शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
4
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
5
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
6
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
7
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
8
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
9
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
10
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
11
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
12
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
13
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
14
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
15
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
16
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
17
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
18
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
19
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
20
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी

आषाढीसाठी धावणार १६० बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:31 IST

आषाढी यात्रेसाठी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकानासह जिल्ह्याच्या सहा आगारांतून पंढरपूरकरिता यंदा ५३३ बसेस सोडल्या जाणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून १५० परिवर्तन, आठ दोन आसनी व दोन शयनयान शिवशाही बस अशा १६० बस ५ ते १६ जुलै दरम्यान सोडल्या जाणार आहेत. भाविकांसाठी अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतूनही पंढरपूरसाठी बस सुटतील.

ठळक मुद्देएसटी महामंडळ : ५ ते १६ जुलै दरम्यान फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आषाढी यात्रेसाठी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकानासह जिल्ह्याच्या सहा आगारांतून पंढरपूरकरिता यंदा ५३३ बसेस सोडल्या जाणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून १५० परिवर्तन, आठ दोन आसनी व दोन शयनयान शिवशाही बस अशा १६० बस ५ ते १६ जुलै दरम्यान सोडल्या जाणार आहेत. भाविकांसाठी अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतूनही पंढरपूरसाठी बस सुटतील.आषाढी वारीसाठी परिवहन महामंडळाने सर्व तयारी केली आहे. १६० बस गाड्यांचे नियोजन केले आहे. वारकऱ्यांनी मागणी केल्यास बसस्थानकावरून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून आषाढी एकादशीनिमित्त संतांच्या पालख्यांचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू झाला असून, बसने जाणाºया वारकºयांनाही विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागली आहे. राज्य परिवहन महामंडळावर दरवर्षी आषाढीवारीनिमित्त वारकºयांची ने-आण करण्याची मोठी जबाबदारी असते. त्यामुळे जुलै महिना हा गर्दीचा हंगाम गृहीत धरला जातो. यंदा १२ जुलै रोजी एकादशी असून, महामंडळाने ५ ते १६ जुलै दरम्यान राज्यभरातून वारकºयांची पंढरपूरला ने-आण करण्यासाठी एसटी बस सज्ज ठेवल्या आहेत.पुरेसे प्रवासी असल्यास गावातूनही एसटीआषाढीनिमित्त पंढरपूर वारीला जाणारे पुरेसे प्रवासी मिळाल्यास अशा गावातून मागणीनुसार एसटी महामंडळाकडून बस आरक्षण करता येईल. गावातूनच एसटी बस थेट पंढरपूरक रिता सोडण्याची व्यवस्था महामंडळाने केली आहे, शिवाय पंढरपूर येथून परतीचा प्रवास करणाºया भाविकांसाठी आरक्षणाची सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. दोन आसनी तसेच शयनयान शिवशाही बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात अनुक्रमे ४५ व ३० टक्के सवलतही दिली जाणार आहे. सोबत यंदा पंढरपूर वारीसाठी धावणाºया संबंधित चालक आणि वाहकांची नावे, मोबाइल क्रमांक प्रवाशांच्या माहितीसाठी ठळकपणे प्रदर्शित केला जाईल.महामंडळाने आषाढी निमित्त जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा याकरीता विविध उपाययोजना केल्या आहेत.- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, एस.टी महामंडळ