शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

११० कोटींचा दुष्काळ मदतनिधी जिल्ह्यास प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 21:49 IST

गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या पाच तालुक्यासाठी एकूण २६९.६५ कोटी मागणीच्या तुलनेत शासनाने ११०.४४ कोटींच्या मदतनिधीस शासनाने २५ जानेवारीला प्रशासकीय मान्यता दिली व पहिल्या टप्प्याचे ५५.२२ कोटी उपलब्ध केले. त्याचे वाटप पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा व दुसऱ्या टप्प्यातील ५५.२२ कोटी जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्देमागणी २७० कोटींची : कमी पैसेवारीची १,०२० गावे डावलली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या पाच तालुक्यासाठी एकूण २६९.६५ कोटी मागणीच्या तुलनेत शासनाने ११०.४४ कोटींच्या मदतनिधीस शासनाने २५ जानेवारीला प्रशासकीय मान्यता दिली व पहिल्या टप्प्याचे ५५.२२ कोटी उपलब्ध केले. त्याचे वाटप पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा व दुसऱ्या टप्प्यातील ५५.२२ कोटी जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत.शासनाने पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला व नंतर १६ महसूल मंडळामध्ये दुष्काळसदृष्यस्थिती जाहीर केली. मात्र, या मंडळाला दुष्काळ निधीमधून डावलले. यंदा धारणी वगळता जिल्ह्यातील १८०५ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली. यापैकी १०२० गावांना या मदतनिधीपासून डावलले. कृषिपिकांचे ३३ टक्क््यांवर नुकसान झालेल्या क्षेत्रात दोन हेक्टर मर्यादेत दोन टप्प्यात मदतनिधीचे वाटप होत आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे हेक्टरी ६,८०० रुपयांच्या ५० टक्के म्हणजे ३४०० रुपये किंवा एक हजार रुपये, यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती रक्कम पहिल्या टप्प्यात वाटप केली जात आहे. बहुवार्षिक पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्यास हेक्टरी देय १८ हजार रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात नऊ हजार किंवा किमान दोन हजार, यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती प्रदान करण्यात येणार आहे.