शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

३६ तासांपासून १७० गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2016 00:06 IST

महावितरण कंपनी मेळघाटातील जनतेशी खेळी चालविली आहे. १७० गावांतील लोकांना अंधारात ठेवण्याचा डाव रचल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे.

ग्राहक वेठीस : नवीन वीज वाहिनीच्या नावाखाली कुचंबणाश्यामकांत पाण्डेय धारणीमहावितरण कंपनी मेळघाटातील जनतेशी खेळी चालविली आहे. १७० गावांतील लोकांना अंधारात ठेवण्याचा डाव रचल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. हिवरखेड येथून १३२ के. व्ही. हिवरखेड उपकेंद्रातून निघणाऱ्या ३३ के. व्ही. धारणी वाहिनीवर दुरुस्ती व सुधारणेचे काम प्रस्तावित आहे. या कामासाठी ७ आॅगस्ट २०१६ पासून धारणी, गोंडवाडी, कढाव व डाबका उपकेंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या गावांचा वीजपुरवठा आठवड्यातील रविवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता महावितरण अचलपूर यांनी कळविले आहे. दिलेल्या वेळापत्रकाचे पालन न करता महावितरणद्वारे मनमानीपणे रात्रंदिवस वीजपुरवठा बंद ठेवला जात आहे. याबाबत विचारणा केल्यावर ‘ब्रेकडाऊन’ या नावाचा वापर करून ग्राहकांची सतत दिशाभूल केली जात आहे. याविषयी अधिक माहिती घेतली असता या ३३ के. व्ही. वाहिनीचे काम घेणाऱ्या कंत्राटदाराची कामाची मुदत संपल्याने त्याचेवर रोज एक ठराविक रक्कम दंड म्हणून आकारले जात असल्याचे कळते. त्यामुळे अधिक विलंब टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चिरीमिरी करून रात्रंदिवस वीजपुरवठा बंद ठेवून काम करण्याचा घाट कंत्राटदाराकडून रचला जात आहे.याबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळत नाही. मोठ्या मुश्किलीने झाला. मात्र उडवाउडवीची उत्तरे ग्राहकांना दिली जात आहेत. त्यामुळे कंत्राटदार व महावितरणाचे अधिकारी दरम्यान काहीतरी साटेलोटे सुरू असल्याच्या शंकेला बळ प्राप्त होते. महावितरण कंपनीविरोधात रोष रविवारी सकाळी ५ वाजतापासून वीजपुरवठा बंद करण्यात आले होते. वृत्त लिहेपर्यंत म्हणजेच दुपारी तीनपर्यंत वीज पुरवठा बंदच आहे. त्यामुळे धारणी व चिखलदरा तालुक्यातील १७० गावे काल रात्रभर अंधारात होता. त्यामुळे पाणी पुरवठा, दळण, संगणक व इतर महत्वाची कामे ठप्प पडली आहे. वेळेचा भान न ठेवता अतिरिक्त वीज पुरवठा बंद करण्यात येत असल्याने जनतेत महावितरण विरुद्ध रोषाचे वातावरण आहे.