिक ४३ टक्के अशी उच्चांकी आहे. सोबतच वाशिम जिल्ह्यातही ३२ टक्के पाऊस कमी पडल्याची यंदाची नोंद आहे.

पावसाच्या ११३ दिवसांची आकडेवारी बघितल्यास अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, धारणी व चिखलदरा या सात तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यात सरासरीपेक्षा ४५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर व पातूर या पाच तालुक्यांनी पावसाचे शतक गाठले. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यात बुलडाणा, मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात आतापर्यंत ६६.४, माळेगावमध्ये ७३, रिसोडमध्ये ८३.५, मंगरुळपीरमध्ये ७४.९, मानोºयात ६०.५ व कारंजा तालुक्यात ७१.३ टक्के पावसाची नोंद झाली. 

यवतमाळ जिल्हा सरासरी ६० टक्केयवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी आर्णी तालुक्यात ७९.६ टक्के असा उच्चांकी पाऊस नोंदविला गेला. १६ पैकी एकाही तालुक्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत पुरेपूर पाऊस पडला नाही. पावसाचा केवळ आठवडा शिल्लक असताना यवतमाळ तालुक्यात केवळ ४२ टक्केच पाऊस पडला. कळंब, दारव्हा, केळापूर, घाटंजी, राळेगाव, झरी जामणी या तालुक्यांत पाऊस ५२ टक्क्यांवर स्थिरावला. १२० दिवसांच्या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ४३ टक्के तूट नोंदविली गेली. गतवर्षीही यवतमाळ जिल्ह्यावरच पाऊस रुसला होता. सलग दुसºया वर्षी यवतमाळात पावसाची तूट नोंदविली गेली.