शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

१४,१९३ ग्राहकांकडे १२ कोटी ५९ लाखांवर वीज बिल थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:53 IST

Amravati : दर्यापूर तालुक्यातील थकबाकीदारांवर महावितरणचे लक्ष केंद्रित; बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित, काहींनी वर्षभरापासून दिली नाही रक्कम

अनंत बोबडेलोकमत न्यूज नेटवर्कयेवदा : दर्यापूर शहरासह तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग व अंजनगाव सुर्जी, भातकुली तालुक्यांतील गावे समाविष्ट असलेल्या महावितरणच्या दर्यापूर उपविभागातील एकूण ४९,०४० वीज ग्राहकांपैकी १४ हजार १९३ जणांकडे तब्बल १२ कोटी ५९ लाख १९ हजार ७७१ रुपये वीज बिल थकीत आहे. या थकबाकीदारांनी मुदतीत वीज बिलाचा भरणा न केल्यास त्यांचा पुरवठा खंडित केला जाणार असल्याची ताकीद उपकार्यकारी अभियंता विक्रम काटोले, सहायक लेखापाल सचिन धवने यांनी दिली.

कधीकाळी शहरातील वीजग्राहकांची ९० टक्के वसुली होती. मात्र, गत काही वर्षापासून बाभळी, बनोसा, दर्यापूर शहर व उपविभागांतर्गत ग्रामीण भागातील विविध प्रकारांतील ग्राहक वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने १२ कोटींपेक्षा जास्त थकबाकी झाली आहे. काहींनी दोन ते सहा महिने, तर काहींनी वर्षभरापासून वीज बिल भरलेले नाही. महावितरणने त्यांना मार्च अखेरपर्यंत अल्टिमेटम देऊन कारवाईचा इशारा दिला आहे. 

वीज प्रकार              थकबाकी घरगुती                  २,६४,९९,२१०व्यावसायिक           ३५,३४,९४०औद्योगिक              १,१९,०५,४१३पथदिवे                  ७,६१,०१,४४६पाणीपुरवठा            २४,६१,४६२सार्वजनिक सेवा       ३३,८८,२९८इतर                       १६,६९,९७१एकूण थकबाकी      १२,५९,१९,७७१

वसुलीसाठी वेगवेगळी पथके गठितदर्यापूर तालुक्यातील वीज ग्राहकांकडील वसुलीसाठी वेगवेगळी पथके तयार केली असून, थकीत रक्कम वसूल करण्यात येत असल्याची माहिती महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाने दिली.

"शाळा-महाविद्यालयीन परीक्षेचे दिवस असल्याने वीजपुरवठा खंडित केल्यास पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. भारनियमनाचे संकट येऊन उन्हाळ्यात नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे थकबाकीदारांनी वीज बिल भरावे."- सुधाकर भारसाकळे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस.

"घरगुती ग्राहक व सार्वजनिक पथदिव्यांची सर्वाधिक थकबाकी आहे; मार्च एंडिंगमुळे वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई युद्धस्तरावर सुरू आहे. चार महिन्यांत ९९५ मीटरवरील वीजपुरवठा खंडित केला आहे."- विक्रम काटोले, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, दर्यापूर.

टॅग्स :Amravatiअमरावतीelectricityवीज