शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक रेल्वेने उत्तर प्रदेशचे १५४४ मजूर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:01 IST

श्रमिक एक्स्प्रेस २४ डब्यांची असून, त्यात अमरावती विभागातील १५४४ मजूर, कामगार बांधव रवाना झाले आहेत. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष ठाकरे, अमरावतीचे स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्देस्वगृही परतणार : रेल्वेला १० लाखांचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या उत्तर प्रदेशातील १५४४ मजूर, कामगार बांधवांना स्वगृही पोहचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस बुधवारी सायंकाळी ६ वाजता अमरावती रेल्वे स्थानकाहून उत्तर प्रदेशच्या देवरियाकडे रवाना झालेत. अमरावती विभागात अडकलेल्या मजूर, कामगार बांधवांना स्वगृही सोडण्यासाठी ही विशेष श्रमिक एक्स्प्रेस विनाथांबा देवरियापर्यंत जाणार आहे.श्रमिक एक्स्प्रेस २४ डब्यांची असून, त्यात अमरावती विभागातील १५४४ मजूर, कामगार बांधव रवाना झाले आहेत. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष ठाकरे, अमरावतीचे स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. रेल्वे स्थानकावर प्रथमत: सर्व परप्रांतीय प्रवाशांंची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या भोजन, चहा, पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली. विभागातून ठिकठिकाणाहून आलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचा आनंद झळकत होता. जिल्हाधिकारी शैलेश नवाल व अन्य अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांना फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर आदींबाबत आवाहन केले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.श्रमिक ट्रेनमधून अमरावती जिल्ह्यातून ५००, अकोला २८०, यवतमाळ २२१, बुलडाणा ४४२ आणि वाशिम जिल्ह्यातील १०१ कामगार रवाना झाले आहेत. केंद्र सरकारने प्रतिव्यक्ती ६५० रुपये प्रवास भाडे रेल्वेला दिले असून, बुधवारी रवाना झालेल्या विशेष ट्रेनद्वारे १० लाख ३ हजार ६०० रूपये रेल्वेला उत्पन्न मिळाले आहे.संचारबंदीमुळे अनेक दिवसांपासून अडकून पडल्यामुळे कामगारांचा कुटुंबीयांशी केवळ मोबाइलद्वारे संपर्क होत होता. मात्र, शासनाने दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली. त्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबीयांना, नातेवाइकांना अनेक दिवसांनी प्रत्यक्ष भेटता येणार आहे. घरी परतण्याचा आनंद मोठा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी परप्रांतीय मजूर, कामगारांनी व्यक्त केली. दरम्यान गत आठवडाभरापासून पश्चिम बंगालकडे जाणाºया कामगारांसाठी रेल्वे उपलब्ध झाली नाही.