शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

चौऱ्यामल गावाचा १७ वर्षांचा वनवास संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST

स्वतंत्र फीडरवरून पाणीपुरवठा सुरू : आदिवासींमध्ये आनंद चिखलदरा : पाणी असतानाही तहानलेले गाव अशी अवस्था असलेल्या तालुक्यातील आकी ग्रामपंचायत ...

स्वतंत्र फीडरवरून पाणीपुरवठा सुरू : आदिवासींमध्ये आनंद

चिखलदरा : पाणी असतानाही तहानलेले गाव अशी अवस्था असलेल्या तालुक्यातील आकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चौऱ्यामल गावाचा पाणीपुरवठा अखेर १७ वर्षांनंतर सुरळीत झाला आहे. आदिवासींनी हा पाणिलढा ‘लोकमत’च्या माध्यमातून जिंकला असून, पालकमंत्री यशोमती ठाकूर, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन केलेले कार्य आदिवासींमध्ये आनंद व्यक्त करणारे ठरले आहे.

एखाद्या चुकीच्या कामाचा फटका कसा बसतो, याचा प्रत्यय तालुक्यातील चौऱ्यामल गावातील आदिवासींना एक-दोन नव्हे, तब्बल सतरा वर्षे आला. गावापासून अडीच किलोमीटरवर शहानूर धरणाच्या तळाशी पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीतून पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आवश्यक असलेला विद्युतपुरवठा चुकीच्या पद्धतीने केला गेल्यामुळे उशाशी धरण असतानाही गाव मात्र तहानले असल्याचा हा प्रकार होता. ‘लोकमत’ने यासंदर्भात लोकदरबारात वृत्त प्रकाशित करून चौऱ्यामलवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला.

बॉक्स

विद्युत पुरवठ्याची होती मुख्य समस्या

चौऱ्यामल गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. अडीच किलोमीटर अंतरावर पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. विहिरीला भरपूर पाणीसुद्धा आहे. परंतु, टाके भरण्यासाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा महावितरणच्या कृषी फीडरवरून करण्यात आला होता. पावसाळा व इतर काही महिने हे फीडर बंद ठेवण्यात येते तेव्हा गावातील पाणीपुरवठाही बंद राहत होता. आदिवासींना नदी-नाल्याचे पाणी अडीच किलोमीटरपर्यंत पायपीट करीत भरावे लागत होते.

बॉक्स

डीपीसीतून १६ लक्ष ,समस्या दूर

जिल्ह्याच्या डीपीसी बैठकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आ. राजकुमार पटेल, समाजकल्याण सभापती दयाराम काळे, सरपंच राजेश जावरकर, सचिव ऋषीकेश राहाटे यांच्याकडे चौऱ्यामल पाणीपुरवठ्यासंदर्भात १६ लक्ष रुपये खर्चाचा मुद्दा मांडला होता. हा निधी मंजूर करण्यात आला व स्वतंत्र, नवीन विद्युत पुरवठा तेथे करण्यात आला. आता गावकऱ्यांना पाणी मिळू लागले आहे

कोट

आकी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चौऱ्यामल गावाच्या पाणीपुरवठ्याला १७ वर्षांपासून कृषी फीडरवरून वीजपुरवठा होत होता. पाणी असूनसुद्धा वीजपुरवठा नियमित नसल्यामुळे पाणीटंचाई भासत होती. परंतु, आता स्वतंत्र डीबी मिळाल्याने २४ तास पाणी मिळत आहे.

ऋषीकेश राहाटे, ग्रामसचिव, आकी