शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीला ‘एनडीआरएफ’चे १८३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 21:07 IST

गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.४८ टक्के क्षेत्रातील कपाशीचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाल्याचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला.

ठळक मुद्देबोंडअळीचे नुकसान : ८९.४८ टक्के क्षेत्रात प्रादुर्भाव, शासनाला अहवाल

आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.४८ टक्के क्षेत्रातील कपाशीचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाल्याचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला. त्याअनुषंगाने जिरायती व बागायती क्षेत्रातील बाधित कपाशीच्या मदतीसाठी केंद्राच्या ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे १८२ कोटी २६ लाखांच्या मदतीची मागणी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शासनाकडे केली आहे.यंदाच्या हंगामात २ लाख २१ हजार ४१५ शेतकºयांनी २ लाख २२ हजार ५८६ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केली. मात्र, आॅक्टोबर महिन्यात आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या संकटाने ८९.४८ टक्के म्हणजेच १ लाख ९९ हजार १७२ हेक्टर क्षेत्रात कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायती कपाशीचे १ लाख ३० हजार ८२९ हेक्टर, तर बागायती कपाशीचे ६८ हजार ३४३ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ६८०० रुपये याप्रमाणे ८९ कोटी ६१ लाख ११ हजार, तर बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये याप्रमाणे ९२ कोटी ९८ लाख ९२ हजारांची मदत आवश्यक आहे. हे नुकसान केंद्राच्या नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी पात्र आहे.बियाणे कंपन्यांकडून भरपाई व ‘एनडीआरएफ’ची मदत मिळावी, यासाठी गुलाबी बोंड अळीने बाधित क्षेत्र पंचनाम्याचे आदेश ७ डिसेंबरला जिल्ह्यधिकाºयांनी सर्व तालुका यंत्रणांना देऊन अहवाल मागविला. ५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कपाशीच्या बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या अनुषंगाने कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व तुडतुड्यांमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव सु.ह. उमरीकर यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाºयांना दिलेत. याच पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सर्व तहसीलदार, बीडीओ व तालुका कृषी अधिकारी यांना बाधित कपाशीचे पंचनामे करून संयुक्त अहवाल मागविला होता. हा अहवाल सोमवारी विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला व त्यानंतर शासनाला सादर होणार आहे. बोंड अळीबाधित क्षेत्राचे अहवाल सादर झाल्यानंतर राज्य शासन केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव सादर करणार आहे. त्यानंतरच अटी-शर्तींच्या निकषामध्ये केंद्राची मदत प्राप्त होणार आहे.जिल्ह्यात १.९१ लाख हेक्टर बाधितबोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार १७२ हेक्टरचे नुकसान झाले आहे. दर्यापूर तालुक्यात २६,५०३ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६,१७१, अमरावती ५,९८०, चांदूर बाजार १४,४०८, भातकुली ७,२३५, अंजनगाव सुर्जी १४,८८७, धारणी ९,६६१, चिखलदरा १,२२७, चांदूर रेल्वे ९,१६५, धामणगाव रेल्वे ३२,३०४, मोर्शी १९,३३९, वरूड २३,६०८, तिवसा १२,०९० व अचलपूर तालुक्यात २३,६०८ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा अहवाल आहे.तालुकानिहाय आवश्यक भरपाईजिल्ह्यात बोंड अळीमुळे १८२ कोटी २६ लाख रूपयांची मदत आवश्यक आहे. यामध्ये भातकुली तालुक्यात ५.५० कोटी, अमरावती ७.५५ कोटी, चांदूर रेल्वे ६.१८ कोटी, धामणगाव रेल्वे २१.९४ कोटी, नांदगाव खंडेश्वर ७.८६ कोटी, मोर्शी १९.२२ कोटी, वरूड २७.९४ कोटी, चांदूर बाजार १५.३४ कोटी, तिवसा १२.६३ कोटी, अचलपूर १८.७१ कोटी, अंजनगाव सुर्जी १४.९१ कोटी, दर्यापूर १६.९७ कोटी, धारणी ६.७७ कोटी व चिखलदरा तालुक्यात १ कोटी रुपयांची मदत आवश्यक आहे.