शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

१७ टँकरने ३० गावात पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:47 IST

चिखलदरा शहरासह तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या योजना मृतप्राय झाल्याने नागरिकांना १७ टँकर व विहिरी, बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. ५० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे५० पेक्षाअधिक गावे तहानलेली : विहिरीत सोडले जातेय टँकरने पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : चिखलदरा शहरासह तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या योजना मृतप्राय झाल्याने नागरिकांना १७ टँकर व विहिरी, बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. ५० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अपुऱ्या टँकरमुळे पाण्यासाठी वणवण भटकंती व पाण्यासाठी होणारे वाद पाहता टँकरचे पाणी थेट विहिरीत सोडले जात आहे.चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये मार्च महिन्यापासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मान्सूनचे उशिरा आगमन पाहता संपूर्ण जून महिन्यापर्यंत ५० पेक्षा अधिक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार आहे.तालुक्यातील आडनदी, भिलखेडा, कोयलारी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, पिपादरी, खिरपाणी, सोमवारखेडा, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, लवादा, एकझिरा, बिहाली, कोहाना, भांद्री, खडीमल, गौलखेडा बाजार, कुलंगना, मोथा, पस्तलाई, नागझिरा, वस्तापूर, मोरगड, आलाडोह, शहापूर, अंबापाटी, खटकाली, झिंगापूर आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोरडा, गंगारखेडा, हतरू, ढाणा, जैतादेही, वस्तापूर, जमलीआर, झिंगापूर, अंबापाटी, शहापूर आदी गावांमध्ये विहीर आणि बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. खटकाली खोंगडा, रामटेक, बगदरी आदी गावे टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींचा समावेश असून १६० पेक्षा अधिक गावे आहेत. त्यातील ५० पेक्षा अधिक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पाणी अडवा, पैसे जिरवाकोट्यवधी रुपये खर्च करून मेळघाटात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. परंतु पाण्याची पातळी खालावल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ असा मंत्र देत मेळघाटात ठिकठिकाणी नदी नाल्यांवर बंधारे आणि उंच-सखल भागावर सीसीटीची कामे करण्यात आलीत. प्रत्यक्षात ही सर्व कामे नामशेष झाल्याचे चित्र आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाणी न अडवता त्यातील पैसा स्वत:च्या खिशात जिरविल्याचा आरोप आहे.हातपंप कोरडे, विहिरी आटल्यातालुक्यात एकूण ३३७ हातपंप असून पाण्याची पातळी खोल गेल्याने ते हातपंप कोरडे पडले आहेत. ५० हातपंप नादुरुस्त असून त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले. मात्र पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या हातपंपातून पाण्याचा उपसा होत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई