शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अवकाळीने बाधित १३७० हेक्टरला नव्या निकषाने मिळणार शासनमदत

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 28, 2023 18:24 IST

अवकाळीने बाधित १३७० हेक्टरला नव्या निकषाने शासनाकडून मदत मिळणार आहे. 

अमरावती : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने साडेतीन हजार हेक्टरमधील रब्बी व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यानुसार ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या २,६६३ शेतकऱ्यांना १,३६९ हेक्टर क्षेत्रासाठी नव्या वाढीव निकषानुसार शासन मदत मिळणार आहे, यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे. १६ ते १९ मार्चदरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने आठ तालुक्यातील १६४ गावांमधील ३,४०९ हेक्टर क्षेत्रातील गहू, हरभरा, कांदा व संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. 

या बाधित क्षेत्राची महसूल विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेमार्फत पंचनामे करण्यात आले. यामध्ये १,३६९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा अहवाल आहे. या बाधित क्षेत्राला आता २७ मार्चला जाहीर एनडीआरएफच्या नव्या निकषाने मदत मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे निधीची मागणी केल्याची माहिती आहे. नव्या निकषानुसार दोन हेक्टर क्षेत्र धारणा करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. यामध्ये रब्बीच्या जिरायती पिकांसाठी ८७०० रुपये हेक्टर, बागायती पिकांना १७ हजार रुपये हेक्टर व फळपिकांना २२,५०० रुपये हेक्टर या प्रमाणे शासन मदत देत राहणार आहे.

 

टॅग्स :Amravatiअमरावती