शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

जिल्ह्यातील १५ टक्के पाणी नमुने दूषित

By admin | Updated: May 5, 2014 00:17 IST

तापत्या उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. तर दुसरीकडे हजारो नागरिकांना दूषित पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे.

अमरावती : तापत्या उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. तर दुसरीकडे हजारो नागरिकांना दूषित पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पाण्याचे नमुने घेऊन जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत अनुजीव तपासणी केली असता १५ टक्के नमुने दूषित आढळून आले. या अहवालवरुन जिल्हाभरातील बहुतांश भागातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. पाणी हे जीवन आहे. कडाक्याच्या उन्हामुळे जिल्ह्याभरातील जलस्त्रोतांची पातळी घटत चालली आहे. वाढत्या उन्हात पाण्याची गरजही वाढते. शासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचे कृत्रिम स्त्रोत निर्माण केले आहेत. मात्र, या स्त्रोतांकडेच दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शहरातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहरातील पाण्याच्या शुध्दतेबद्दलही आता संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पाणीस्त्रोतांचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात येतात. त्याठिकाणी पाण्याच्या नमुन्यांची अनुजीव तपासणी केली जाते. पाण्यात जिवाणू- विषाणू आहेत काय? हे या तपासणीप्रक्रियेत स्पष्ट होते. १०० मिलीलिटर पाण्याच्या नमुन्याची अनुजीव तपासणी केली जाते. पाण्यात कॉलीफॉम ग्रुप व थर्माटालरन्टचा शोध घेण्यात येतो. महिन्याकाठी जिल्ह्यातील १२०० पाण्याचे नमुने प्रयोगशाळांकडे तपासणीकरिता येतात. मात्र, त्यापैकी १५ टक्के पाणी दूषित असल्याचा अहवाल दर महिन्यात पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हीच स्थिती आहे. तरीही आरोग्य यंत्रणा पाण्याचे स्त्रोत शुध्द करण्यावर भर देत नाही, असे या अहवालावरून स्पष्ट होते. परिणामी दूषित पाण्यामुळे होणारे आजार वाढत चालले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयात आजारी रुग्णांची वाढलेली संख्या बघता दूूषित पाण्यामुळे किती गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो, हे लक्षात येते. जलस्त्रोतांमधून दूषित पाणी पुरवठा होत असेल तर त्यासाठी संबंधितांनी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे.