शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

चौऱ्यामल गावाचा १७ वर्षांचा वनवास संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST

स्वतंत्र फीडरवरून पाणीपुरवठा सुरू : आदिवासींमध्ये आनंद चिखलदरा : पाणी असतानाही तहानलेले गाव अशी अवस्था असलेल्या तालुक्यातील आकी ग्रामपंचायत ...

स्वतंत्र फीडरवरून पाणीपुरवठा सुरू : आदिवासींमध्ये आनंद

चिखलदरा : पाणी असतानाही तहानलेले गाव अशी अवस्था असलेल्या तालुक्यातील आकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चौऱ्यामल गावाचा पाणीपुरवठा अखेर १७ वर्षांनंतर सुरळीत झाला आहे. आदिवासींनी हा पाणिलढा ‘लोकमत’च्या माध्यमातून जिंकला असून, पालकमंत्री यशोमती ठाकूर, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन केलेले कार्य आदिवासींमध्ये आनंद व्यक्त करणारे ठरले आहे.

एखाद्या चुकीच्या कामाचा फटका कसा बसतो, याचा प्रत्यय तालुक्यातील चौऱ्यामल गावातील आदिवासींना एक-दोन नव्हे, तब्बल सतरा वर्षे आला. गावापासून अडीच किलोमीटरवर शहानूर धरणाच्या तळाशी पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीतून पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आवश्यक असलेला विद्युतपुरवठा चुकीच्या पद्धतीने केला गेल्यामुळे उशाशी धरण असतानाही गाव मात्र तहानले असल्याचा हा प्रकार होता. ‘लोकमत’ने यासंदर्भात लोकदरबारात वृत्त प्रकाशित करून चौऱ्यामलवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला.

बॉक्स

विद्युत पुरवठ्याची होती मुख्य समस्या

चौऱ्यामल गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. अडीच किलोमीटर अंतरावर पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. विहिरीला भरपूर पाणीसुद्धा आहे. परंतु, टाके भरण्यासाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा महावितरणच्या कृषी फीडरवरून करण्यात आला होता. पावसाळा व इतर काही महिने हे फीडर बंद ठेवण्यात येते तेव्हा गावातील पाणीपुरवठाही बंद राहत होता. आदिवासींना नदी-नाल्याचे पाणी अडीच किलोमीटरपर्यंत पायपीट करीत भरावे लागत होते.

बॉक्स

डीपीसीतून १६ लक्ष ,समस्या दूर

जिल्ह्याच्या डीपीसी बैठकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आ. राजकुमार पटेल, समाजकल्याण सभापती दयाराम काळे, सरपंच राजेश जावरकर, सचिव ऋषीकेश राहाटे यांच्याकडे चौऱ्यामल पाणीपुरवठ्यासंदर्भात १६ लक्ष रुपये खर्चाचा मुद्दा मांडला होता. हा निधी मंजूर करण्यात आला व स्वतंत्र, नवीन विद्युत पुरवठा तेथे करण्यात आला. आता गावकऱ्यांना पाणी मिळू लागले आहे

कोट

आकी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चौऱ्यामल गावाच्या पाणीपुरवठ्याला १७ वर्षांपासून कृषी फीडरवरून वीजपुरवठा होत होता. पाणी असूनसुद्धा वीजपुरवठा नियमित नसल्यामुळे पाणीटंचाई भासत होती. परंतु, आता स्वतंत्र डीबी मिळाल्याने २४ तास पाणी मिळत आहे.

ऋषीकेश राहाटे, ग्रामसचिव, आकी