शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

१७ टँकरने ३० गावात पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:47 IST

चिखलदरा शहरासह तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या योजना मृतप्राय झाल्याने नागरिकांना १७ टँकर व विहिरी, बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. ५० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे५० पेक्षाअधिक गावे तहानलेली : विहिरीत सोडले जातेय टँकरने पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : चिखलदरा शहरासह तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या योजना मृतप्राय झाल्याने नागरिकांना १७ टँकर व विहिरी, बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. ५० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अपुऱ्या टँकरमुळे पाण्यासाठी वणवण भटकंती व पाण्यासाठी होणारे वाद पाहता टँकरचे पाणी थेट विहिरीत सोडले जात आहे.चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये मार्च महिन्यापासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मान्सूनचे उशिरा आगमन पाहता संपूर्ण जून महिन्यापर्यंत ५० पेक्षा अधिक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार आहे.तालुक्यातील आडनदी, भिलखेडा, कोयलारी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, पिपादरी, खिरपाणी, सोमवारखेडा, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, लवादा, एकझिरा, बिहाली, कोहाना, भांद्री, खडीमल, गौलखेडा बाजार, कुलंगना, मोथा, पस्तलाई, नागझिरा, वस्तापूर, मोरगड, आलाडोह, शहापूर, अंबापाटी, खटकाली, झिंगापूर आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोरडा, गंगारखेडा, हतरू, ढाणा, जैतादेही, वस्तापूर, जमलीआर, झिंगापूर, अंबापाटी, शहापूर आदी गावांमध्ये विहीर आणि बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. खटकाली खोंगडा, रामटेक, बगदरी आदी गावे टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींचा समावेश असून १६० पेक्षा अधिक गावे आहेत. त्यातील ५० पेक्षा अधिक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पाणी अडवा, पैसे जिरवाकोट्यवधी रुपये खर्च करून मेळघाटात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. परंतु पाण्याची पातळी खालावल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ असा मंत्र देत मेळघाटात ठिकठिकाणी नदी नाल्यांवर बंधारे आणि उंच-सखल भागावर सीसीटीची कामे करण्यात आलीत. प्रत्यक्षात ही सर्व कामे नामशेष झाल्याचे चित्र आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाणी न अडवता त्यातील पैसा स्वत:च्या खिशात जिरविल्याचा आरोप आहे.हातपंप कोरडे, विहिरी आटल्यातालुक्यात एकूण ३३७ हातपंप असून पाण्याची पातळी खोल गेल्याने ते हातपंप कोरडे पडले आहेत. ५० हातपंप नादुरुस्त असून त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले. मात्र पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या हातपंपातून पाण्याचा उपसा होत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई