शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

शहानूर धरणातील पाण्याचा १५० किलोमीटरचा प्रवास

By admin | Updated: August 4, 2015 00:03 IST

शहानूर धरणातून १५० किलोमीटर लांब प्रवास करून २३५ गावांना ‘ग्रॅव्हिटी’च्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

२३५ गावांना ग्रॅव्हिटीतून पाणीपुरवठा : खारपाणपट्ट्यात ५० हजार नळजोडणीधारकवैभव बाबरेकर अमरावतीशहानूर धरणातून १५० किलोमीटर लांब प्रवास करून २३५ गावांना ‘ग्रॅव्हिटी’च्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत या पध्दतीचा वापर करून खारपाण पट्ट्यातील ५० हजार ग्राहकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात मोठी पाच धरणे असून महाराष्ट्र जीवन प्राधीकरण तीन धरणांतून पाण्याची उचल करते. यातून जिल्ह्याभरातील बहुतांश नागरिकांची तहान शुध्द पाण्याने भागविली जाते. याचा सर्वाधिक लाभ खारपाण पट्ट्यातील नागरिकांना होत आहे. जीवन प्राधिकरण सिंभोरा धरणातील पाण्याची उचल करून शहरातील ८० हजार ग्राहकांना पाणीपुरवठा करीत आहे. सिंभोरा ते नेरपिंगळाईपर्यंत २३ किलोमीटर अंतरावर ‘गॅ्रव्हिटी’च्या (उताराच्या दिशेने) माध्यमातून पाणीपुरवठा होतो. शहानूर धरणातून खारपाणपट्टयातील २३५ गावांमध्ये ‘गॅ्रव्हिटी’च्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. शहानूर धरणातील पाणी अमरावतीनजीकच्या काही गावांपर्यंत पोहोचले आहे, हे विशेष. त्यात अंजनगाव,दर्यापूरचा समावेश आहे. शहानूरचे पाणी शुध्द करून खारपाणपट्ट्यातील २०० टाक्यांपर्यंत पोहोचविले जाते.धरणाच्या पाण्यावर शेती फुलू शकते जिल्ह्यात ५ मोठी धरणे असून त्यांचे पाणी कालव्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकते. दुष्काळग्रस्त स्थितीतही पिकांसाठी पाण्याचा उपयोग होऊ शकतो. शासनाने सिंचनासाठी शेततळी निर्माण केली आहेत. उन्हाळ्यात शेततळीदेखील कोरडी पडतात. अशावेळी पाण्याची नितांत गरज भासते. मात्र, या धरणातील पाण्याचा साठा वर्षभर पुरणारा असून कालव्याद्वारे धरणातील पाणी वापरून शेतीतील पिके घेता येतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. सव्वा कोटींचा खर्च करून अमरावतीकरांना पाणीपुरवठासिभोंरा धरण जलसंपदा विभागाच्या नियंत्रणाखाली कार्य करीत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला महिन्याकाठी १८ लाख रुपयांचे पाणी बिल चुकवावे लागत आहे. त्यातच पाणी पुरवठ्यासाठी पाण्याचे पाच पंप २४ तास चालू ठेवावे लागतात. त्यासाठी दरमहिन्याला विद्युत बिलासाठी ९० लाखांच्या जवळपास खर्च केला जात आहे. जीवन प्राधिकरण जिल्ह्यातील तीन धरणामधून ग्राहकांना पाणी पुरवठा करीत आहे. दर महिन्याला कोट्यवधींचा खर्च करून नागरिकांना शुध्द पाणी पुरविण्याची जबाबदारी प्राधिकरण पेलत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा बचत करणे, आवश्यक आहे.- प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.