शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

कांडली ग्रामपंचायतीला २ लाख ३० हजारांचा दंड

By admin | Updated: February 12, 2015 00:22 IST

शहरालगत असलेल्या २२ हजार लोकसंख्येच्या कांडली ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप ग्रामस्थ अनेक दिवसांपासून करीत आहेत.

परतवाडा : शहरालगत असलेल्या २२ हजार लोकसंख्येच्या कांडली ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप ग्रामस्थ अनेक दिवसांपासून करीत आहेत. त्यातील कित्येक नागरिकांनी त्यासाठी आजवर ग्रामपंचायत तसेच वरिष्ठांना हजारो तक्रारी पाठविल्या असेल. त्याचा परिपाठ म्हणून या ग्रामपंचायतीला २०१०-११ मध्ये गावात बांधकाम केलेल्या खडीकरण नालीमध्ये तस्करीचे गौणखनीज वापरल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर येथील तालुका दंडाधिकाऱ्यांनी या ग्रामपंचायतीला २ लाख ३० हजारांचा दंड ठोठावला आहे. बांधकाम केलेल्या कालावधीत तालुक्यातील बाळूघाटांवरील वाळू उपस्याला बंदी असल्याने सदर कारवाई केली आहे. अचलपूर तालुक्यातील विविध रेतीघाटांचा हर्रास न झाल्याने वाळूवर बंदी होती. मात्र तरीही २०१०-११ मध्ये कांडली ग्रामपंचायतीने गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी चोरट्या मार्गाने गौणखनीज वापरले होते. याबाबतची तक्रारी येथील सामाजिक कार्यकर्ते जी.एम. गावंडे यांनी येथील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे दोषी आढळून आले. त्यामुळे वरील दंड ठोठावण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे सदर कामाची निविदा ग्रामपंचायतीने बंद पडलेल्या येथील एका वर्तमानपत्रात १६ मे १९१० मध्ये प्रकाशित केली होती. ही निविदा ग्रामस्थ व २०१० च्या विशेष सभेसमोर ठेवून त्याचे वाचन करण्यात आले. तेव्हा सदस्यांमधील मतभेदामुळे एकही निविदा आली नसल्याचे सांगत तसा खोटा ठराव करुन त्यानंतर एका दैनिकात पुन्हा निविदा प्रसिद्ध करुन ११ जून २०१० रोजी सदर निविदा उघडण्यात आल्या. यामुळे बांधकामाची निविदा प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. या नियमबाह्य प्रक्रियेबाबत अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडेही लेखी तक्रारी झाल्याने त्यांनी चौकशी करुन गटविकास अधिकाऱ्यांवर १२ हजार २१४ रुपयांची वसुली काढली होती. कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याचा आरोप गावंडे व व्ही.के. कोथळकर यांनी केला होता. वाळू व बदरी या गौणखनिजाची वाहतूक झालेल्या वाहनांचे क्रमांक हे दुचाकीचे असल्याचे निष्पन्न झाल्याचे यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीला त्यावेळी मोठा आधार मिळाला होता. कांडली ग्रामपंचायतीने शासनाची दिशाभूल करणे येथेच थांबविले नाही. वाहतूक परवाने जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या शिक्क्यासह प्रमाणित केले. त्याचा उपयोग करुन शासनाची दिशाभूल झाल्याचे पुरावे तपास यंत्रणेला प्राप्त झाले. त्यामुळे सरपंच व ग्रामविकास अधिकारी व सदस्यांकडून दंडाचे २ लाख ३० हजार ४०० रुपये व्याजासह वसूल केले जावे, अशी मागणी त्यांनी केली होती. गौणखनीजाचा उपयोग केल्यामुळे २५ मार्च २०११ रोजी ५२ हजार ८०० रुपयांचा दंड ग्रामपंचायत कांडलीला ठोठावला होता. त्यावर समाधान न झाल्याने येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्यांनी अपील दाखल केले होते. त्यावरुन त्यांनी २८८ ब्रास वाळू व बदरी नियमबाह्य वापरल्याचा ठपका ठेवला होता. त्यावरुन ६ २०११ रोजी एक आदेश पारित करुन ग्रामपंचायतीला २ लाख ३० हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावला. या आदेशाच्या विरोधात ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. मात्र त्यांनी ५ जून २०१३ ला एक आदेश पारित करुन स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत ग्रामपंचायत कांडलीला दंड भरण्याचे आदेश दिले.