शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

विदर्भातील वाघांच्या संरक्षणासाठी १९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 2:39 PM

सन २००६ पासून वाघांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या अधिवासात बदल होत आहे. त्यामुळे राज्याचा वनविभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांनी संयुक्तपणे राज्याच्या वाघांचे सूक्ष्म संशोधन चालविले आहे. यात पुढील १० वर्षांचे टार्गेट निश्चित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने विदर्भातील पाच व्याघ्र प्रकल्पांच्या नियोजनासाठी १९ कोटींचा निधी वितरित केला आहे. वाघांचे संरक्षण, भक्ष्य, अधिवास, लिंग प्रमाण या बाबींच्या अनुषंगाने पुढील १० वर्षांकरिता नियोजन करण्यात येणार आहे.मेळघाट, पेंच, नवेगाव- नागझिरा, बोर, ताडोबा-अंधारी या पाच व्याघ्र प्रकल्पांतील वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन व्याघ्र संरक्षणाचा अंदाज बांधला जाणार आहे. सन २००६ पासून वाघांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या अधिवासात बदल होत आहे. त्यामुळे राज्याचा वनविभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांनी संयुक्तपणे राज्याच्या वाघांचे सूक्ष्म संशोधन चालविले आहे. यात पुढील १० वर्षांचे टार्गेट निश्चित करण्यात आले आहे. एकाच विभागात वाघांची वाढती संख्या ही बाब नैसर्गिक आणि वन्यजिवांच्या दृष्टिने मोठी समस्या ठरणारी आहे. परिणामी वन्यप्राणी आणि मानव यांच्यात संघर्षाची ठिगणी पडत आहे. एकाच अधिवासात वाघांची संख्या असल्यामुळे त्यांचे संवर्धन, संरक्षण आणि भक्ष्याबाबतची मोठी समस्या व्याघ्र प्रकल्पांसमोर उभी ठाकली आहे. वाघांच्या स्थलांतरणाचा प्रस्ताव असून, त्या दिशेने व्याघ्र प्रकल्पांनी पाऊल उचलले आहे. वाघांच्या संरक्षणासाठी होणाऱ्या अभ्यासाचा पुढील टप्पा वाघिण आणि तिच्या बछड्यांना दीड वर्षांनंतर ध्वनिलहरी (कॉलर आयडी) संच बसविले जाणार आहे. त्यामुळे वाघ कुठे जातात, नवा अधिवास कोठे शोधतात, हे सहजतेने कळेल. तशी तयारी वन विभागाने चालविली आहे. वाघांचा अभ्यास करताना अधिवासाचे चार श्रेणीत वर्गीकरण करण्यात येणार आहे. यात संघर्ष होत नसलेला विभाग, मोकळी जागा (बफर झोन), मानवाचा अत्यल्प वावर, वन्यजिवांचे क्षेत्र ज्यात संघर्षाची शक्यता असेल आणि शेती क्षेत्र ज्यात मानव आणि वाघ यांच्यात संघर्षाची शक्यता अशी विभागणी केली जाणार आहे.

वाघांसह अन्य वन्यजिवांचे संरक्षणाला प्राधान्यविदर्भातील पाच व्याघ्र प्रकल्पांत वाघांच्या संरक्षणासह अन्य वन्यजिवांचे अधिवास, संरक्षणाचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. यात रानगवा, अस्वल, रानकुत्री, हरिण, चौसिंगा, रानडुक्कर आदींच्या संवर्धनावर भर असणार आहे. तथापि, फोकस वाघांवरच ठेवण्यात येणार आहे.एकाच पट्ट्यात वाघांची वाढती संख्या ही मोठी समस्या आहे. त्यामुळे वाघांचे इतरत्र स्थलांतरण होणे ही काळाची गरज आहे. परिणामी वन्यजिवांचे अधिवास सक्षम होतील.- नितीन काकोडकर, मुख्य प्रवर्तक, वन्यजीव विभाग.

टॅग्स :Tigerवाघ