शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

११९६ गावांत टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:34 IST

सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पावसामुळे यंदा जिल्ह्यातील १,१९६ गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा तहानला : १,४६३ उपाययोजनांची मात्रा, १८ कोटींचा खर्च प्रस्तावित

आॅनलाईन लोकमतअमरावती : सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पावसामुळे यंदा जिल्ह्यातील १,१९६ गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. यामध्ये १,४६३ उपाय योजनांवर जानेवारी ते जून २०१९ या कालावधीत १८ कोटी खर्च केले जाणार आहे. यंदा हजारांवर गावांत पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य जाणवणार, याची कल्पना असतानासुद्धा कृती आराखड्याला जिल्हा परिषदेने तब्बल दोन महिने दिरंगाई, यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार ठरला आहे.यंदाच्या पावसाळ्यात ८१४.५ मिमी सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्षात ५४८.१ मिमी पाऊस पडला. ही ६७ टक्केवारी आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाई जाणवणार, हे वास्तव जिल्हा परिषदेने गांभीर्याने घेतलेच नाही. निरीक्षण विहिरीतील पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जिल्ह्यात ५०० वर गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचेल, याविषयीचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने गत महिन्यात जिल्हा प्रशासनाला सादर केला होता. यावर फारसे गांभीर्याने न घेतल्यामुळे यंदा पाणीटंचाईच्या कृती आराखड्याला तब्बल दोन महिने उशिरा झाला. जिल्ह्याधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांनी दोन पत्र दिल्यानंतर जिल्हा परिषदेला जाग आली, हे उल्लेखनीय.जिल्हा प्रशासनाच्या आराखड्यानुसार जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत ७४२ गावांत ९०२ उपाययोजना करण्यात येईल. यावर ९ कोटी ९८ लाख ७४ हजारांना निधी खर्च होणार आहे तर एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत ४५४ गावांत ५६१ उपाययोजना प्रस्तावित आहेत, यावर ४ कोटी २ लाख ८० हजारांचा निधी खर्च होईल. जिल्हाधिकारी, सीईओ, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, ‘जीएसडीए’चे वरिष्ठ भूवैज्ञानिक आदींच्या संयुक्त नियोजनात हा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये पाणीटंचाईला सुरूवात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील नियोजनात २४८ गावांत २९८, तर तिसºया टप्प्यातील १३२ गावांत १३४ नवीन विंधन विहिरी व कुपनलिका तयार करण्यात येणार आहे. यावर तीन कोटी २२ लाखांचा निधी खर्च होणार आहे.जानेवारी ते मार्च दरम्यान ७४२ गावांना झळजानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत १४७ गावांत नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. यावर ४ कोटी १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ७४ गावांमध्ये तात्पुरत्या पूरक नळ योजनांचा घेण्यात येणार आहे यावर यावर दोन कोटी १२ लाखांचा खर्च होणार आहे. ५८ विंधन विहिरींची दुरूस्ती, १४ गावंमध्ये टँकर, १५१ गावांमध्ये १७६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यावर एक कोटींचा खर्च अपेक्षित आहे.एप्रिल ते जून दरम्यान ४५४ गावांमध्ये टंचाईएप्रिल ते जून या कालावधीत ६७ नळ योजनांची विशेष दुरूस्तीवर एक कोटी ८७ लाखांचा खर्च होणार आहे. ३ गावांमध्ये तात्पुरती नळ योजनेवर ९ लाख, १६ विंधन विहिंरीची दुरूस्ती, ३६ गावांत ३९ टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे, यावर १६ लाख, ९१ गावांत खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे, यावर ३१ लाखांचा खर्च होणार आहे. या अखेरच्या टप्प्यात ४५४ गावांत ५६१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यावर ४ कोटींचा खर्च होणार आहे.