शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

१३७ कोटींचा संत्रा मातीमोल

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 11, 2024 17:36 IST

शासनाला अहवाल : मतदान प्रक्रियेनंतर आटोपले बाधित पिकांचे पंचनामे

अमरावती : अवकाळीचा कहर सुरूच असला तरी एप्रिल महिन्यातील नुकसानाचे पंचनामे आता आटोपले आहेत. यामध्ये सर्वाधिक १३७ कोटींचे नुकसान संत्रापिकाचे झालेले आहे. या आपत्तीमध्ये ६४ हजार शेतकऱ्यांच्या ४५ हजार हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे १५५ कोटींचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल आहे.

लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात महसूल व कृषी विभागाची क्षेत्रीय यंत्रणा व्यस्त होती. त्यामुळे गारपीट व अवकाळी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे रखडले होते. मतदान प्रक्रियेनंतरही पंचनामे सुरू न झाल्याने ‘लोकमत’द्वारा जिल्हा प्रशासनाचा लक्षवेध करण्यात आला होता. त्यानंतर पंचनाम्याला गती आली व विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शासनाकडे निधीची मागणी केली आहे.

प्राथमिक अहवालात जिरायती पिकांचे नुकसान दाखविण्यात आले असले, तरी पंचनाम्यात मात्र निरंक आहे. याशिवाय २० हजार शेतकऱ्यांच्या ६६५६ हेक्टरमधील बागायती पिकांचे १७.९७ कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. याशिवाय ४४७३९ शेतकऱ्यांच्या ३८ हजार हेक्टरमधील फळपिकांचे १३६.६८ कोटींचे नुकसान झालेले आहे. या आपत्तीमध्ये एकूण ६४७४८ शेतकऱ्यांच्या ४४६५० हेक्टरमधील पिकांचे १५४.७८ कोटींचे नुकसान झालेले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती