शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

१२३६ कामगार बिहारकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:01 IST

मॉडेल रेल्वे स्थानकाहून शनिवारी लखनौकडे एक ट्रेन रवाना झाली, तर रविवारी दुसºया दिवशी पुन्हा कामगारांना घेऊन ट्रेन रवाना झाली. रेल्वे प्रशासनाने सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर या गाडीला पुढे रवाना करण्यात आले. अमरावती विभागातून पाचही जिल्ह्यातील कामगारांना या ट्रेनमधून प्लॅटफार्म क्रमांक १ वरून पाठविण्यात आले. राज्य शासनाकडून परप्रांतीय कामगारांसाठी जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

ठळक मुद्दे२४ डब्यांची श्रमिक रेल्वे : विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेले मजूर, कामगारांना त्यांच्या मूळ गावी परत जाता यावे, यासाठी केंद्र सरकारने श्रमिक रेल्वे गाडीची व्यवस्था केली आहे. त्याअनुषंगाने अमरावती रेल्वे स्थानकाहून रविवारी दुपारी २ वाजता बरोनी (बिहार) येथे २४ डब्यांची गाडी रवाना झाली. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यासह फौजफाटा उपस्थित होता.मॉडेल रेल्वे स्थानकाहून शनिवारी लखनौकडे एक ट्रेन रवाना झाली, तर रविवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा कामगारांना घेऊन ट्रेन रवाना झाली. रेल्वे प्रशासनाने सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर या गाडीला पुढे रवाना करण्यात आले.अमरावती विभागातून पाचही जिल्ह्यातील कामगारांना या ट्रेनमधून प्लॅटफार्म क्रमांक १ वरून पाठविण्यात आले. राज्य शासनाकडून परप्रांतीय कामगारांसाठी जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अमरावती विभागातून विविध गावातून कामगार आपल्या गावी जाण्यासाठी मॉडेल रेल्वे स्थानकावर आले होते. सुरक्षेसाठी आरपीएफ तैनात होते. दरम्यान, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांना जेवण, चहा, पाण्याच्या व्यवस्थेबाबत पाहणी केली. ही गाडी नागपूर, इटारसी होत बरोनी (बिहार) येथे पोहचणार असल्याची माहिती आहे. या गाडीतून अकोला जिल्हा ६८, वाशिम ३९४, बुलडाणा १५९, यवतमाळ १९९ व अमरावती जिल्ह्यातून ४१६ कामगार रवाना झाले आहेत.झारखंड येथील मजुरांसाठी लवकरच ट्रेन- पालकमंत्रीबिहार येथे कामगारांना घेऊन रविवारी श्रमिक विशेष ट्रेन रवाना झाली. आता येत्या एक, दोन दिवसात झारखंड येथील कामगार, मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना तयारी करण्याबाबत अवगत करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या झारखंड येथील कामगारांना लवकरच स्वगृही परतता येईल, असे ना. ठाकूर म्हणाल्या.तिकिटांशिवाय नव्हता प्लॅटफार्मवर प्रवेशकामगारांच्या प्रत्येक जथ्यासोबत महसूल प्रशासनाने नोडल अधिकारी नियुक्त होते. जिल्हा प्रशासनाकडे नोंदणीकृत कामगारांनाच श्रमिक रेल्वेने प्रवासाची मुभा होती. प्रवास सुरू करण्यापूर्वी कामगारांना अगोदर तिकिट अनिवार्य होते. प्रति प्रवासी ६६५ रूपये याप्रमाणे रेल्वेला ८ लाख २१ हजार ९४० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहेत. तिकिटांशिवाय प्लॅटफार्मवर प्रवेश नव्हता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या