शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

१४ व्या वित्त आयोगाचा सव्वा कोटीचा अखर्चित निधी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत खर्च करा, ग्रामविकास विभागाचे ग्रामपंचायतींना पत्र

By जितेंद्र दखने | Updated: November 8, 2023 19:07 IST

चौदाव्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतींकडे वर्ग केलेला निधी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत खर्च करा, राज्याच्या ग्रामविकास विभागाने सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठविण्यात आले आहे.

अमरावती : चौदाव्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतींकडे वर्ग केलेला निधी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत खर्च करा, असे पत्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने सर्व ग्रामपंचायतींना पाठवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये असलेल्या ८४० ग्रामपंचायतींकडे सुमारे १ कोटी २३ लाख ६० हजार ६९२ रुपयांचा निधी अखर्चित आहे. याशिवाय ३९ लाख ०९ हजार २९९ रुपये व्याजाची रक्कम शिल्लक असून अखर्चित आहे. त्यामुळे हा अखर्चित असलेला निधी येत्या महिन्याभरात खर्च करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीसमोर उभे ठाकले आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगाचा निधी अद्याप खर्च केला नाही. या निधी खर्चासाठी केंद्र सरकारने तीनवेळा मुदतवाढ देऊनही अद्याप १० टक्क्यांपेक्षा अधिक निधी अखर्चित राहिला आहे. निधी खर्चाबाबत राज्यातील यंत्रणा उदासीन असल्यामुळे अखेर केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधित निधीचा पहिला हप्ता रोखून धरला आहे. हा निधी खर्च न झाल्यास ग्रामपंचायतींना २०२३-२४ या आर्थिक वर्षात १५व्या वित्त आयोगाचा निधी मिळू शकणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे झेडपीच्या पातळीवर हा निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना काळात जिल्हा परिषदेने त्यातील काही निधी विविध उपाययोजनांवर खर्च केला. तरीही जिल्हाभरातील ८४० ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १ कोटी २३ लाख ६० हजार ६९२ रुपयांचा निधी अखर्चित आहे.

याशिवाय ३९ लाख ०९ हजार २९९ रुपये व्याजाची रक्कम शिल्लक असून अखर्चित आहे. हा निधी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत खर्च करण्यास शासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता महिन्याभरात कोट्यवधी रुपयांच्या निधी खर्चाचे आव्हान ग्रामपंचायतीसमोर उभे ठाकले आहे.बॉक़्स

निधी अखर्चित राहण्याचे कारण काय?ग्रामपंचायतींना शासनाकडून चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट दिला जातो. त्यानुसार जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींमध्ये १ कोटी २३ लाख ६० हजार ६९२ रुपये अखर्चित आहे. तर ३९ लाख ०३ हजार २९९ रुपये व्याजाची रक्कमही अखर्चित आहे. हा निधी अखर्चित राहण्याच्या प्रमुख कारणामध्ये सुरक्षा ठेव, अखर्चित व्याजाची रक्कम आहे. यामुळे हा निधी अखर्चित राहण्याचे प्रमुख कारण झेडपी प्रशासनाकडे सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती