शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

१८ टक्के नागरिक पितात दूषित पाणी

By admin | Updated: November 11, 2014 22:31 IST

जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोतांच्या नमुने तपासणीमध्ये १८ टक्के पाणी दूषित आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाणी शुध्दीकरणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे

जिल्ह्यात आजार वाढले : पाणी शुद्धीकरणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्षवैभव बाबरेकर - अमरावतीअमरावती : जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोतांच्या नमुने तपासणीमध्ये १८ टक्के पाणी दूषित आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाणी शुध्दीकरणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे जिल्ह्यात विविध आजार वाढत आहेत. पाणी हे जीवन आहे. अन्नाशिवाय माणूस काही दिवस तग धरु शकतो. मात्र पाण्याशिवाय माणुस जिवंत राहणे कठीणच. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते ८० टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. शासनास्तरावर दूषित पाण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्याकरिता विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. मात्र काही वर्षात जिल्ह्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचप्रमाणे दूषित पाण्यामुळे निर्माण होणारे आजारही वाढत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात ५ हजारांवर पाण्याचे स्त्रोत आहेत. यापैकी काही पाण्याच्या स्त्रोतातील नमुन्यांची अनुजीव तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेत केली जाते. काही वर्र्षांमध्ये प्रयोग शाळेत तपासणीकरिता आलेल्या पाणी स्त्रोतामध्ये १५ टक्क्यांच्यावर पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. हे पाणी पिल्याने सर्वाधिक आजार बळावण्याची शक्यता असते. दूषित पाण्यामुळे जिल्ह्याभरात आरोग्य समस्य उद्भवली आहे. जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेत आॅक्टोबर महिन्यात २ हजार ३६८ पाण्याचे नमुने तपासणीकरिता आले होते. त्यापैकी ४३३ पाण्याचे नमुने दूषित आढळले असून ही टक्केवारी १८.२८ असल्याचे प्रयोग शाळेतील तज्ज्ञांनी सांगितले.२६२ गावांमध्ये दूषित पाणीजिल्हा परिषेदेच्या पाणीपुरवठा विभागातंर्गत ग्रामीण भागातील पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यात ८१९ गावे असून त्यापैकी २६२ गावांमधील पाणी स्त्रोताचे नमुने दूषित आढळून आले आहेत. ५ लाख ४० हजार नागरिक पितात दूषित पाणीअमरावती जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेच्या अहवालानुसार १८. २८ टक्के पाणी दूषित आढळून आले आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे ५ लाख ४० हजार नागरिक दूषित पाणी पित असावे, असा अंदाज काही तज्ज्ञांनी काढला आहे.