शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

गस्तीवरच्या कर्मचाऱ्यास १,५०० रुपये प्रवासभत्ता

By admin | Updated: February 6, 2016 00:18 IST

वनक्षेत्राचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टिकोणातून गस्तीवर असणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये प्रतिमाह प्रवास भत्ता मिळणार आहे.

वनविभाग : १ एप्रिलपासून मिळणार लाभअमरावती : वनक्षेत्राचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टिकोणातून गस्तीवर असणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये प्रतिमाह प्रवास भत्ता मिळणार आहे. जिल्ह्यातील १०० वर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे व फेब्रुवारी महिन्यापासून हा प्रवासभत्ता लागू करण्यात आला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान ३३ टक्के वनक्षेत्र असावयास पाहिजे व त्या वनक्षेत्रात घट येऊ नये, असा वनविभागाचा प्रयत्न आहे. याची दक्षता म्हणून वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाद्वारा वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनावर भर दिले जात आहे. जिल्ह्यातील वनराईचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल, सहाय्यक लागवड अधिकारी या संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे सोपविली आहे. वनांचे संवर्धन करण्याची देखील जबाबदारी याच अधिकारी- कर्मचाऱ्यांकडे आहे. यासाठी यांना वनांच्या गस्तीवर राहणे बंधनकारक आहे. मुख्यालय ते गस्त या दरम्यानचा प्रवास या कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतो. याचा परिणाम गस्तीवर होत असतो. गस्तीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता देण्याची मागणी अनेक संघटनांनी शासनाकडे लावून धरली. या मागणीची शासनाने दखल घेवून फेब्रुवारी २ ०१६ या महिन्यापासून या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रतिमाह १,५०० रुपये प्रवासी भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)