शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

१७ टँकरने ३० गावात पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:47 IST

चिखलदरा शहरासह तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या योजना मृतप्राय झाल्याने नागरिकांना १७ टँकर व विहिरी, बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. ५० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे५० पेक्षाअधिक गावे तहानलेली : विहिरीत सोडले जातेय टँकरने पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : चिखलदरा शहरासह तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या योजना मृतप्राय झाल्याने नागरिकांना १७ टँकर व विहिरी, बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. ५० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अपुऱ्या टँकरमुळे पाण्यासाठी वणवण भटकंती व पाण्यासाठी होणारे वाद पाहता टँकरचे पाणी थेट विहिरीत सोडले जात आहे.चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये मार्च महिन्यापासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मान्सूनचे उशिरा आगमन पाहता संपूर्ण जून महिन्यापर्यंत ५० पेक्षा अधिक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार आहे.तालुक्यातील आडनदी, भिलखेडा, कोयलारी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, पिपादरी, खिरपाणी, सोमवारखेडा, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, लवादा, एकझिरा, बिहाली, कोहाना, भांद्री, खडीमल, गौलखेडा बाजार, कुलंगना, मोथा, पस्तलाई, नागझिरा, वस्तापूर, मोरगड, आलाडोह, शहापूर, अंबापाटी, खटकाली, झिंगापूर आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोरडा, गंगारखेडा, हतरू, ढाणा, जैतादेही, वस्तापूर, जमलीआर, झिंगापूर, अंबापाटी, शहापूर आदी गावांमध्ये विहीर आणि बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. खटकाली खोंगडा, रामटेक, बगदरी आदी गावे टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींचा समावेश असून १६० पेक्षा अधिक गावे आहेत. त्यातील ५० पेक्षा अधिक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पाणी अडवा, पैसे जिरवाकोट्यवधी रुपये खर्च करून मेळघाटात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. परंतु पाण्याची पातळी खालावल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ असा मंत्र देत मेळघाटात ठिकठिकाणी नदी नाल्यांवर बंधारे आणि उंच-सखल भागावर सीसीटीची कामे करण्यात आलीत. प्रत्यक्षात ही सर्व कामे नामशेष झाल्याचे चित्र आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाणी न अडवता त्यातील पैसा स्वत:च्या खिशात जिरविल्याचा आरोप आहे.हातपंप कोरडे, विहिरी आटल्यातालुक्यात एकूण ३३७ हातपंप असून पाण्याची पातळी खोल गेल्याने ते हातपंप कोरडे पडले आहेत. ५० हातपंप नादुरुस्त असून त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले. मात्र पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या हातपंपातून पाण्याचा उपसा होत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई