शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

११९६ गावांत टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:34 IST

सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पावसामुळे यंदा जिल्ह्यातील १,१९६ गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा तहानला : १,४६३ उपाययोजनांची मात्रा, १८ कोटींचा खर्च प्रस्तावित

आॅनलाईन लोकमतअमरावती : सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पावसामुळे यंदा जिल्ह्यातील १,१९६ गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. यामध्ये १,४६३ उपाय योजनांवर जानेवारी ते जून २०१९ या कालावधीत १८ कोटी खर्च केले जाणार आहे. यंदा हजारांवर गावांत पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य जाणवणार, याची कल्पना असतानासुद्धा कृती आराखड्याला जिल्हा परिषदेने तब्बल दोन महिने दिरंगाई, यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार ठरला आहे.यंदाच्या पावसाळ्यात ८१४.५ मिमी सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्षात ५४८.१ मिमी पाऊस पडला. ही ६७ टक्केवारी आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाई जाणवणार, हे वास्तव जिल्हा परिषदेने गांभीर्याने घेतलेच नाही. निरीक्षण विहिरीतील पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जिल्ह्यात ५०० वर गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचेल, याविषयीचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने गत महिन्यात जिल्हा प्रशासनाला सादर केला होता. यावर फारसे गांभीर्याने न घेतल्यामुळे यंदा पाणीटंचाईच्या कृती आराखड्याला तब्बल दोन महिने उशिरा झाला. जिल्ह्याधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांनी दोन पत्र दिल्यानंतर जिल्हा परिषदेला जाग आली, हे उल्लेखनीय.जिल्हा प्रशासनाच्या आराखड्यानुसार जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत ७४२ गावांत ९०२ उपाययोजना करण्यात येईल. यावर ९ कोटी ९८ लाख ७४ हजारांना निधी खर्च होणार आहे तर एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत ४५४ गावांत ५६१ उपाययोजना प्रस्तावित आहेत, यावर ४ कोटी २ लाख ८० हजारांचा निधी खर्च होईल. जिल्हाधिकारी, सीईओ, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, ‘जीएसडीए’चे वरिष्ठ भूवैज्ञानिक आदींच्या संयुक्त नियोजनात हा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये पाणीटंचाईला सुरूवात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील नियोजनात २४८ गावांत २९८, तर तिसºया टप्प्यातील १३२ गावांत १३४ नवीन विंधन विहिरी व कुपनलिका तयार करण्यात येणार आहे. यावर तीन कोटी २२ लाखांचा निधी खर्च होणार आहे.जानेवारी ते मार्च दरम्यान ७४२ गावांना झळजानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत १४७ गावांत नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. यावर ४ कोटी १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ७४ गावांमध्ये तात्पुरत्या पूरक नळ योजनांचा घेण्यात येणार आहे यावर यावर दोन कोटी १२ लाखांचा खर्च होणार आहे. ५८ विंधन विहिरींची दुरूस्ती, १४ गावंमध्ये टँकर, १५१ गावांमध्ये १७६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यावर एक कोटींचा खर्च अपेक्षित आहे.एप्रिल ते जून दरम्यान ४५४ गावांमध्ये टंचाईएप्रिल ते जून या कालावधीत ६७ नळ योजनांची विशेष दुरूस्तीवर एक कोटी ८७ लाखांचा खर्च होणार आहे. ३ गावांमध्ये तात्पुरती नळ योजनेवर ९ लाख, १६ विंधन विहिंरीची दुरूस्ती, ३६ गावांत ३९ टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे, यावर १६ लाख, ९१ गावांत खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे, यावर ३१ लाखांचा खर्च होणार आहे. या अखेरच्या टप्प्यात ४५४ गावांत ५६१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यावर ४ कोटींचा खर्च होणार आहे.