शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

चौऱ्यामल गावाचा १७ वर्षांचा वनवास संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST

स्वतंत्र फीडरवरून पाणीपुरवठा सुरू : आदिवासींमध्ये आनंद चिखलदरा : पाणी असतानाही तहानलेले गाव अशी अवस्था असलेल्या तालुक्यातील आकी ग्रामपंचायत ...

स्वतंत्र फीडरवरून पाणीपुरवठा सुरू : आदिवासींमध्ये आनंद

चिखलदरा : पाणी असतानाही तहानलेले गाव अशी अवस्था असलेल्या तालुक्यातील आकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चौऱ्यामल गावाचा पाणीपुरवठा अखेर १७ वर्षांनंतर सुरळीत झाला आहे. आदिवासींनी हा पाणिलढा ‘लोकमत’च्या माध्यमातून जिंकला असून, पालकमंत्री यशोमती ठाकूर, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन केलेले कार्य आदिवासींमध्ये आनंद व्यक्त करणारे ठरले आहे.

एखाद्या चुकीच्या कामाचा फटका कसा बसतो, याचा प्रत्यय तालुक्यातील चौऱ्यामल गावातील आदिवासींना एक-दोन नव्हे, तब्बल सतरा वर्षे आला. गावापासून अडीच किलोमीटरवर शहानूर धरणाच्या तळाशी पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीतून पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आवश्यक असलेला विद्युतपुरवठा चुकीच्या पद्धतीने केला गेल्यामुळे उशाशी धरण असतानाही गाव मात्र तहानले असल्याचा हा प्रकार होता. ‘लोकमत’ने यासंदर्भात लोकदरबारात वृत्त प्रकाशित करून चौऱ्यामलवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला.

बॉक्स

विद्युत पुरवठ्याची होती मुख्य समस्या

चौऱ्यामल गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. अडीच किलोमीटर अंतरावर पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. विहिरीला भरपूर पाणीसुद्धा आहे. परंतु, टाके भरण्यासाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा महावितरणच्या कृषी फीडरवरून करण्यात आला होता. पावसाळा व इतर काही महिने हे फीडर बंद ठेवण्यात येते तेव्हा गावातील पाणीपुरवठाही बंद राहत होता. आदिवासींना नदी-नाल्याचे पाणी अडीच किलोमीटरपर्यंत पायपीट करीत भरावे लागत होते.

बॉक्स

डीपीसीतून १६ लक्ष ,समस्या दूर

जिल्ह्याच्या डीपीसी बैठकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आ. राजकुमार पटेल, समाजकल्याण सभापती दयाराम काळे, सरपंच राजेश जावरकर, सचिव ऋषीकेश राहाटे यांच्याकडे चौऱ्यामल पाणीपुरवठ्यासंदर्भात १६ लक्ष रुपये खर्चाचा मुद्दा मांडला होता. हा निधी मंजूर करण्यात आला व स्वतंत्र, नवीन विद्युत पुरवठा तेथे करण्यात आला. आता गावकऱ्यांना पाणी मिळू लागले आहे

कोट

आकी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चौऱ्यामल गावाच्या पाणीपुरवठ्याला १७ वर्षांपासून कृषी फीडरवरून वीजपुरवठा होत होता. पाणी असूनसुद्धा वीजपुरवठा नियमित नसल्यामुळे पाणीटंचाई भासत होती. परंतु, आता स्वतंत्र डीबी मिळाल्याने २४ तास पाणी मिळत आहे.

ऋषीकेश राहाटे, ग्रामसचिव, आकी