शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

१९ हजार शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

By admin | Updated: June 27, 2017 00:03 IST

जिल्ह्यातील तूर खरेदीचे शासकीय केंद्र दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच १० जूनपासून बंद आहे.

दोन आठवड्यांपासून केंद्र बंद : चार लाख क्विंटल तूर घरी पडूनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील तूर खरेदीचे शासकीय केंद्र दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच १० जूनपासून बंद आहे. ृटोकन दिलेल्या १९ हजार शेतकऱ्यांची चार लाख १६ हजार क्विंटल तूर खरेदी अभावी अद्याप शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. कर्ज थकीत असल्याने बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देत नाहीत. तुरीचे महिनाभरापूर्वीचे चुकारे नाहीत. शेतकरी अडचणीत असताना केंद्रांना मुदतवाढीचे आश्वासन देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.केंद्र शासनाने जिल्ह्यासह राज्यातील तूर खरेदी केंद्रांना १० जून पर्यंत १५ हजार मेट्रिक टन तूर खरेदीची परवानगी दिली होती. यामुदतीत बाजार समितीमध्ये उघड्यावरील तूर खरेदी करण्यात आली व उर्वरित शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन त्या शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. पावसाळी वातावरण असल्याने तूर ओली होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना घरीच तूर ठेवण्यास सांगण्यात आले असून त्यांना तूर खरेदीचा अनुक्रमांक आल्यानंतर बाजार समितीव्दारा फोन करण्यात येईल, त्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणावी, असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी निश्चिंत झाले. याकालावधीत यंत्रणेव्दारा बाजार समितीच्या मार्केट यार्डात असलेली तूर खरेदी करण्यात आली. व्यापाऱ्यांद्वारा बेभाव खरेदीअमरावती : टोकन दिलेल्या व शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या तुरीच्या खरेदीसाठी फोन न करताच शासकीय खरेदी केंद्रे बंद करण्यात आली. पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत असताना शासनाने फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.शासनाने काही प्रमाणात कर्जमाफी केली असली तरी याविषयीचे आदेश बँकाना अद्याप प्राप्त नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख ३३ हजार शेतकऱ्यांना थकीत संबोधून बँकाव्दारा कर्ज नाकारले जात आहे. मे महिन्यातील तुरीचे चुकारे अद्याप व्हायचे आहेत. अशा स्थितीत चार लाख १६ हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेत व्यापारी मातीमोल भावाने तुरीची खरेदी करीत असल्याचे विदारक चित्र आहे.खरेदी बाकी असलेल्या तुरीची स्थितीअचलपूर तालुक्यात टोकन दिलेल्या १,७९५ शेतकऱ्यांची ३७,१५२ क्विंटल, अमरावती ३,६५० शेतकऱ्यांची १,०२,४६९, अंजनगाव सुर्जी २,१४० शेतकऱ्यांची ३५,६०७, चांदूरबाजार १,२३३ शेतकऱ्यांची २५,६११,चांदूररेल्वे १,७६९ शेतकऱ्यांची ३३,९७२, दर्यापूर २,७३८ शेतकऱ्यांची ७४,०५६, धामणगाव ३३३ शेतकऱ्यांची ११,५७३, धारणी ७४ शेतकऱ्यांची १,१६४, मोर्शी १,९१५ शेतकऱ्यांची ३४,३४५, नांदगाव खंडेश्वर १,७९२ शेतकऱ्यांची २१,१५३ व वरूड केंद्रावर २६४ शेतकऱ्यांची २,१४४ क्विंटल तूर खरेदीअभावी घरी पडून आहे.