शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

१४ व्या वित्त आयोगाचा सव्वा कोटीचा अखर्चित निधी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत खर्च करा, ग्रामविकास विभागाचे ग्रामपंचायतींना पत्र

By जितेंद्र दखने | Updated: November 8, 2023 19:07 IST

चौदाव्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतींकडे वर्ग केलेला निधी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत खर्च करा, राज्याच्या ग्रामविकास विभागाने सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठविण्यात आले आहे.

अमरावती : चौदाव्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतींकडे वर्ग केलेला निधी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत खर्च करा, असे पत्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने सर्व ग्रामपंचायतींना पाठवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये असलेल्या ८४० ग्रामपंचायतींकडे सुमारे १ कोटी २३ लाख ६० हजार ६९२ रुपयांचा निधी अखर्चित आहे. याशिवाय ३९ लाख ०९ हजार २९९ रुपये व्याजाची रक्कम शिल्लक असून अखर्चित आहे. त्यामुळे हा अखर्चित असलेला निधी येत्या महिन्याभरात खर्च करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीसमोर उभे ठाकले आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगाचा निधी अद्याप खर्च केला नाही. या निधी खर्चासाठी केंद्र सरकारने तीनवेळा मुदतवाढ देऊनही अद्याप १० टक्क्यांपेक्षा अधिक निधी अखर्चित राहिला आहे. निधी खर्चाबाबत राज्यातील यंत्रणा उदासीन असल्यामुळे अखेर केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधित निधीचा पहिला हप्ता रोखून धरला आहे. हा निधी खर्च न झाल्यास ग्रामपंचायतींना २०२३-२४ या आर्थिक वर्षात १५व्या वित्त आयोगाचा निधी मिळू शकणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे झेडपीच्या पातळीवर हा निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना काळात जिल्हा परिषदेने त्यातील काही निधी विविध उपाययोजनांवर खर्च केला. तरीही जिल्हाभरातील ८४० ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १ कोटी २३ लाख ६० हजार ६९२ रुपयांचा निधी अखर्चित आहे.

याशिवाय ३९ लाख ०९ हजार २९९ रुपये व्याजाची रक्कम शिल्लक असून अखर्चित आहे. हा निधी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत खर्च करण्यास शासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता महिन्याभरात कोट्यवधी रुपयांच्या निधी खर्चाचे आव्हान ग्रामपंचायतीसमोर उभे ठाकले आहे.बॉक़्स

निधी अखर्चित राहण्याचे कारण काय?ग्रामपंचायतींना शासनाकडून चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट दिला जातो. त्यानुसार जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींमध्ये १ कोटी २३ लाख ६० हजार ६९२ रुपये अखर्चित आहे. तर ३९ लाख ०३ हजार २९९ रुपये व्याजाची रक्कमही अखर्चित आहे. हा निधी अखर्चित राहण्याच्या प्रमुख कारणामध्ये सुरक्षा ठेव, अखर्चित व्याजाची रक्कम आहे. यामुळे हा निधी अखर्चित राहण्याचे प्रमुख कारण झेडपी प्रशासनाकडे सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती