शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कपाशीला ‘एनडीआरएफ’चे १८३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 21:07 IST

गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.४८ टक्के क्षेत्रातील कपाशीचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाल्याचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला.

ठळक मुद्देबोंडअळीचे नुकसान : ८९.४८ टक्के क्षेत्रात प्रादुर्भाव, शासनाला अहवाल

आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.४८ टक्के क्षेत्रातील कपाशीचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाल्याचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला. त्याअनुषंगाने जिरायती व बागायती क्षेत्रातील बाधित कपाशीच्या मदतीसाठी केंद्राच्या ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे १८२ कोटी २६ लाखांच्या मदतीची मागणी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शासनाकडे केली आहे.यंदाच्या हंगामात २ लाख २१ हजार ४१५ शेतकºयांनी २ लाख २२ हजार ५८६ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केली. मात्र, आॅक्टोबर महिन्यात आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या संकटाने ८९.४८ टक्के म्हणजेच १ लाख ९९ हजार १७२ हेक्टर क्षेत्रात कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायती कपाशीचे १ लाख ३० हजार ८२९ हेक्टर, तर बागायती कपाशीचे ६८ हजार ३४३ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ६८०० रुपये याप्रमाणे ८९ कोटी ६१ लाख ११ हजार, तर बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये याप्रमाणे ९२ कोटी ९८ लाख ९२ हजारांची मदत आवश्यक आहे. हे नुकसान केंद्राच्या नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी पात्र आहे.बियाणे कंपन्यांकडून भरपाई व ‘एनडीआरएफ’ची मदत मिळावी, यासाठी गुलाबी बोंड अळीने बाधित क्षेत्र पंचनाम्याचे आदेश ७ डिसेंबरला जिल्ह्यधिकाºयांनी सर्व तालुका यंत्रणांना देऊन अहवाल मागविला. ५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कपाशीच्या बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या अनुषंगाने कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व तुडतुड्यांमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव सु.ह. उमरीकर यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाºयांना दिलेत. याच पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सर्व तहसीलदार, बीडीओ व तालुका कृषी अधिकारी यांना बाधित कपाशीचे पंचनामे करून संयुक्त अहवाल मागविला होता. हा अहवाल सोमवारी विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला व त्यानंतर शासनाला सादर होणार आहे. बोंड अळीबाधित क्षेत्राचे अहवाल सादर झाल्यानंतर राज्य शासन केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव सादर करणार आहे. त्यानंतरच अटी-शर्तींच्या निकषामध्ये केंद्राची मदत प्राप्त होणार आहे.जिल्ह्यात १.९१ लाख हेक्टर बाधितबोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार १७२ हेक्टरचे नुकसान झाले आहे. दर्यापूर तालुक्यात २६,५०३ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६,१७१, अमरावती ५,९८०, चांदूर बाजार १४,४०८, भातकुली ७,२३५, अंजनगाव सुर्जी १४,८८७, धारणी ९,६६१, चिखलदरा १,२२७, चांदूर रेल्वे ९,१६५, धामणगाव रेल्वे ३२,३०४, मोर्शी १९,३३९, वरूड २३,६०८, तिवसा १२,०९० व अचलपूर तालुक्यात २३,६०८ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा अहवाल आहे.तालुकानिहाय आवश्यक भरपाईजिल्ह्यात बोंड अळीमुळे १८२ कोटी २६ लाख रूपयांची मदत आवश्यक आहे. यामध्ये भातकुली तालुक्यात ५.५० कोटी, अमरावती ७.५५ कोटी, चांदूर रेल्वे ६.१८ कोटी, धामणगाव रेल्वे २१.९४ कोटी, नांदगाव खंडेश्वर ७.८६ कोटी, मोर्शी १९.२२ कोटी, वरूड २७.९४ कोटी, चांदूर बाजार १५.३४ कोटी, तिवसा १२.६३ कोटी, अचलपूर १८.७१ कोटी, अंजनगाव सुर्जी १४.९१ कोटी, दर्यापूर १६.९७ कोटी, धारणी ६.७७ कोटी व चिखलदरा तालुक्यात १ कोटी रुपयांची मदत आवश्यक आहे.