शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

२० तलाठी कार्यालयांची ‘बत्ती गूल’

By admin | Updated: April 28, 2017 00:12 IST

नागरिकांची गैरसोय होऊ नये, शेतकऱ्यांना गरज भासल्यास शासकीय कागदपत्रांची पूर्तता वेळेवर व्हावी,

 वर्षभरापासून वीजपुरवठा खंडित : वीज देयकांसाठी तरतूद केव्हा? नांदगाव खंडेश्वर : नागरिकांची गैरसोय होऊ नये, शेतकऱ्यांना गरज भासल्यास शासकीय कागदपत्रांची पूर्तता वेळेवर व्हावी, यासाठी शासनाने अनेक ठिकाणी स्वतंत्र तलाठी कार्यालये उभारली आहेत. परंतु या कार्यालयात वीज पुरवठ्यासाठी शासनाने कोणतीही तरतूद न केल्याने वीज बिल न भरल्याने वर्षभरापासून तालुक्यातील २० तलाठी कार्यालयांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे. अनेक ठिकाणचे मीटरसुद्धा काढण्यात आल्याने प्रचंड उन्हाच्या कडाक्यात तलाठ्यांची प्रचंड दमछाक होत आहे. शासनाने कोट्यवधी रूपये खर्चून तालुक्यात नांदगाव खंडेश्वर, धानोरा गुरव, पापळ, वाढोणा रामनाथ, पिंप्री गावंडा, पिंप्री निपाणी, सावनेर, तळेगाव, मंगरूळ चव्हाळा, शिवणी, शिरपूर, सालोड, लोहगाव इत्यादी ठिकाणी तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारती तयार करण्यात आल्यात. यापैकी अनेक कार्यालयात वर्षभरापूर्वी मीटर बसविण्यात आलेत. पण, वर्षभरात वीज देयकाची रक्कम न भरल्याने महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करून मीटर काढून नेले. काही ठिकाणी सहा महिन्यांपासून वीज देयक न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. याबाबत तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता तलाठी कार्यालयाच्या वीज देयकांसाठी तरतूदच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे बांधकामासाठी पैसा आहे. परंतु वीज देयके भरण्यासाठी नाही, अशी अवस्था तहसील कार्यालयांची झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)