शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

दुष्काळग्रस्तांना १२५ कोटी

By admin | Updated: January 10, 2015 22:45 IST

जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती, ४६ पैसे पैसेवारी, खरिपासह रबी हंगामावर नापिकीची गडद छाया या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२५ कोटी ८० लक्ष रुपयांचा मदतनिधी शुक्रवारी

प्रतीक्षा संपली : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार रक्कम जमाअमरावती : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती, ४६ पैसे पैसेवारी, खरिपासह रबी हंगामावर नापिकीची गडद छाया या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२५ कोटी ८० लक्ष रुपयांचा मदतनिधी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसाने दडी मारल्याने खरीप २०१४ चा हंगाम दीड महिना उशिराने सुरू झाला. ६० दिवसांचे मूग, उडदाचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. सोयाबीनचे निकृष्ट बियाणे, दुबार, तिबार पेरणी, पावसाचा खंड, रोगांचा प्रादुर्भाव तसेच फुलोऱ्यावर आणि शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस नसल्याने पीक उद्ध्वस्त झाले. सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ७० ते ९० टक्क्यांनी घट झाली. १५ नोव्हेंबर २०१४ रोजी शासनाने जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे जाहीर केली. नापिकीमुळे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १९८१ गावांमधील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकऱ्यांच्या ७ लाख ७६ हजार २५४ हेक्टर शेतीपीक व फळपिकांचे नुकसान झाले.जिल्ह्यामधील शेतकरी नापिकी, दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनात ११ डिसेंबर २०१४ रोजी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने पॅकेज जाहीर केले. घोषणेला १ महिना झाल्यावरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.