शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

जूनपर्यंत १४१.२५ दलघमी साठा शिल्लक

By admin | Updated: May 12, 2016 00:09 IST

जिल्ह्यातील मुख्य व माध्यम अशा १० जल प्रकल्पांत जून २०१६ अखेरपर्यंत केवळ १४१.२५ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे.

धोक्याची घंटा : ४८.६१ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व्ययअमरावती : जिल्ह्यातील मुख्य व माध्यम अशा १० जल प्रकल्पांत जून २०१६ अखेरपर्यंत केवळ १४१.२५ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे. यापैकी ४८.६१ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी २८.४३ व उन्हाळी हंगामासाठी १३.०७ दलघमी पाणी आवश्यक असल्याने मान्सूनने हुलकावणी दिल्यास जिल्ह्यात पाणी-टंचाईची स्थिती उद्भवणार आहे.जिल्ह्यातील प्रमुख उर्ध्व वर्धा प्रकल्पात जलाशयातील पाण्याची नियोजनानूसार जूनअखेरपावेतो ८७.७५ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे. परंतु या साठ्यापैकी २९.८३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व पाणीपुरवठा योजनांसाठी २०.३३ तसेच उन्हाळी हंगामाकरिता १० दलघमी पाण्याचा वापर होत असल्याने या प्रकल्पात जेमतेमच जलसाठा शिल्लक राहणार आहे. शहापूर मध्यम प्रकल्पात ४६.०४ दलघमी प्रकल्पीय साठ्याच्या तुलनेत जूनअखेरपावेतो केवळ १०.८१ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार अहे. उपलब्ध साठ्यापैकी ५.५६ दलघमी साठ्याचे बाष्पीभवन होणार आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी ४.८० दलघमी पाणी वापर होणार असल्याने प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे. सपन प्रकल्पात जून २०१६ अखेर १३.६६ दलघमी जलसठा शिल्लक राहणार आहे. यामध्ये ५.०६ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होईल. पूर्णा प्रकल्पात जूनअखेर ६.५७ दलघमी साठा शिल्लक राहणार आहे. यापैकी १.३८ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व पाणीपुरवठा योजनेला १.१५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. चंद्रभागा मध्यम प्रकल्पात प्रकल्पीय साठा ४१.२५ दलघमी आहे. यापैकी जून अखेर पावेतो १३.६५ दलघमी साठा शिल्लक राहणार आहे. यामध्ये २०१५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व १.३३ दलघमी पाण्याचा पाणी पुरवठा योजनासाठी वापर होणार असल्याने पावसाळ्यापूर्वी पाण्याची भीषण समस्या उद्भवणार आहे. पावसाळ्यापूर्वी लघु प्रकल्पात ठणठणाट ४२ लघु प्रकल्पात प्रकल्पीय उपयुक्त साठ्याच्या तुलनेत जून अखेर पावेतो ४.२१ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे. यामध्ये २.८७ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन ०.८८ दलघमी पाणी योजनासाठी वापरले जाणार असल्याने पावसाळ्यापूर्वीच हे प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे.