शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शहानूर धरणातील पाण्याचा १५० किलोमीटरचा प्रवास

By admin | Updated: August 4, 2015 00:03 IST

शहानूर धरणातून १५० किलोमीटर लांब प्रवास करून २३५ गावांना ‘ग्रॅव्हिटी’च्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

२३५ गावांना ग्रॅव्हिटीतून पाणीपुरवठा : खारपाणपट्ट्यात ५० हजार नळजोडणीधारकवैभव बाबरेकर अमरावतीशहानूर धरणातून १५० किलोमीटर लांब प्रवास करून २३५ गावांना ‘ग्रॅव्हिटी’च्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत या पध्दतीचा वापर करून खारपाण पट्ट्यातील ५० हजार ग्राहकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात मोठी पाच धरणे असून महाराष्ट्र जीवन प्राधीकरण तीन धरणांतून पाण्याची उचल करते. यातून जिल्ह्याभरातील बहुतांश नागरिकांची तहान शुध्द पाण्याने भागविली जाते. याचा सर्वाधिक लाभ खारपाण पट्ट्यातील नागरिकांना होत आहे. जीवन प्राधिकरण सिंभोरा धरणातील पाण्याची उचल करून शहरातील ८० हजार ग्राहकांना पाणीपुरवठा करीत आहे. सिंभोरा ते नेरपिंगळाईपर्यंत २३ किलोमीटर अंतरावर ‘गॅ्रव्हिटी’च्या (उताराच्या दिशेने) माध्यमातून पाणीपुरवठा होतो. शहानूर धरणातून खारपाणपट्टयातील २३५ गावांमध्ये ‘गॅ्रव्हिटी’च्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. शहानूर धरणातील पाणी अमरावतीनजीकच्या काही गावांपर्यंत पोहोचले आहे, हे विशेष. त्यात अंजनगाव,दर्यापूरचा समावेश आहे. शहानूरचे पाणी शुध्द करून खारपाणपट्ट्यातील २०० टाक्यांपर्यंत पोहोचविले जाते.धरणाच्या पाण्यावर शेती फुलू शकते जिल्ह्यात ५ मोठी धरणे असून त्यांचे पाणी कालव्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकते. दुष्काळग्रस्त स्थितीतही पिकांसाठी पाण्याचा उपयोग होऊ शकतो. शासनाने सिंचनासाठी शेततळी निर्माण केली आहेत. उन्हाळ्यात शेततळीदेखील कोरडी पडतात. अशावेळी पाण्याची नितांत गरज भासते. मात्र, या धरणातील पाण्याचा साठा वर्षभर पुरणारा असून कालव्याद्वारे धरणातील पाणी वापरून शेतीतील पिके घेता येतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. सव्वा कोटींचा खर्च करून अमरावतीकरांना पाणीपुरवठासिभोंरा धरण जलसंपदा विभागाच्या नियंत्रणाखाली कार्य करीत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला महिन्याकाठी १८ लाख रुपयांचे पाणी बिल चुकवावे लागत आहे. त्यातच पाणी पुरवठ्यासाठी पाण्याचे पाच पंप २४ तास चालू ठेवावे लागतात. त्यासाठी दरमहिन्याला विद्युत बिलासाठी ९० लाखांच्या जवळपास खर्च केला जात आहे. जीवन प्राधिकरण जिल्ह्यातील तीन धरणामधून ग्राहकांना पाणी पुरवठा करीत आहे. दर महिन्याला कोट्यवधींचा खर्च करून नागरिकांना शुध्द पाणी पुरविण्याची जबाबदारी प्राधिकरण पेलत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा बचत करणे, आवश्यक आहे.- प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.