शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

१८ घरकुले, २ सिंचन विहिरी अन् ६४ शौचालये बोगस; कारवाई होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:12 IST

Amravati : तळेगाव दशासर ग्रा.पं.चा प्रताप; सीईओंद्वारा गठित चौकशी समितीचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धामणगाव रेल्वे दशासर तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायतीत सन २०२० ते २०२४ या दरम्यान १८ घरकुले, २ सिंचन विहिरी आणि ६४ शौचालये बोगस आढळून आली आहेत. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या निर्देशानुसार गठित चौकशी समितीचा हा अहवाल असून २० लाखांपेक्षा जास्त शासन निधीचा अपहार झाला आहे. असे असताना जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत यातील दोषींवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे संशय बळावला आहे.

तळेगाव दशासर येथे २९ मे २०२५ रोजी विशेष ग्रामसभा बोलावून स्वच्छ भारत मिशन व सिंचन विहीर यासह १४ व १५ वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या विकासकामात घोटाळ्याबाबत चौकशी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. तसा ठराव ग्रामसभेने पारितदेखील केला होता. परंतु, ग्रामपंचायतीने याविषयी कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी या विषयाला वाचा फोडण्यासाठी १० जून २०२५ रोजी तळेगाव दशासर ग्रामपंचायतीसमोर अशोकराव धनजोळे, संजय सारवे, रमेशराव ठवकर, अमर सुरजुसे, अतिश कावळे, पुंडलिकराव बाबरे, शंकरराव शेलोकार, शंकरराव शिरभते बेमुदत उपोषण केले होते.

सलग चार दिवसांच्या उपोषणनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संजीता महापात्र यांचे पत्र आणि आमदार प्रताप अडसड यांच्या आश्वासानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरूड येथील चार अधिकाऱ्यांची १२ जून २०२५ रोजी समिती गठित करण्यात आली होती.

सीइओंना २५ जुलै रोजी चौकशी अहवाल सादरलेखी जबाब, रेकॉर्डची पडताळणी करून चौकशी समितीने सीईओंना २५ जुलै २०२५ रोजी प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. या समितीने ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष भेट दिली होती.

एकाच कुटुंबात पती-पत्नीसह तिघांना घरकुलचौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार सिंचन विहिरीचा लाभसधन व्यक्तीला देण्यात आला आहे. तर पती-पत्नीसह त्याच कुटुंबात तिघांना घरकुलाचा लाभ घेतला आहे. त्यामुळे शासन निधीचा गैरवापर करण्यात तळेगाव दशासर ग्राम पंचायतने कळस गाठल्याचा उल्लेख आहे. मनरेगा अंतर्गत विहिरींचा लाभ श्रीमंताना देण्यात आला आहे. या चौकशी समितीने १७ जून ते १७ जुलै २०२५ या दरम्यान ग्रामपंचायत दशासर येथे प्रत्यक्ष भेट देत तक्रारकर्त्यांचे बयाण नोंदविले होते.

"तळेगाव दशासर येथे ग्रामपंचायतीने शासन निधीत अपहार केल्याप्रकरणी चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून यात पडताळणी अंती जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल."- संजीता महापात्र, सीईओ, अमरावती. 

टॅग्स :Amravatiअमरावती