शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

१८ टक्के नागरिक पितात दूषित पाणी

By admin | Updated: November 11, 2014 22:31 IST

जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोतांच्या नमुने तपासणीमध्ये १८ टक्के पाणी दूषित आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाणी शुध्दीकरणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे

जिल्ह्यात आजार वाढले : पाणी शुद्धीकरणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्षवैभव बाबरेकर - अमरावतीअमरावती : जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोतांच्या नमुने तपासणीमध्ये १८ टक्के पाणी दूषित आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाणी शुध्दीकरणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे जिल्ह्यात विविध आजार वाढत आहेत. पाणी हे जीवन आहे. अन्नाशिवाय माणूस काही दिवस तग धरु शकतो. मात्र पाण्याशिवाय माणुस जिवंत राहणे कठीणच. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते ८० टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. शासनास्तरावर दूषित पाण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्याकरिता विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. मात्र काही वर्षात जिल्ह्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचप्रमाणे दूषित पाण्यामुळे निर्माण होणारे आजारही वाढत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात ५ हजारांवर पाण्याचे स्त्रोत आहेत. यापैकी काही पाण्याच्या स्त्रोतातील नमुन्यांची अनुजीव तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेत केली जाते. काही वर्र्षांमध्ये प्रयोग शाळेत तपासणीकरिता आलेल्या पाणी स्त्रोतामध्ये १५ टक्क्यांच्यावर पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. हे पाणी पिल्याने सर्वाधिक आजार बळावण्याची शक्यता असते. दूषित पाण्यामुळे जिल्ह्याभरात आरोग्य समस्य उद्भवली आहे. जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेत आॅक्टोबर महिन्यात २ हजार ३६८ पाण्याचे नमुने तपासणीकरिता आले होते. त्यापैकी ४३३ पाण्याचे नमुने दूषित आढळले असून ही टक्केवारी १८.२८ असल्याचे प्रयोग शाळेतील तज्ज्ञांनी सांगितले.२६२ गावांमध्ये दूषित पाणीजिल्हा परिषेदेच्या पाणीपुरवठा विभागातंर्गत ग्रामीण भागातील पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यात ८१९ गावे असून त्यापैकी २६२ गावांमधील पाणी स्त्रोताचे नमुने दूषित आढळून आले आहेत. ५ लाख ४० हजार नागरिक पितात दूषित पाणीअमरावती जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेच्या अहवालानुसार १८. २८ टक्के पाणी दूषित आढळून आले आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे ५ लाख ४० हजार नागरिक दूषित पाणी पित असावे, असा अंदाज काही तज्ज्ञांनी काढला आहे.