शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जूनपर्यंत १४१.२५ दलघमी साठा शिल्लक

By admin | Updated: May 12, 2016 00:09 IST

जिल्ह्यातील मुख्य व माध्यम अशा १० जल प्रकल्पांत जून २०१६ अखेरपर्यंत केवळ १४१.२५ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे.

धोक्याची घंटा : ४८.६१ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व्ययअमरावती : जिल्ह्यातील मुख्य व माध्यम अशा १० जल प्रकल्पांत जून २०१६ अखेरपर्यंत केवळ १४१.२५ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे. यापैकी ४८.६१ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी २८.४३ व उन्हाळी हंगामासाठी १३.०७ दलघमी पाणी आवश्यक असल्याने मान्सूनने हुलकावणी दिल्यास जिल्ह्यात पाणी-टंचाईची स्थिती उद्भवणार आहे.जिल्ह्यातील प्रमुख उर्ध्व वर्धा प्रकल्पात जलाशयातील पाण्याची नियोजनानूसार जूनअखेरपावेतो ८७.७५ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे. परंतु या साठ्यापैकी २९.८३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व पाणीपुरवठा योजनांसाठी २०.३३ तसेच उन्हाळी हंगामाकरिता १० दलघमी पाण्याचा वापर होत असल्याने या प्रकल्पात जेमतेमच जलसाठा शिल्लक राहणार आहे. शहापूर मध्यम प्रकल्पात ४६.०४ दलघमी प्रकल्पीय साठ्याच्या तुलनेत जूनअखेरपावेतो केवळ १०.८१ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार अहे. उपलब्ध साठ्यापैकी ५.५६ दलघमी साठ्याचे बाष्पीभवन होणार आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी ४.८० दलघमी पाणी वापर होणार असल्याने प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे. सपन प्रकल्पात जून २०१६ अखेर १३.६६ दलघमी जलसठा शिल्लक राहणार आहे. यामध्ये ५.०६ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होईल. पूर्णा प्रकल्पात जूनअखेर ६.५७ दलघमी साठा शिल्लक राहणार आहे. यापैकी १.३८ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व पाणीपुरवठा योजनेला १.१५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. चंद्रभागा मध्यम प्रकल्पात प्रकल्पीय साठा ४१.२५ दलघमी आहे. यापैकी जून अखेर पावेतो १३.६५ दलघमी साठा शिल्लक राहणार आहे. यामध्ये २०१५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व १.३३ दलघमी पाण्याचा पाणी पुरवठा योजनासाठी वापर होणार असल्याने पावसाळ्यापूर्वी पाण्याची भीषण समस्या उद्भवणार आहे. पावसाळ्यापूर्वी लघु प्रकल्पात ठणठणाट ४२ लघु प्रकल्पात प्रकल्पीय उपयुक्त साठ्याच्या तुलनेत जून अखेर पावेतो ४.२१ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे. यामध्ये २.८७ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन ०.८८ दलघमी पाणी योजनासाठी वापरले जाणार असल्याने पावसाळ्यापूर्वीच हे प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे.