शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

१९ हजार शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

By admin | Updated: June 27, 2017 00:03 IST

जिल्ह्यातील तूर खरेदीचे शासकीय केंद्र दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच १० जूनपासून बंद आहे.

दोन आठवड्यांपासून केंद्र बंद : चार लाख क्विंटल तूर घरी पडूनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील तूर खरेदीचे शासकीय केंद्र दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच १० जूनपासून बंद आहे. ृटोकन दिलेल्या १९ हजार शेतकऱ्यांची चार लाख १६ हजार क्विंटल तूर खरेदी अभावी अद्याप शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. कर्ज थकीत असल्याने बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देत नाहीत. तुरीचे महिनाभरापूर्वीचे चुकारे नाहीत. शेतकरी अडचणीत असताना केंद्रांना मुदतवाढीचे आश्वासन देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.केंद्र शासनाने जिल्ह्यासह राज्यातील तूर खरेदी केंद्रांना १० जून पर्यंत १५ हजार मेट्रिक टन तूर खरेदीची परवानगी दिली होती. यामुदतीत बाजार समितीमध्ये उघड्यावरील तूर खरेदी करण्यात आली व उर्वरित शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन त्या शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. पावसाळी वातावरण असल्याने तूर ओली होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना घरीच तूर ठेवण्यास सांगण्यात आले असून त्यांना तूर खरेदीचा अनुक्रमांक आल्यानंतर बाजार समितीव्दारा फोन करण्यात येईल, त्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणावी, असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी निश्चिंत झाले. याकालावधीत यंत्रणेव्दारा बाजार समितीच्या मार्केट यार्डात असलेली तूर खरेदी करण्यात आली. व्यापाऱ्यांद्वारा बेभाव खरेदीअमरावती : टोकन दिलेल्या व शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या तुरीच्या खरेदीसाठी फोन न करताच शासकीय खरेदी केंद्रे बंद करण्यात आली. पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत असताना शासनाने फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.शासनाने काही प्रमाणात कर्जमाफी केली असली तरी याविषयीचे आदेश बँकाना अद्याप प्राप्त नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख ३३ हजार शेतकऱ्यांना थकीत संबोधून बँकाव्दारा कर्ज नाकारले जात आहे. मे महिन्यातील तुरीचे चुकारे अद्याप व्हायचे आहेत. अशा स्थितीत चार लाख १६ हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेत व्यापारी मातीमोल भावाने तुरीची खरेदी करीत असल्याचे विदारक चित्र आहे.खरेदी बाकी असलेल्या तुरीची स्थितीअचलपूर तालुक्यात टोकन दिलेल्या १,७९५ शेतकऱ्यांची ३७,१५२ क्विंटल, अमरावती ३,६५० शेतकऱ्यांची १,०२,४६९, अंजनगाव सुर्जी २,१४० शेतकऱ्यांची ३५,६०७, चांदूरबाजार १,२३३ शेतकऱ्यांची २५,६११,चांदूररेल्वे १,७६९ शेतकऱ्यांची ३३,९७२, दर्यापूर २,७३८ शेतकऱ्यांची ७४,०५६, धामणगाव ३३३ शेतकऱ्यांची ११,५७३, धारणी ७४ शेतकऱ्यांची १,१६४, मोर्शी १,९१५ शेतकऱ्यांची ३४,३४५, नांदगाव खंडेश्वर १,७९२ शेतकऱ्यांची २१,१५३ व वरूड केंद्रावर २६४ शेतकऱ्यांची २,१४४ क्विंटल तूर खरेदीअभावी घरी पडून आहे.