शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

१३७ कोटींचा संत्रा मातीमोल

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 11, 2024 17:36 IST

शासनाला अहवाल : मतदान प्रक्रियेनंतर आटोपले बाधित पिकांचे पंचनामे

अमरावती : अवकाळीचा कहर सुरूच असला तरी एप्रिल महिन्यातील नुकसानाचे पंचनामे आता आटोपले आहेत. यामध्ये सर्वाधिक १३७ कोटींचे नुकसान संत्रापिकाचे झालेले आहे. या आपत्तीमध्ये ६४ हजार शेतकऱ्यांच्या ४५ हजार हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे १५५ कोटींचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल आहे.

लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात महसूल व कृषी विभागाची क्षेत्रीय यंत्रणा व्यस्त होती. त्यामुळे गारपीट व अवकाळी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे रखडले होते. मतदान प्रक्रियेनंतरही पंचनामे सुरू न झाल्याने ‘लोकमत’द्वारा जिल्हा प्रशासनाचा लक्षवेध करण्यात आला होता. त्यानंतर पंचनाम्याला गती आली व विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शासनाकडे निधीची मागणी केली आहे.

प्राथमिक अहवालात जिरायती पिकांचे नुकसान दाखविण्यात आले असले, तरी पंचनाम्यात मात्र निरंक आहे. याशिवाय २० हजार शेतकऱ्यांच्या ६६५६ हेक्टरमधील बागायती पिकांचे १७.९७ कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. याशिवाय ४४७३९ शेतकऱ्यांच्या ३८ हजार हेक्टरमधील फळपिकांचे १३६.६८ कोटींचे नुकसान झालेले आहे. या आपत्तीमध्ये एकूण ६४७४८ शेतकऱ्यांच्या ४४६५० हेक्टरमधील पिकांचे १५४.७८ कोटींचे नुकसान झालेले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती