शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

दुष्काळग्रस्तांना १२५ कोटी

By admin | Updated: January 10, 2015 22:45 IST

जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती, ४६ पैसे पैसेवारी, खरिपासह रबी हंगामावर नापिकीची गडद छाया या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२५ कोटी ८० लक्ष रुपयांचा मदतनिधी शुक्रवारी

प्रतीक्षा संपली : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार रक्कम जमाअमरावती : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती, ४६ पैसे पैसेवारी, खरिपासह रबी हंगामावर नापिकीची गडद छाया या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२५ कोटी ८० लक्ष रुपयांचा मदतनिधी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसाने दडी मारल्याने खरीप २०१४ चा हंगाम दीड महिना उशिराने सुरू झाला. ६० दिवसांचे मूग, उडदाचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. सोयाबीनचे निकृष्ट बियाणे, दुबार, तिबार पेरणी, पावसाचा खंड, रोगांचा प्रादुर्भाव तसेच फुलोऱ्यावर आणि शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस नसल्याने पीक उद्ध्वस्त झाले. सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ७० ते ९० टक्क्यांनी घट झाली. १५ नोव्हेंबर २०१४ रोजी शासनाने जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे जाहीर केली. नापिकीमुळे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १९८१ गावांमधील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकऱ्यांच्या ७ लाख ७६ हजार २५४ हेक्टर शेतीपीक व फळपिकांचे नुकसान झाले.जिल्ह्यामधील शेतकरी नापिकी, दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनात ११ डिसेंबर २०१४ रोजी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने पॅकेज जाहीर केले. घोषणेला १ महिना झाल्यावरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.