शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

११९६ गावांत टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:34 IST

सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पावसामुळे यंदा जिल्ह्यातील १,१९६ गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा तहानला : १,४६३ उपाययोजनांची मात्रा, १८ कोटींचा खर्च प्रस्तावित

आॅनलाईन लोकमतअमरावती : सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पावसामुळे यंदा जिल्ह्यातील १,१९६ गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. यामध्ये १,४६३ उपाय योजनांवर जानेवारी ते जून २०१९ या कालावधीत १८ कोटी खर्च केले जाणार आहे. यंदा हजारांवर गावांत पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य जाणवणार, याची कल्पना असतानासुद्धा कृती आराखड्याला जिल्हा परिषदेने तब्बल दोन महिने दिरंगाई, यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार ठरला आहे.यंदाच्या पावसाळ्यात ८१४.५ मिमी सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्षात ५४८.१ मिमी पाऊस पडला. ही ६७ टक्केवारी आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाई जाणवणार, हे वास्तव जिल्हा परिषदेने गांभीर्याने घेतलेच नाही. निरीक्षण विहिरीतील पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जिल्ह्यात ५०० वर गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचेल, याविषयीचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने गत महिन्यात जिल्हा प्रशासनाला सादर केला होता. यावर फारसे गांभीर्याने न घेतल्यामुळे यंदा पाणीटंचाईच्या कृती आराखड्याला तब्बल दोन महिने उशिरा झाला. जिल्ह्याधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांनी दोन पत्र दिल्यानंतर जिल्हा परिषदेला जाग आली, हे उल्लेखनीय.जिल्हा प्रशासनाच्या आराखड्यानुसार जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत ७४२ गावांत ९०२ उपाययोजना करण्यात येईल. यावर ९ कोटी ९८ लाख ७४ हजारांना निधी खर्च होणार आहे तर एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत ४५४ गावांत ५६१ उपाययोजना प्रस्तावित आहेत, यावर ४ कोटी २ लाख ८० हजारांचा निधी खर्च होईल. जिल्हाधिकारी, सीईओ, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, ‘जीएसडीए’चे वरिष्ठ भूवैज्ञानिक आदींच्या संयुक्त नियोजनात हा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये पाणीटंचाईला सुरूवात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील नियोजनात २४८ गावांत २९८, तर तिसºया टप्प्यातील १३२ गावांत १३४ नवीन विंधन विहिरी व कुपनलिका तयार करण्यात येणार आहे. यावर तीन कोटी २२ लाखांचा निधी खर्च होणार आहे.जानेवारी ते मार्च दरम्यान ७४२ गावांना झळजानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत १४७ गावांत नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. यावर ४ कोटी १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ७४ गावांमध्ये तात्पुरत्या पूरक नळ योजनांचा घेण्यात येणार आहे यावर यावर दोन कोटी १२ लाखांचा खर्च होणार आहे. ५८ विंधन विहिरींची दुरूस्ती, १४ गावंमध्ये टँकर, १५१ गावांमध्ये १७६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यावर एक कोटींचा खर्च अपेक्षित आहे.एप्रिल ते जून दरम्यान ४५४ गावांमध्ये टंचाईएप्रिल ते जून या कालावधीत ६७ नळ योजनांची विशेष दुरूस्तीवर एक कोटी ८७ लाखांचा खर्च होणार आहे. ३ गावांमध्ये तात्पुरती नळ योजनेवर ९ लाख, १६ विंधन विहिंरीची दुरूस्ती, ३६ गावांत ३९ टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे, यावर १६ लाख, ९१ गावांत खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे, यावर ३१ लाखांचा खर्च होणार आहे. या अखेरच्या टप्प्यात ४५४ गावांत ५६१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यावर ४ कोटींचा खर्च होणार आहे.