शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बांधकाम कंत्राटदारांना १२.५० कोटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:12 IST

सुमारे ९० कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी महापालिकेच्या विकास कामांवरील बहिष्कार कंत्राटदारांनी मंगळवारी मागे घेतला.

ठळक मुद्देसंप मिटला : महापालिकेत आनंदीआनंद, आजी-माजींची मध्यस्थी

आॅनलाईन लोकमतअमरावती : सुमारे ९० कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी महापालिकेच्या विकास कामांवरील बहिष्कार कंत्राटदारांनी मंगळवारी मागे घेतला. थकबाकीपोटी एकमुस्त १२.५० कोटी रुपये महापालिकेच्या कंत्राटदारांना देण्यास प्रशासन तयार झाल्याने हा तिढा सुटला. पाच महिन्यांपासून उपसलेले बहिष्काराचे अस्त्र कंत्राटदारांनी म्यान केल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. महापौर संजय नरवणे आणि माजी महापौर विलास इंगोले यांच्या मध्यस्थीने प्रशासन बांधकाम कंत्रादारांना १२.५० कोटी रुपये देण्यास तयार झाले. त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक व प्रशासनाचे कंत्राटदारांनी आभार मानलेत.महापालिकेने सुमारे ९० कोटी रुपये थकविल्याने या कंत्राटदारांनी काळी दिवाळी साजरी करुन प्रशासनाचा निषेध केला होता. त्यांनी महापालिकेच्या सर्व नवीन कामांवर बहिष्कार घातल्याने शहरात एकही नवीन काम सुरु झाले नाही. हा तिढा सोडविण्यासाठी अनेक स्तरावर बैठकी झाल्या. मात्र बोलणी फिस्कटल्याने कंत्राटदार बहिष्कारावर ठाम राहिले. मात्र मंगळवारची बोलणी यशस्वी ठरली.राज्यशासनाने जीएसटी अनुदानापोटी १८.९३ कोटी रुपये दिल्याने त्यातील ११ कोटींची वाढीव रक्कम आपल्याला द्यावी, अशी मागणी मंगळवारी कंत्राटदार असोशिएशनने केली. माजी महापौर विलास इंगोले, विरोधीपक्षनेता बबलू शेखावत यांनी त्यांचे नेतृत्व केले. त्या बैठकीत ८ कोटी रुपये कंत्राटदारांना देण्याची तयारी आयुक्तांनी दाखविली. महावितरण व जिल्हाधिकारी कार्यालयाला एकूण पाच कोटी रुपये द्यायचे असल्याने कंत्राटदारांना ८ कोटी रुपये देणे शक्य असल्याचे मत मांडण्यात आले. त्यानंतर महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी सभापती तुषार भारतीय, सभागृहनेता सुनील काळे व ज्येष्ट सदस्य प्रकाश बन्सोड, विजय वानखडे, अजय गोंडाणे यांनी आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर या कंत्राटदारांना १२.५० कोटी रुपये देण्यावर प्रशासनाच्यावतीने शिक्कामोर्तब करण्यात आले. जीएसटी अनुदानातील रकमेसह काही रक्कम मालमत्ता कर व एलबीटीतून दिली जाईल.प्रत्येकाला १२.५० टक्के रक्कममहापालिकेतील १०० हून अधिक बांधकाम कंत्राटदारांचे सुमारे ९० कोटी रुपये प्रशासनाकडे थकले आहेत. त्यातील १२.५० कोटी रुपये देण्याचा निर्णय मंगळवारी झाला. त्यानुसार आता प्रत्येक कंत्राटदाराला त्याच्या एकूण थकीत देयकाच्या १२.५० टक्के रक्कम दिली जाणार आहे. या निर्णयामुळे कंत्राटदारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.