शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

१४४ कोटींचा प्रिमीयम, परतावा फक्त ९४ कोटींचा, पीक विम्यात कंपनीचेच चांगभले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 4, 2023 17:30 IST

हंगाम संपला तरी ११ हजार शेतकरी प्रतिक्षेत

गजानन मोहोड, अमरावती: पीक विमा म्हणजे शेतकऱ्यांचे शोषण हेच समीकरण अलिकडे दृढ झालेलं आहे. गतवर्षीच्या खरिपातील बाधित ११२६९ शेतकऱ्यांना परतावा मंजूर असला तरी देण्यात आलेला नाही. या योजनेसाठी शेतकरी, राज्य व केद्र शासनाचा मिळून १४३.०५ कोटींचा प्रिमीयम कंपनीकडे जमा झालेला आहे, त्यातुलनेत फक्त ९१.४५ कोटींचा परतावा कंपनीद्वारा देण्यात आलेला आहे.

पीक विमा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी नव्हे तर कंपनीचे चांगभलं करण्यासाठीच असल्याची स्थिती जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी अनुभवतात. विमा कंपनी कुणाचेच जुमानत नसल्याने शेतकरी कृषी विभागाला वेठीस धरतात. त्यामुळे त्यांच्यासाठीदेखील पीक विमा म्हणजे ‘अवघड जागेचे दुखणे’ झालेले आहे. गतवर्षीच्या खरिपात जिल्ह्यातील २१९३२१ नागरिकांनी या योजनेत सहभाग नोंदविला होता. ८४ महसूलात झालेली अतिवृष्टी व ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरु असलेल्या सततच्या पावसाने सर्व पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यातुलनेत कंपनीद्वारा ८५९२० शेतकऱ्यांना ९१.४५ कोटींचा परतावा देण्यात आलेला आहे. त्यातही कंपनीद्वारा २५ हजारांवर पूर्वसूचना अर्ज नाकारले आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी सोयाबीनच्या नुकसानीसाठी ८० मंडळांमध्ये अधिसूचना जाहीर केली होती, तीदेखील कंपनीने नाकारली आहे. त्यामुळे कंपनी कुणालाच जुमानत नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी