शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

आषाढीसाठी धावणार १६० बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:31 IST

आषाढी यात्रेसाठी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकानासह जिल्ह्याच्या सहा आगारांतून पंढरपूरकरिता यंदा ५३३ बसेस सोडल्या जाणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून १५० परिवर्तन, आठ दोन आसनी व दोन शयनयान शिवशाही बस अशा १६० बस ५ ते १६ जुलै दरम्यान सोडल्या जाणार आहेत. भाविकांसाठी अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतूनही पंढरपूरसाठी बस सुटतील.

ठळक मुद्देएसटी महामंडळ : ५ ते १६ जुलै दरम्यान फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आषाढी यात्रेसाठी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकानासह जिल्ह्याच्या सहा आगारांतून पंढरपूरकरिता यंदा ५३३ बसेस सोडल्या जाणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून १५० परिवर्तन, आठ दोन आसनी व दोन शयनयान शिवशाही बस अशा १६० बस ५ ते १६ जुलै दरम्यान सोडल्या जाणार आहेत. भाविकांसाठी अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतूनही पंढरपूरसाठी बस सुटतील.आषाढी वारीसाठी परिवहन महामंडळाने सर्व तयारी केली आहे. १६० बस गाड्यांचे नियोजन केले आहे. वारकऱ्यांनी मागणी केल्यास बसस्थानकावरून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून आषाढी एकादशीनिमित्त संतांच्या पालख्यांचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू झाला असून, बसने जाणाºया वारकºयांनाही विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागली आहे. राज्य परिवहन महामंडळावर दरवर्षी आषाढीवारीनिमित्त वारकºयांची ने-आण करण्याची मोठी जबाबदारी असते. त्यामुळे जुलै महिना हा गर्दीचा हंगाम गृहीत धरला जातो. यंदा १२ जुलै रोजी एकादशी असून, महामंडळाने ५ ते १६ जुलै दरम्यान राज्यभरातून वारकºयांची पंढरपूरला ने-आण करण्यासाठी एसटी बस सज्ज ठेवल्या आहेत.पुरेसे प्रवासी असल्यास गावातूनही एसटीआषाढीनिमित्त पंढरपूर वारीला जाणारे पुरेसे प्रवासी मिळाल्यास अशा गावातून मागणीनुसार एसटी महामंडळाकडून बस आरक्षण करता येईल. गावातूनच एसटी बस थेट पंढरपूरक रिता सोडण्याची व्यवस्था महामंडळाने केली आहे, शिवाय पंढरपूर येथून परतीचा प्रवास करणाºया भाविकांसाठी आरक्षणाची सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. दोन आसनी तसेच शयनयान शिवशाही बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात अनुक्रमे ४५ व ३० टक्के सवलतही दिली जाणार आहे. सोबत यंदा पंढरपूर वारीसाठी धावणाºया संबंधित चालक आणि वाहकांची नावे, मोबाइल क्रमांक प्रवाशांच्या माहितीसाठी ठळकपणे प्रदर्शित केला जाईल.महामंडळाने आषाढी निमित्त जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा याकरीता विविध उपाययोजना केल्या आहेत.- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, एस.टी महामंडळ