शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

१५ व्यक्ती कोरोनामुक्त; जिल्ह्याला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:01 IST

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोरोनामुक्त झालेल्या सर्व नागरिकांना मिठाई देण्यात आली. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहतील. रुग्णालयात सर्व डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. वेळोवेळी आमचे मनोबल वाढविले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोविड रूग्णालयात दाखल संक्रमित १५ व्यक्तींचे सलग दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रविवारी घरी सोडण्यात आले. यावेळी आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून आणि टाळ्या वाजवून स्वागत केले. जिल्ह्यात ४० तासानंतर एकाही नव्या रुग्णाची नोंद न झाल्याने रविवारी या दोन्ही घटनांनी अमरावतीकरांना दिलासा मिळाला.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोरोनामुक्त झालेल्या सर्व नागरिकांना मिठाई देण्यात आली. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहतील. रुग्णालयात सर्व डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. वेळोवेळी आमचे मनोबल वाढविले. कुणाही नागरिकांनी कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसली की तत्काळ रूग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. कुठलीही माहिती लपवू नये. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो, अशी भावना या कोरोनामुक्त झालेल्या या व्यक्तींनी यावेळी व्यक्त केली. जिल्हा शल्य चिकित्सकांनी या सर्व व्यक्तींना शुभेच्छा दिल्या. उपचारादरम्यान रुग्णांनी सर्व स्टाफशी चांगले सहकार्य केले. स्वत:चे मनोधैर्य कायम ठेवले. आज ते बरे होऊन घरी परतत आहे, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. या काळात नागरिकांनीही दक्षतेचे पालन करावे. कुठलीही लक्षणे दिसताच तत्काळ संपर्क साधावा, असे आरोग्य यंत्रणेद्वारा करण्यात आले.आतापर्यत २१ संक्रमित व्यक्ती उपचारानंतर बरे१५ ही कोरोनामुक्त क्लस्टर हॉटस्पॉटमधीलरविवारी कोरोनामुक्त करण्यात आलले १० पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे. कमेला ग्राऊंड येथील ३ महिला व १ पुरुष अशा चौघांचा समावेश आहे. हैदरपुरा येथील २ पुरुष व्यक्तींचा त्यात समावेश आहे. बडनेरा येथील १ पुरुष व १ महिलेचा अशा दोघांचा समावेश आहे. तारखेडा येथील ३ पुरुष व्यक्तींचा त्यात समावेश आहे. खोलापुरी गेट येथील २ पुरुष व एका महिलेचा अशा तिघांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे चेतनदास बगिचा येथील १ पुरुषाचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून अहोरात्र रूग्णसेवा देत आहेत. महानगरातील १५ नागरिक बरे होऊन परतत असल्याचे समाधान आहे. जिल्ह्यासाठी ही घटना दिलासा देणारी आणि मनोबल उंचावणारी आहे.- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या