शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

'अमृत'चे १२२.५८ कोटी मंजूर

By admin | Updated: June 25, 2016 00:04 IST

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत अमरावतीत वाढीव पाणीपुरवठा टप्पा- २ मध्ये १२२.५८ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे

सन २०४८ पर्यंत नियोजन : वाढीव पाणीपुरवठा टप्पा-२अमरावती : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत अमरावतीत वाढीव पाणीपुरवठा टप्पा- २ मध्ये १२२.५८ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. सन - २०४८ पर्यंत लोकसंख्येचा वेध घेत पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. आ. सुनील देशमुख यांनी अमृत योजना मंजुरीसाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न केले आहे.राज्यभर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना अमरावतीकरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवली नाही. दादासाहेब गवई, सुदामकाका देशमुख, बी.टी. देशमुख यांच्या महत्प्रयासाने सन १९८३ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुहूर्तमेढ रोवली. पाणी पुरवठा योजना टप्पा १ अंतर्गत आजतागायत पाणीपुरवठा महानगरात केला जात आहे. शहरात पाणीपुरवठा उर्ध्ववर्धा धरणातून करण्यात येत असून योजनेचे तपोवन परिसरात ९५ दशलक्ष लीटर क्षमतेचे जलशुद्धिकरण केंद्र साकाराले आहे. १६ जलकुंभ व जलवाहिन्यांद्वारे दररोज ११५ द.ल. ली एवढा पाणीपुरवठा महानगरात केला जातो. मात्र जुन्या पाणीपुरवठा योजनेचे आयुर्मान २०१६ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे महानगराचा पाणी पुरवठा योजनेचा विकास आराखडा तयार केला गेला. केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेतून वाढीव पाणी पुरवठ्यासाठी १२२.५८ कोटी मंजूर झाल्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी समस्येवर मात करता येणार आहे. तपोवन येथे २.० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याचा वैशिष्टपूर्ण कामांचा यात समावेश आहे.