शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शहानूर धरणातील पाण्याचा १५० किलोमीटरचा प्रवास

By admin | Updated: August 4, 2015 00:03 IST

शहानूर धरणातून १५० किलोमीटर लांब प्रवास करून २३५ गावांना ‘ग्रॅव्हिटी’च्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

२३५ गावांना ग्रॅव्हिटीतून पाणीपुरवठा : खारपाणपट्ट्यात ५० हजार नळजोडणीधारकवैभव बाबरेकर अमरावतीशहानूर धरणातून १५० किलोमीटर लांब प्रवास करून २३५ गावांना ‘ग्रॅव्हिटी’च्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत या पध्दतीचा वापर करून खारपाण पट्ट्यातील ५० हजार ग्राहकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात मोठी पाच धरणे असून महाराष्ट्र जीवन प्राधीकरण तीन धरणांतून पाण्याची उचल करते. यातून जिल्ह्याभरातील बहुतांश नागरिकांची तहान शुध्द पाण्याने भागविली जाते. याचा सर्वाधिक लाभ खारपाण पट्ट्यातील नागरिकांना होत आहे. जीवन प्राधिकरण सिंभोरा धरणातील पाण्याची उचल करून शहरातील ८० हजार ग्राहकांना पाणीपुरवठा करीत आहे. सिंभोरा ते नेरपिंगळाईपर्यंत २३ किलोमीटर अंतरावर ‘गॅ्रव्हिटी’च्या (उताराच्या दिशेने) माध्यमातून पाणीपुरवठा होतो. शहानूर धरणातून खारपाणपट्टयातील २३५ गावांमध्ये ‘गॅ्रव्हिटी’च्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. शहानूर धरणातील पाणी अमरावतीनजीकच्या काही गावांपर्यंत पोहोचले आहे, हे विशेष. त्यात अंजनगाव,दर्यापूरचा समावेश आहे. शहानूरचे पाणी शुध्द करून खारपाणपट्ट्यातील २०० टाक्यांपर्यंत पोहोचविले जाते.धरणाच्या पाण्यावर शेती फुलू शकते जिल्ह्यात ५ मोठी धरणे असून त्यांचे पाणी कालव्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकते. दुष्काळग्रस्त स्थितीतही पिकांसाठी पाण्याचा उपयोग होऊ शकतो. शासनाने सिंचनासाठी शेततळी निर्माण केली आहेत. उन्हाळ्यात शेततळीदेखील कोरडी पडतात. अशावेळी पाण्याची नितांत गरज भासते. मात्र, या धरणातील पाण्याचा साठा वर्षभर पुरणारा असून कालव्याद्वारे धरणातील पाणी वापरून शेतीतील पिके घेता येतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. सव्वा कोटींचा खर्च करून अमरावतीकरांना पाणीपुरवठासिभोंरा धरण जलसंपदा विभागाच्या नियंत्रणाखाली कार्य करीत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला महिन्याकाठी १८ लाख रुपयांचे पाणी बिल चुकवावे लागत आहे. त्यातच पाणी पुरवठ्यासाठी पाण्याचे पाच पंप २४ तास चालू ठेवावे लागतात. त्यासाठी दरमहिन्याला विद्युत बिलासाठी ९० लाखांच्या जवळपास खर्च केला जात आहे. जीवन प्राधिकरण जिल्ह्यातील तीन धरणामधून ग्राहकांना पाणी पुरवठा करीत आहे. दर महिन्याला कोट्यवधींचा खर्च करून नागरिकांना शुध्द पाणी पुरविण्याची जबाबदारी प्राधिकरण पेलत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा बचत करणे, आवश्यक आहे.- प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.