शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

१२ वेळा मान्सून लेटलतीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 23:09 IST

यंदा जून महिन्याची अखेर असतानाही मान्सूनचा पाऊस झालेला नाही. दोन दिवसांत तुरळक, तर २ जुलैनंतर सार्वत्रिक पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे. मागील ६९ वर्षात तब्बल १२ वेळा मान्सूनने हुलकावणी देत जुलैमध्ये दाखल झाला. आजवर २००३ मध्ये २५ जुलै रोजी झालेले मान्सूनचे आगमन हे सर्वाधिक उशिराचे ठरले आहे, तर १९९० मध्ये ५ जून हे मान्सूनचे वेळेपूर्वीचे आगमन ठरले.

ठळक मुद्दे६९ वर्षांमध्ये आगमनात वैविध्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा जून महिन्याची अखेर असतानाही मान्सूनचा पाऊस झालेला नाही. दोन दिवसांत तुरळक, तर २ जुलैनंतर सार्वत्रिक पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे. मागील ६९ वर्षात तब्बल १२ वेळा मान्सूनने हुलकावणी देत जुलैमध्ये दाखल झाला. आजवर २००३ मध्ये २५ जुलै रोजी झालेले मान्सूनचे आगमन हे सर्वाधिक उशिराचे ठरले आहे, तर १९९० मध्ये ५ जून हे मान्सूनचे वेळेपूर्वीचे आगमन ठरले.दरवर्षीच मान्सूनच्या आगमनात वैविध्य आहे. यंदा ‘एल निनो’चा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे सरासरीइतपत पाऊस होण्याचे भाकीत हवामान विभागाने केले होते तसेच साधारणपणे १२ ते १५ जूनच्या दरम्यान विदर्भात मान्सून दाखल होईल, अशी शक्यता हवामानविभागाने वर्तविली होती. प्रत्यक्षात अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सूनची गती मंदावली व नियोजित वेळेपेक्षा पाच दिवस उशिरा मान्सूनची वाटचाल सुरू झाली. मागील आठवड्यात मुंबई अन् या चार दिवसांत मराठवाड्यात पाऊस होत असताना मध्य विदर्भात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात पावसाने दाद दिलेली नाही.कृषी विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत १२ वेळा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले आहे. यामध्ये १९९० मध्ये ५ जून, २००० मध्ये ६ जून, १९८० मध्ये ७ जून, १९९४ मध्ये ७ जून, १९९१ मध्ये १० जून, १९९८ मध्ये ११ जून, २०१३ मध्ये ११ जून, २०१२ मध्ये १२ जून, १९७३ मध्ये १३ जून, १९९३ मध्ये १३ जून, तर १९७७ मध्ये १३ जून हे मान्सूनच्या वेळेवर आगमनाचे दिवस ठरले आहे.यंदा मात्र जूनची अखेर असतानाही दमदार पाऊस झालेला नाही. किंबहुना रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे शेती मशागतीची कामे खोळंबली आहे. यंदा रोहिणीत प्रीमान्सूनचा पाऊस झालेला नाही. भूजलाची पातळी खालावल्याने विहिरींनी तळ गाठल्याने पूर्वमोसमी पेरण्या झालेल्या नाहीत. पावसात सातत्य नसल्यामुळे यंदा खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. याचा थेट परिणाम सरासरी उत्पादनावर होणार आहे.जिल्ह्यात सरासरी६० मिमी पाऊसजिल्ह्यात १ ते २९ जून दरम्यान १४१ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ६० मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी याच दिनांकाला ८९.६ मिमी पाऊस पडला होता. यंदा अमरावती ६१.९, भातकुली ६१.२, नांदगाव ५९, चांदूर रेल्वे ६८, धामणगाव रेल्वे ८०.५, तिवसा १२.३, मोर्शी ४१.६, वरूड ३८.१, अचलपूर ५८.३, चांदूरबाजार ५८.६, दर्यापूर ५३.७, अंजनगाव सुर्जी ३७.४, धारणी ११५.८ व चिखलदरा तालुक्यात ९३.८ मिमी पाऊस पडला आहे.हवामानाची सद्यस्थितीहवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार, ३ जुलैपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील होऊ शकते. त्यामुळे हवामान विभागाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. ३ ते ५ जुलै दरम्यान बहुतेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. खरिपाच्या पेरणीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.यंदा २३ जूनला मान्सूनचे आगमन झाले असले तरी सार्वत्रिक पाऊस झालेला नाही. आता १ जुलैनंतर दमदार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी ३० जूनपासून खरिपाच्या पेरणी करावयास हरकत नाही.- अनिल बंड, हवामानतज्ज्ञमान्सूनचे उशिरा आगमनकृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, १९८२ मध्ये २० जुलै, १९८३ मध्ये १२ जुलै, १९८४ मध्ये १ जुलै, १९९५ मध्ये ९ जुलै, १९९६ मध्ये २१ जुलै, १९९९ मध्ये ९ जुलै, २००२ मध्ये १७ जुलै, २००३ मध्ये २५ जुलै, २००४ मध्ये १० जुलै, २०१० मध्ये ७ जुलै, २०१४ मध्ये ११ जुलै तसेच यंदादेखील जुलै महिना उजाडणार आहे. ४० वर्षांमध्ये मान्सूनचे १ ते ३० जूनच्या कालावधीत आगमन झालेले आहे.