शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

मेळघाटात २२ वर्षांत ११, ४३६ बालमृत्यू,  आदिवासी ‘मतदार’ नाहीत का?, खोज संघटनेनं पंतप्रधानांना पत्राद्वारे कळवली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 19:10 IST

आदिवासीबहुल भाग असलेल्या मेळघाटात १९९६ ते २०१७ या २२ वर्षांत ११ हजार ४३६ बालमृत्यू झाले आहेत. शासन, प्रशासनाच्या अनास्थेने ही बालमृत्यूची सरासरी वर्षाला ५१९ इतकी आहे. मातामृत्यूदेखील गंभीर बाब असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेतून मांडली आहे.

गणेश वासनिक/ अमरावती, दि. 31 - आदिवासीबहुल भाग असलेल्या मेळघाटात १९९६ ते २०१७ या २२ वर्षांत ११ हजार ४३६ बालमृत्यू झाले आहेत. शासन, प्रशासनाच्या अनास्थेने ही बालमृत्यूची सरासरी वर्षाला ५१९ इतकी आहे. मातामृत्यूदेखील गंभीर बाब असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेतून मांडली आहे. त्यामुळे आदिवासी ‘मतदार’ नाहीत काय, असा सवाल भोळ्या, भाबड्या आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे. मेळघाटातील ‘खोज’ संघटनेचे बंड्या साने, पुर्णिमा उपाध्याय व दशरथ बावनकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्राद्वारे आदिवासींच्या व्यथा मांडल्या आहेत. बालमृत्यू हे कुपोषणामुळे होत असल्याने मेळघाटातील प्रश्न, समस्या जाणून घेणे आणि उपाययोजना करण्यासाठी १९९३ पासून राज्यपाल, न्यायमूर्ती, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री ते विविध आघाड्यांवर काम करणाºया पुढाºयांनी दौरे करून आदिवासींना भेटी दिल्या आहेत. मात्र मेळघाटचे बालमृत्यू, मातामूत्यू ही समस्या ‘जैसे थे’ आहे. तसेही १९९३ पासून तर आजतागायत मेळघाटातील समस्या, प्रश्नांविषयी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर केवळ ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. परंतु जनहित याचिकेसाठी काम करणारे वकील कधीही मेळघाटात आले नाहीत, हे वास्तव आहे. कधीकाळी मेळघाटातील बालमृत्यूची न्यायालयात याचिका दाखल करून आदिवासींना न्याय मिळवून देण्याची भाषा करणारे वकील मात्र आज महाधिवक्ता झाले आहेत. कालपर्यंत विरोधी पक्षात असणारे नेते आज सत्ताधारी झाले आहेत. मेळघाटात देश आणि राज्य पातळीवरील नेते, न्यायाधीश, वकील, अधिकारी, संत-महंतांनी दौरे केले आहेत. परंतु बालमृत्यू नियंत्रणार्थ कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे महानुभावांचे हे दौरे केवळ निर्जिव ठरले आहेत. बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण दिवसागणिक वाढत असताना आदिवासी मुलांना मृत्युच्या दाढेत ढकलण्याचे कर्तव्य शासनकर्ते करीत आहेत. आदिवासींसाठी धोरण, उपाययोजना, बजेट किंवा निधीची तरतूद केली जात नाही, ही बाब आवर्जून विशद करण्यात आली आहे. मेळघाटात आरोग्य सुविधा, पोषण आहार, बालरोग तज्ञ्ज, रुग्णालयांची दैनावस्था, डॉक्टरांची वानवा, परिचारिका, अंगणवाड्यांची दुरवस्था अशा एक ना अनेक समस्या, प्रश्न कायम आहेत. माता व बालमृत्यू रोखण्यासाठी शासन, प्रशासनाने नियोजनबद्ध आराखडा तयार करणे काळाची गरज असून अन्यथा मृत्यूचे सत्र असेच सरू राहील, अशी कैफियत बंड्या साने, पुर्णिमा उपाध्याय यांनी पंतप्रधान मोदींकडे मांडली आहे.मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी शासन, प्रशासनाविरुद्ध अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र, नियोजनाअभावी कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्युचे सत्र थांबत नाही. त्यामुळे ही समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडवावी, यासाठी त्यांना थेट पत्र लिहिले आहे. - बंड्या साने, प्रमुख, ‘खोज’ संस्था मेळघाट