शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

३६ तासांपासून १७० गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2016 00:06 IST

महावितरण कंपनी मेळघाटातील जनतेशी खेळी चालविली आहे. १७० गावांतील लोकांना अंधारात ठेवण्याचा डाव रचल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे.

ग्राहक वेठीस : नवीन वीज वाहिनीच्या नावाखाली कुचंबणाश्यामकांत पाण्डेय धारणीमहावितरण कंपनी मेळघाटातील जनतेशी खेळी चालविली आहे. १७० गावांतील लोकांना अंधारात ठेवण्याचा डाव रचल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. हिवरखेड येथून १३२ के. व्ही. हिवरखेड उपकेंद्रातून निघणाऱ्या ३३ के. व्ही. धारणी वाहिनीवर दुरुस्ती व सुधारणेचे काम प्रस्तावित आहे. या कामासाठी ७ आॅगस्ट २०१६ पासून धारणी, गोंडवाडी, कढाव व डाबका उपकेंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या गावांचा वीजपुरवठा आठवड्यातील रविवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता महावितरण अचलपूर यांनी कळविले आहे. दिलेल्या वेळापत्रकाचे पालन न करता महावितरणद्वारे मनमानीपणे रात्रंदिवस वीजपुरवठा बंद ठेवला जात आहे. याबाबत विचारणा केल्यावर ‘ब्रेकडाऊन’ या नावाचा वापर करून ग्राहकांची सतत दिशाभूल केली जात आहे. याविषयी अधिक माहिती घेतली असता या ३३ के. व्ही. वाहिनीचे काम घेणाऱ्या कंत्राटदाराची कामाची मुदत संपल्याने त्याचेवर रोज एक ठराविक रक्कम दंड म्हणून आकारले जात असल्याचे कळते. त्यामुळे अधिक विलंब टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चिरीमिरी करून रात्रंदिवस वीजपुरवठा बंद ठेवून काम करण्याचा घाट कंत्राटदाराकडून रचला जात आहे.याबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळत नाही. मोठ्या मुश्किलीने झाला. मात्र उडवाउडवीची उत्तरे ग्राहकांना दिली जात आहेत. त्यामुळे कंत्राटदार व महावितरणाचे अधिकारी दरम्यान काहीतरी साटेलोटे सुरू असल्याच्या शंकेला बळ प्राप्त होते. महावितरण कंपनीविरोधात रोष रविवारी सकाळी ५ वाजतापासून वीजपुरवठा बंद करण्यात आले होते. वृत्त लिहेपर्यंत म्हणजेच दुपारी तीनपर्यंत वीज पुरवठा बंदच आहे. त्यामुळे धारणी व चिखलदरा तालुक्यातील १७० गावे काल रात्रभर अंधारात होता. त्यामुळे पाणी पुरवठा, दळण, संगणक व इतर महत्वाची कामे ठप्प पडली आहे. वेळेचा भान न ठेवता अतिरिक्त वीज पुरवठा बंद करण्यात येत असल्याने जनतेत महावितरण विरुद्ध रोषाचे वातावरण आहे.