शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

वादळाने धारणी तालुक्यात १.२७ कोटींचे नुकसान; अवकाळीचा फटका

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 12, 2023 17:43 IST

पिकांचे पंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल

अमरावती : जिल्ह्यात ३१ मार्चला धारणी तालुक्यात जोरदार वादळासह अवकाळी पावसाने दणका दिला. यामध्ये ७४२ हेक्टरमध्ये मोठे नुकसान झाले होते, या बाधित क्षेत्राचे पंचनामे आता पूर्ण झाले असून जिल्हा प्रशासनाने १,२६,१७,०६० रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनूसार या आपत्तीमुळे ९२७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ४२२ हेक्टरमधील गहू, ९४ हेक्टरमधील हरभरा, १२७ हेक्टरमधील मका, १०० हेक्टरमधील उन्हाळी मूग पिकाचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचे पंचनाम्याअंती स्पष्ट झाले आहे. या बाधित पिकांना आता एसडीआरएफच्या सुधारित निकषाप्रमाणे मदत देय राहणार आहे.

तहसील प्रशासनाद्वारा बाधित शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात येतील व त्यानंतर या आपत्तीसाठी शासन निधी मंजूर झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात शासनस्तरावरुन मदत जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.