शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

१२ वेळा मान्सून लेटलतीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 23:09 IST

यंदा जून महिन्याची अखेर असतानाही मान्सूनचा पाऊस झालेला नाही. दोन दिवसांत तुरळक, तर २ जुलैनंतर सार्वत्रिक पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे. मागील ६९ वर्षात तब्बल १२ वेळा मान्सूनने हुलकावणी देत जुलैमध्ये दाखल झाला. आजवर २००३ मध्ये २५ जुलै रोजी झालेले मान्सूनचे आगमन हे सर्वाधिक उशिराचे ठरले आहे, तर १९९० मध्ये ५ जून हे मान्सूनचे वेळेपूर्वीचे आगमन ठरले.

ठळक मुद्दे६९ वर्षांमध्ये आगमनात वैविध्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा जून महिन्याची अखेर असतानाही मान्सूनचा पाऊस झालेला नाही. दोन दिवसांत तुरळक, तर २ जुलैनंतर सार्वत्रिक पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे. मागील ६९ वर्षात तब्बल १२ वेळा मान्सूनने हुलकावणी देत जुलैमध्ये दाखल झाला. आजवर २००३ मध्ये २५ जुलै रोजी झालेले मान्सूनचे आगमन हे सर्वाधिक उशिराचे ठरले आहे, तर १९९० मध्ये ५ जून हे मान्सूनचे वेळेपूर्वीचे आगमन ठरले.दरवर्षीच मान्सूनच्या आगमनात वैविध्य आहे. यंदा ‘एल निनो’चा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे सरासरीइतपत पाऊस होण्याचे भाकीत हवामान विभागाने केले होते तसेच साधारणपणे १२ ते १५ जूनच्या दरम्यान विदर्भात मान्सून दाखल होईल, अशी शक्यता हवामानविभागाने वर्तविली होती. प्रत्यक्षात अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सूनची गती मंदावली व नियोजित वेळेपेक्षा पाच दिवस उशिरा मान्सूनची वाटचाल सुरू झाली. मागील आठवड्यात मुंबई अन् या चार दिवसांत मराठवाड्यात पाऊस होत असताना मध्य विदर्भात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात पावसाने दाद दिलेली नाही.कृषी विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत १२ वेळा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले आहे. यामध्ये १९९० मध्ये ५ जून, २००० मध्ये ६ जून, १९८० मध्ये ७ जून, १९९४ मध्ये ७ जून, १९९१ मध्ये १० जून, १९९८ मध्ये ११ जून, २०१३ मध्ये ११ जून, २०१२ मध्ये १२ जून, १९७३ मध्ये १३ जून, १९९३ मध्ये १३ जून, तर १९७७ मध्ये १३ जून हे मान्सूनच्या वेळेवर आगमनाचे दिवस ठरले आहे.यंदा मात्र जूनची अखेर असतानाही दमदार पाऊस झालेला नाही. किंबहुना रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे शेती मशागतीची कामे खोळंबली आहे. यंदा रोहिणीत प्रीमान्सूनचा पाऊस झालेला नाही. भूजलाची पातळी खालावल्याने विहिरींनी तळ गाठल्याने पूर्वमोसमी पेरण्या झालेल्या नाहीत. पावसात सातत्य नसल्यामुळे यंदा खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. याचा थेट परिणाम सरासरी उत्पादनावर होणार आहे.जिल्ह्यात सरासरी६० मिमी पाऊसजिल्ह्यात १ ते २९ जून दरम्यान १४१ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ६० मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी याच दिनांकाला ८९.६ मिमी पाऊस पडला होता. यंदा अमरावती ६१.९, भातकुली ६१.२, नांदगाव ५९, चांदूर रेल्वे ६८, धामणगाव रेल्वे ८०.५, तिवसा १२.३, मोर्शी ४१.६, वरूड ३८.१, अचलपूर ५८.३, चांदूरबाजार ५८.६, दर्यापूर ५३.७, अंजनगाव सुर्जी ३७.४, धारणी ११५.८ व चिखलदरा तालुक्यात ९३.८ मिमी पाऊस पडला आहे.हवामानाची सद्यस्थितीहवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार, ३ जुलैपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील होऊ शकते. त्यामुळे हवामान विभागाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. ३ ते ५ जुलै दरम्यान बहुतेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. खरिपाच्या पेरणीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.यंदा २३ जूनला मान्सूनचे आगमन झाले असले तरी सार्वत्रिक पाऊस झालेला नाही. आता १ जुलैनंतर दमदार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी ३० जूनपासून खरिपाच्या पेरणी करावयास हरकत नाही.- अनिल बंड, हवामानतज्ज्ञमान्सूनचे उशिरा आगमनकृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, १९८२ मध्ये २० जुलै, १९८३ मध्ये १२ जुलै, १९८४ मध्ये १ जुलै, १९९५ मध्ये ९ जुलै, १९९६ मध्ये २१ जुलै, १९९९ मध्ये ९ जुलै, २००२ मध्ये १७ जुलै, २००३ मध्ये २५ जुलै, २००४ मध्ये १० जुलै, २०१० मध्ये ७ जुलै, २०१४ मध्ये ११ जुलै तसेच यंदादेखील जुलै महिना उजाडणार आहे. ४० वर्षांमध्ये मान्सूनचे १ ते ३० जूनच्या कालावधीत आगमन झालेले आहे.