शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

१३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

२४ एप्रिल ते २ मे या नऊ दिवसांत ४२ व्यक्ती बाधित निष्पन्न झाल्या आहेत. शुक्रवारी ३ व शनिवारी १० असा एकूण १३ व्यक्तींचा नमुना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५३ वर पोहोचली आहे. यामध्ये १० दगावले, तर चार कोरोनामुक्त झाले आहेत. ३९ व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देशनिवारी १० अहवाल पॉझिटिव्ह । जिल्हा ‘रेड झोन’मध्येच, अर्धशतक पार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरात झपाट्याने वाढला आहे. २४ एप्रिल ते २ मे या नऊ दिवसांत ४२ व्यक्ती बाधित निष्पन्न झाल्या आहेत. शुक्रवारी ३ व शनिवारी १० असा एकूण १३ व्यक्तींचा नमुना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५३ वर पोहोचली आहे. यामध्ये १० दगावले, तर चार कोरोनामुक्त झाले आहेत. ३९ व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार, अमरावती जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. मात्र, ही यादी २७ एप्रिलच्या आकडेवारीनुसार आहे. यानंतर जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याने झोनबदलाचे आदेश मंत्रालयाकडून निघतील. मात्र, कोरोनाबाधितांच्या वाढत्या आलेखावरून जिल्हा ‘रेड झोन’मध्ये आहे, असे गृहीत धरूनच उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शनिवारी कोविड रुग्णालयात दगावलेल्या तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये कंवरनगरातील ५८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या कुटुंबातील तीन व्यक्तींचा अहवाल यापूर्वीच पॉझिटिव्ह आला. अन्य ५३ वर्षीय मृत व्यक्ती छायानगरातील आहे, तर तिसरी व्यक्ती वलगाव ठाण्याच्या हद्दीतील शिराळा येथील ५० वर्षीय पुरुष आहे. या बाधिताचा संपर्कदेखील येथील क्लस्टर झोनमध्ये आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. याव्यतिरिक्त ताजनगरातील तीन पुरुष, दोन महिला व एक सात वर्षीय मुलगी, तारखेडा येथील ३८ वर्षीय पुरुष व गौसनगर येथील २३ वर्षीय युवकाच्या घशातील स्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यात अतिजोखमीच्या २०० व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. नागपूर, अकोला व सेवाग्राम येथे सद्यस्थितीत नमुने तपासणीला पाठविले जात आहेत. वरूड तेथील तहसीलदारांच्या वाहनचालकाची पत्नी पॉझिटिव्ह आल्याने तेथील दोन खासगी डॉक्टरांसह १२ व्यक्ती क्वारंटाइन करण्यात आले आहेत. तेथील तहसीलदारदेखील सेल्फ क्वारंटाइन झाले आहेत. विद्यापीठाची लॅब येत्या दोन दिवसांत सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवाल यांनी दिली.सेल्फ क्वारंटाइननेसाखळी तुटणार - जिल्हाधिकारीकोरोनाची साखळी तुटणे महत्त्वाचे आहे. यासाठी स्वत:ला क्वारंटाइन करून घेणे महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळविले, तेथे ‘सेल्फ क्वारंटाइन’ हे हत्यार महत्त्वाचे ठरले आहे. कंटेनमेंट झोनमधील हाथीपुºयात कोरोनाचा पहिला बाधित आढळला होता. त्यानंतर त्या कुटुंबातील चार पॉझिटिव्ह आढळले व ते कोरोनामुक्तही झाले. त्यानंतर या परिसरात कोरोनाग्रस्त नाहीत. याच धर्तीवर अन्य कंटेनमेंटमध्ये नागरिकांनी ‘सेल्फ क्वारंटाइन’ व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.आई-वडिलासह सात वर्षाची मुलगी पॉझिटिव्हअमरावतीच्या ताजनगरातील एका वृद्धाचे २४ एप्रिलला घरी निधन झाले होते. त्यानंतर २७ तारखेला त्यांचा नमुना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या कुटुंबातील अतिजोखमीच्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले होते. यापैकी पाच व्यक्तींचा नमुना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. यामध्ये मृताचा मुलगा, सून, त्यांची सात वर्षाची मुलगी, मृताचा भाचा व अन्य एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.कोरोना चाचणी लॅबसाठी लॉगीन आयडी प्राप्तसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला कोरोना चाचणी लॅब कार्यान्वित करण्यास आयसीएमआरकडून मान्यतेचे पत्र शनिवारी प्राप्त झाले. त्यानुसार सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महत्त्वाचा असणारा लॉगीन आयडीदेखील शनिवारी मिळाला. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी दूरध्वनीवर पाठपुरावा केल्याने ही सुविधा जिल्ह्यास उपलब्ध झाली आहे. येथे लॅब सुरू झाल्यामुळे सध्या सुरू असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावी, जलद व व्यापक करणे शक्य होणार आहे.कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, शहरात ‘रेड झोन’च्या उपाययोजना सुरू आहे. निर्बंध आणखी कठोर केल्या जातील. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी नागरिकांनी ‘सेल्फ क्वारंटाइन’ करणे महत्त्वाचे आहे.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या