शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

३६ तासांपासून १७० गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2016 00:06 IST

महावितरण कंपनी मेळघाटातील जनतेशी खेळी चालविली आहे. १७० गावांतील लोकांना अंधारात ठेवण्याचा डाव रचल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे.

ग्राहक वेठीस : नवीन वीज वाहिनीच्या नावाखाली कुचंबणाश्यामकांत पाण्डेय धारणीमहावितरण कंपनी मेळघाटातील जनतेशी खेळी चालविली आहे. १७० गावांतील लोकांना अंधारात ठेवण्याचा डाव रचल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. हिवरखेड येथून १३२ के. व्ही. हिवरखेड उपकेंद्रातून निघणाऱ्या ३३ के. व्ही. धारणी वाहिनीवर दुरुस्ती व सुधारणेचे काम प्रस्तावित आहे. या कामासाठी ७ आॅगस्ट २०१६ पासून धारणी, गोंडवाडी, कढाव व डाबका उपकेंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या गावांचा वीजपुरवठा आठवड्यातील रविवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता महावितरण अचलपूर यांनी कळविले आहे. दिलेल्या वेळापत्रकाचे पालन न करता महावितरणद्वारे मनमानीपणे रात्रंदिवस वीजपुरवठा बंद ठेवला जात आहे. याबाबत विचारणा केल्यावर ‘ब्रेकडाऊन’ या नावाचा वापर करून ग्राहकांची सतत दिशाभूल केली जात आहे. याविषयी अधिक माहिती घेतली असता या ३३ के. व्ही. वाहिनीचे काम घेणाऱ्या कंत्राटदाराची कामाची मुदत संपल्याने त्याचेवर रोज एक ठराविक रक्कम दंड म्हणून आकारले जात असल्याचे कळते. त्यामुळे अधिक विलंब टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चिरीमिरी करून रात्रंदिवस वीजपुरवठा बंद ठेवून काम करण्याचा घाट कंत्राटदाराकडून रचला जात आहे.याबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळत नाही. मोठ्या मुश्किलीने झाला. मात्र उडवाउडवीची उत्तरे ग्राहकांना दिली जात आहेत. त्यामुळे कंत्राटदार व महावितरणाचे अधिकारी दरम्यान काहीतरी साटेलोटे सुरू असल्याच्या शंकेला बळ प्राप्त होते. महावितरण कंपनीविरोधात रोष रविवारी सकाळी ५ वाजतापासून वीजपुरवठा बंद करण्यात आले होते. वृत्त लिहेपर्यंत म्हणजेच दुपारी तीनपर्यंत वीज पुरवठा बंदच आहे. त्यामुळे धारणी व चिखलदरा तालुक्यातील १७० गावे काल रात्रभर अंधारात होता. त्यामुळे पाणी पुरवठा, दळण, संगणक व इतर महत्वाची कामे ठप्प पडली आहे. वेळेचा भान न ठेवता अतिरिक्त वीज पुरवठा बंद करण्यात येत असल्याने जनतेत महावितरण विरुद्ध रोषाचे वातावरण आहे.