शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

'अमृत'चे १२२.५८ कोटी मंजूर

By admin | Updated: June 25, 2016 00:04 IST

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत अमरावतीत वाढीव पाणीपुरवठा टप्पा- २ मध्ये १२२.५८ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे

सन २०४८ पर्यंत नियोजन : वाढीव पाणीपुरवठा टप्पा-२अमरावती : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत अमरावतीत वाढीव पाणीपुरवठा टप्पा- २ मध्ये १२२.५८ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. सन - २०४८ पर्यंत लोकसंख्येचा वेध घेत पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. आ. सुनील देशमुख यांनी अमृत योजना मंजुरीसाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न केले आहे.राज्यभर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना अमरावतीकरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवली नाही. दादासाहेब गवई, सुदामकाका देशमुख, बी.टी. देशमुख यांच्या महत्प्रयासाने सन १९८३ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुहूर्तमेढ रोवली. पाणी पुरवठा योजना टप्पा १ अंतर्गत आजतागायत पाणीपुरवठा महानगरात केला जात आहे. शहरात पाणीपुरवठा उर्ध्ववर्धा धरणातून करण्यात येत असून योजनेचे तपोवन परिसरात ९५ दशलक्ष लीटर क्षमतेचे जलशुद्धिकरण केंद्र साकाराले आहे. १६ जलकुंभ व जलवाहिन्यांद्वारे दररोज ११५ द.ल. ली एवढा पाणीपुरवठा महानगरात केला जातो. मात्र जुन्या पाणीपुरवठा योजनेचे आयुर्मान २०१६ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे महानगराचा पाणी पुरवठा योजनेचा विकास आराखडा तयार केला गेला. केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेतून वाढीव पाणी पुरवठ्यासाठी १२२.५८ कोटी मंजूर झाल्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी समस्येवर मात करता येणार आहे. तपोवन येथे २.० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याचा वैशिष्टपूर्ण कामांचा यात समावेश आहे.