शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

११० आदिवासींविरुद्ध चिखलदरा पोलिसात गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 19:03 IST

केलपाणी जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस, सीआरपीएफ, वनाधिकारी-कर्मचारी यांच्यावर हल्ला करणा-या ११० आदिवासींविरुद्ध सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत. 

चिखलदरा (अमरावती) - केलपाणी जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस, सीआरपीएफ, वनाधिकारी-कर्मचारी यांच्यावर हल्ला करणा-या ११० आदिवासींविरुद्ध सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत. पुनर्वसित आठ गावांतील आदिवासी गाव सोडून गाभा क्षेत्रातील मूळ गावी केलपानी येथे १५ जानेवारीपासून ठाण मांडून होते. त्यांना समजावण्यासाठी गेलेल्या वनाधिकारी-कर्मचारी, पोलीस, सीआरपीएफच्या जवानांवर त्यांनी काठ्या, कुºहाडी, कुकरी, मिरची पूड, काचकुहिरी टाकून अचानक हल्ला केला. यात वनविभागाचे ५० अधिकारी, कर्मचारी, सीआरपीएफ व पोलीस कर्मचारी गंभीर व किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश तायडे यांच्या फिर्यादीवरून ११० आदिवासींविरुद्ध हत्येचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा, मारहाण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, बीपी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर आठही गावांमध्ये असलेल्या पुनर्वसित आदिवासींमध्ये दहशत पसरली आहे. काही दिवस अटकेची कारवाई स्थगित असली तरी अधिकारी-कर्मचा-यांवर मोठ्या प्रमाणात झालेला हल्ला पाहता, त्यांना अटक केले जाणार आहे. गोळीबार नव्हे, अश्रुधुराच्या नळकांड्याआदिवासींनी अचानक शासकीय अधिकारी कर्मचा-यांवर हमला करताच  त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या असल्याचे  चिखलदराचे ठाणेदार आकाश शिंदे यांनी गुरुवारी पुन्हा स्पष्ट केले.  जखम पायाला कशी?अश्रुधुराच्या गनमधून हवेची दिशा पाहून वर फायर केले जाते. त्याचा आवाज होतो व सर्वत्र धूर पसरतो. असे असताना चंपालाल पेठेकर च्या पायाला अश्रुधुराचे नळकांडे कसे लागले, हे अजूनही अनुत्तरित आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र