शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

१९ हजार शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

By admin | Updated: June 27, 2017 00:03 IST

जिल्ह्यातील तूर खरेदीचे शासकीय केंद्र दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच १० जूनपासून बंद आहे.

दोन आठवड्यांपासून केंद्र बंद : चार लाख क्विंटल तूर घरी पडूनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील तूर खरेदीचे शासकीय केंद्र दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच १० जूनपासून बंद आहे. ृटोकन दिलेल्या १९ हजार शेतकऱ्यांची चार लाख १६ हजार क्विंटल तूर खरेदी अभावी अद्याप शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. कर्ज थकीत असल्याने बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देत नाहीत. तुरीचे महिनाभरापूर्वीचे चुकारे नाहीत. शेतकरी अडचणीत असताना केंद्रांना मुदतवाढीचे आश्वासन देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.केंद्र शासनाने जिल्ह्यासह राज्यातील तूर खरेदी केंद्रांना १० जून पर्यंत १५ हजार मेट्रिक टन तूर खरेदीची परवानगी दिली होती. यामुदतीत बाजार समितीमध्ये उघड्यावरील तूर खरेदी करण्यात आली व उर्वरित शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन त्या शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. पावसाळी वातावरण असल्याने तूर ओली होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना घरीच तूर ठेवण्यास सांगण्यात आले असून त्यांना तूर खरेदीचा अनुक्रमांक आल्यानंतर बाजार समितीव्दारा फोन करण्यात येईल, त्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणावी, असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी निश्चिंत झाले. याकालावधीत यंत्रणेव्दारा बाजार समितीच्या मार्केट यार्डात असलेली तूर खरेदी करण्यात आली. व्यापाऱ्यांद्वारा बेभाव खरेदीअमरावती : टोकन दिलेल्या व शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या तुरीच्या खरेदीसाठी फोन न करताच शासकीय खरेदी केंद्रे बंद करण्यात आली. पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत असताना शासनाने फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.शासनाने काही प्रमाणात कर्जमाफी केली असली तरी याविषयीचे आदेश बँकाना अद्याप प्राप्त नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख ३३ हजार शेतकऱ्यांना थकीत संबोधून बँकाव्दारा कर्ज नाकारले जात आहे. मे महिन्यातील तुरीचे चुकारे अद्याप व्हायचे आहेत. अशा स्थितीत चार लाख १६ हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेत व्यापारी मातीमोल भावाने तुरीची खरेदी करीत असल्याचे विदारक चित्र आहे.खरेदी बाकी असलेल्या तुरीची स्थितीअचलपूर तालुक्यात टोकन दिलेल्या १,७९५ शेतकऱ्यांची ३७,१५२ क्विंटल, अमरावती ३,६५० शेतकऱ्यांची १,०२,४६९, अंजनगाव सुर्जी २,१४० शेतकऱ्यांची ३५,६०७, चांदूरबाजार १,२३३ शेतकऱ्यांची २५,६११,चांदूररेल्वे १,७६९ शेतकऱ्यांची ३३,९७२, दर्यापूर २,७३८ शेतकऱ्यांची ७४,०५६, धामणगाव ३३३ शेतकऱ्यांची ११,५७३, धारणी ७४ शेतकऱ्यांची १,१६४, मोर्शी १,९१५ शेतकऱ्यांची ३४,३४५, नांदगाव खंडेश्वर १,७९२ शेतकऱ्यांची २१,१५३ व वरूड केंद्रावर २६४ शेतकऱ्यांची २,१४४ क्विंटल तूर खरेदीअभावी घरी पडून आहे.