शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

१२३६ कामगार बिहारकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:01 IST

मॉडेल रेल्वे स्थानकाहून शनिवारी लखनौकडे एक ट्रेन रवाना झाली, तर रविवारी दुसºया दिवशी पुन्हा कामगारांना घेऊन ट्रेन रवाना झाली. रेल्वे प्रशासनाने सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर या गाडीला पुढे रवाना करण्यात आले. अमरावती विभागातून पाचही जिल्ह्यातील कामगारांना या ट्रेनमधून प्लॅटफार्म क्रमांक १ वरून पाठविण्यात आले. राज्य शासनाकडून परप्रांतीय कामगारांसाठी जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

ठळक मुद्दे२४ डब्यांची श्रमिक रेल्वे : विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेले मजूर, कामगारांना त्यांच्या मूळ गावी परत जाता यावे, यासाठी केंद्र सरकारने श्रमिक रेल्वे गाडीची व्यवस्था केली आहे. त्याअनुषंगाने अमरावती रेल्वे स्थानकाहून रविवारी दुपारी २ वाजता बरोनी (बिहार) येथे २४ डब्यांची गाडी रवाना झाली. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यासह फौजफाटा उपस्थित होता.मॉडेल रेल्वे स्थानकाहून शनिवारी लखनौकडे एक ट्रेन रवाना झाली, तर रविवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा कामगारांना घेऊन ट्रेन रवाना झाली. रेल्वे प्रशासनाने सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर या गाडीला पुढे रवाना करण्यात आले.अमरावती विभागातून पाचही जिल्ह्यातील कामगारांना या ट्रेनमधून प्लॅटफार्म क्रमांक १ वरून पाठविण्यात आले. राज्य शासनाकडून परप्रांतीय कामगारांसाठी जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अमरावती विभागातून विविध गावातून कामगार आपल्या गावी जाण्यासाठी मॉडेल रेल्वे स्थानकावर आले होते. सुरक्षेसाठी आरपीएफ तैनात होते. दरम्यान, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांना जेवण, चहा, पाण्याच्या व्यवस्थेबाबत पाहणी केली. ही गाडी नागपूर, इटारसी होत बरोनी (बिहार) येथे पोहचणार असल्याची माहिती आहे. या गाडीतून अकोला जिल्हा ६८, वाशिम ३९४, बुलडाणा १५९, यवतमाळ १९९ व अमरावती जिल्ह्यातून ४१६ कामगार रवाना झाले आहेत.झारखंड येथील मजुरांसाठी लवकरच ट्रेन- पालकमंत्रीबिहार येथे कामगारांना घेऊन रविवारी श्रमिक विशेष ट्रेन रवाना झाली. आता येत्या एक, दोन दिवसात झारखंड येथील कामगार, मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना तयारी करण्याबाबत अवगत करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या झारखंड येथील कामगारांना लवकरच स्वगृही परतता येईल, असे ना. ठाकूर म्हणाल्या.तिकिटांशिवाय नव्हता प्लॅटफार्मवर प्रवेशकामगारांच्या प्रत्येक जथ्यासोबत महसूल प्रशासनाने नोडल अधिकारी नियुक्त होते. जिल्हा प्रशासनाकडे नोंदणीकृत कामगारांनाच श्रमिक रेल्वेने प्रवासाची मुभा होती. प्रवास सुरू करण्यापूर्वी कामगारांना अगोदर तिकिट अनिवार्य होते. प्रति प्रवासी ६६५ रूपये याप्रमाणे रेल्वेला ८ लाख २१ हजार ९४० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहेत. तिकिटांशिवाय प्लॅटफार्मवर प्रवेश नव्हता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या