शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

पश्चिम विदर्भात ११ हजार मे. टन चाऱ्याची तूट; दुष्काळाच्या झळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 17:04 IST

अत्यल्प पावसामुळे पश्चिम विदर्भात २८ तालुक्यांसह ४७ महसूल मंडळांत शासनाने दुष्काळ जाहीर केला. उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. दुष्काळामुळे वैरणटंचाईची मोठी समस्या भेडसावत आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : अत्यल्प पावसामुळे पश्चिम विदर्भात २८ तालुक्यांसह ४७ महसूल मंडळांत शासनाने दुष्काळ जाहीर केला. उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. दुष्काळामुळे वैरणटंचाईची मोठी समस्या भेडसावत आहे. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तांच्या माहितीनुसार विभागातील दुष्काळी भागात लहान-मोठी २५ लाख ३६ हजार पशूधन आहेत. या पशूधनाला किमान ११,०२८ मे.टन चा-याची कमी  भासणार असल्याने चा-याची तूट भरून काढायला संबंधित विभागाचे नियोजन सुरू आहे.राज्यातील दुष्काळी गावांत पाणीटंचाईसह वैरणटंचाईची मोठी प्रमाणावर समस्या असल्याने या सर्व ठिकाणी चाºयाचे नियोजन करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या गावातच चा-याच्या उपलब्धतेसाठी नियोजन सुरू आहे. यात गाळपेर क्षेत्रात चारा निर्मिती हा पर्याय म्हणून समोर आलेला आहे. प्रकल्पाला कोरड लागल्याने यामधील पाणीसाठा कमी झालेला आहे. या बुडीत क्षेत्रातील जमिनी शेतक-यांना मका, ज्वारी, बाजरी सारखी चारा पिके घ्यायला नाममात्र एक रूपया भाडेपट्टीने शेतकºयांना देण्यात येणार आहे. विभागात ७,३६० हेक्टर गाळपेर क्षेत्रात ६३९ क्विंटल मका, ५१६ क्विंटल ज्वार, ८८ क्विंटल बाजरी व १४ क्विंटल न्यूट्रीफिड बियाण्यांची आवश्यकता आहे. यासाठी विभागात सद्यस्थितीत २,१३५ अर्ज पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झालेले आहेत. राज्यासाठी उपलब्ध १० कोटींमधून विभागात आरकेव्हीवाय योजनेंतर्गत ४५६ क्विंटल मका बियाणे प्राप्त आहेत. यामध्ये ४५,६४५ मे.टन हिरवी वैरण व ज्वारीसाठी ५४२ क्विंटल बियाणे प्राप्त आहेत. यामधून ६०,९९५ मे.टन हिरवे वैरण उपलब्ध होणार आहे. असे एकूण १,०६,६०० मे.टन चाºयाचे नियोजन करण्यात आले आहे. २,२७० हेक्टरमध्ये हे नियोजन आहे. यासाठी १४,४९२ अर्ज प्राप्त झाले असून,  यामधून १२,७३९ लाभार्थ्यांची निवड पशुसंवर्धन विभागाने केली आहे.

जिल्हानिहाय पशुधन, लागणारा चाराअमरावती जिल्ह्यातील १०,०३,५५५ पशुधनाला प्रतीमाह १,०५,२४२ मे.टन चाºयाची आवशकता आहे. अकोला जिल्ह्यात ४,५२,४८८ पशुधनाला ५२,३६२ मे.टन., बुलडाणा जिल्ह्यात १०,२०,३३७ पशूधनाला १,१४,७४३ मे.टन, वाशीम जिल्ह्यात ४,५७,५२४ पशुधनाला ५३,५१० मे.टन. व यवतमाळ जिल्ह्यातील ११,४०,३३९ पशुधनाला १,४१,२७७ मे. टन चाºयाची आवश्यकता आहे. अमरावती, बुलडाण्यात चा-याची तूट विभागातील दुष्काळी २८ तालुक्यांत २०,३५,७६४ पशुधन आहे. यासाठी जून २०१९ पर्यंत १९,४३,८८७ मे.टन चारा लागेल. मात्र, १९,५४,९१५ मे.टन चारा उपलब्ध होणार असल्याने ११,०२८ मे.टन चाºयाची तूट भासणार आहे. यामध्ये अकोला, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यात चाºयाची तूट बासणार नसली तरी अमरावती जिल्ह्यात १,००,५५६ मे.टन. व बुलडाणा जिल्ह्यात १,८३,५३० मे.टन चाºयाची तूट भासणार आहे.