शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

गस्तीवरच्या कर्मचाऱ्यास १,५०० रुपये प्रवासभत्ता

By admin | Updated: February 6, 2016 00:18 IST

वनक्षेत्राचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टिकोणातून गस्तीवर असणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये प्रतिमाह प्रवास भत्ता मिळणार आहे.

वनविभाग : १ एप्रिलपासून मिळणार लाभअमरावती : वनक्षेत्राचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टिकोणातून गस्तीवर असणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये प्रतिमाह प्रवास भत्ता मिळणार आहे. जिल्ह्यातील १०० वर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे व फेब्रुवारी महिन्यापासून हा प्रवासभत्ता लागू करण्यात आला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान ३३ टक्के वनक्षेत्र असावयास पाहिजे व त्या वनक्षेत्रात घट येऊ नये, असा वनविभागाचा प्रयत्न आहे. याची दक्षता म्हणून वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाद्वारा वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनावर भर दिले जात आहे. जिल्ह्यातील वनराईचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल, सहाय्यक लागवड अधिकारी या संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे सोपविली आहे. वनांचे संवर्धन करण्याची देखील जबाबदारी याच अधिकारी- कर्मचाऱ्यांकडे आहे. यासाठी यांना वनांच्या गस्तीवर राहणे बंधनकारक आहे. मुख्यालय ते गस्त या दरम्यानचा प्रवास या कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतो. याचा परिणाम गस्तीवर होत असतो. गस्तीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता देण्याची मागणी अनेक संघटनांनी शासनाकडे लावून धरली. या मागणीची शासनाने दखल घेवून फेब्रुवारी २ ०१६ या महिन्यापासून या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रतिमाह १,५०० रुपये प्रवासी भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)