शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

14 वर्षांपासून वनभंगाच्या गुन्ह्यांना बगल, मुख्य वनसंरक्षकांचे दुर्लक्ष :14 हजार 400 कोटींचा महसूल बुडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 5:29 PM

वनक्षेत्रात नियमबाह्य बांधकाम, उत्खन्नन, गौण खनिजाची चोरी, रस्ते निर्मिती झाल्यास संबंधितांविरुद्ध मुख्य वनसंरक्षकांनी वनभंग गुन्हे दाखल करावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.

गणेश वासनिकअमरावती : वनक्षेत्रात नियमबाह्य बांधकाम, उत्खन्नन, गौण खनिजाची चोरी, रस्ते निर्मिती झाल्यास संबंधितांविरुद्ध मुख्य वनसंरक्षकांनी वनभंग गुन्हे दाखल करावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र, राज्यात गत १४ वर्षांपासून एकही सीसीएफनी वनभंग झाल्याबाबत गुन्हे दाखल केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

वनसंरक्षक नियम २००३ नियम ९ (१) नुसार केंद्र सरकारने वनभंग गुन्हे हे न्यायालयात दाखल करण्याबाबत मुख्य वनसंरक्षकांना अधिकार बहाल केले आहेत. परंतु राज्याच्या ११ प्रादेशिक विभागात एकाही सीसीएफनी वनभंग झाल्याबाबत अधिकृत गुन्हा दाखल करून त्याचा न्यायालयात पाठपुरावा केला नाही, अशी माहिती आहे. वनभंग या शब्दात वनजमिनींचा वापर वनेत्तर कामांसाठी केल्यास संबंधितांविरुद्ध वनगुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. राज्यात १९८० पूर्वी असलेल्या रस्त्याची लांबी ही अंदाजे आठ हजार कि.मी. होती. आज ती ८० हजार कि.मी. पुढे गेली आहे. वनजमिनीवर नवीन रस्ता तयार करायचा असल्यास केंद्र सरकारची परवनागी असणे आवश्यक आहे. मात्र, रस्ते निर्मिती करताना नवीन वनांच्या हद्दीत प्रती किमी सरासरी असे दोन हेक्टर असे दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक जागा  वनांची वापरली आहे. यात माती रस्त्यांचे रुपांतर मुरूम रस्त्यात, मुरूम रस्त्याचे रुपांतर डांबरीकरणात, डांबरीकरण रस्त्याचे रुपांतर सिमेंट रस्त्यात झाले आहे. तसेच तीन मीटर लांबीचे रस्ते २४ मीटर, १२ मीटर रुंदीचे रस्ते २४ मीटर व २४ मीटर रुंदीचे रस्ते ६० मीटर झाले आहेत. रस्ते रुंदीकरणात वापरलेल्या वनजमिनींची पूर्वपरवानगीही केंद्र सरकारकडून घेण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने महत्त्वाच्या २ ते ३ टक्के प्रकल्पासाठीच राज्यात वनजमिनींची परवानगी दिली आहे. राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ३ लक्ष ६ हजार चौरस किमी असून ६३ हजार चौरस किमी क्षेत्र हे वनविभागाच्या ताब्यात आहे. राज्यात साडेतीन लाख किमी रस्त्यांपैकी ७२ हजार किमी रस्ते हे वनहद्दीतून गेले आहेत. मात्र रस्ते रुंदीकरणासाठी वापरल्या गेलेला अतिरिक्त वनजमिनीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतलेला नाही, अशी माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वनजमिनींची ठरविलेली नक्त रक्कम २० लाख हेक्टर प्रमाणे १४ हजार ४०० कोटी निष्क्रिय वनाधिका-यांनी वसूल करण्यास दिरंगाई केल्याचे वास्तव समोर आले आहे. वनभंगाबाबतचे गुन्हे दाखल का करण्यात आले नाही, याविषयी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान वनसचिव विकास खारगे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

रस्ते निर्मिती कंत्राटदारांना अभय-वनजमिनींवर विनापरवानगीने रस्ते निर्मित होत असताना वनाधिका-यांकडून संबंधित कंत्राटदाराविरुद्ध वनभंगाचे गुन्हे दाखल करण्याऐवजी त्याला अभय दिले जाते. त्यामुळे वनविभागाला कोणीही जुमानत नाही, ही बाब समोर आली आहे. यापूर्वी वनभंग केल्याप्रकरणी दोन माजी वनमंत्र्यांना जेलची हवा खावी लागली, हे विसरता येणार नाही.वनभंग म्हणजे काय?वनजमिनीवर अतिक्रमण करणे, वनजमिनींचा गैरवापर, नियमबाह्य रस्ते निर्मिती करणे, प्रकल्प उभारणे म्हणजे वनभंग करणे होय.