शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

आयकरदात्या ८६२८ शेतकऱ्यांकडून १०.४१ कोटी वसुलपात्र

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 16, 2023 16:39 IST

पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे जानेवारी २०१९ पासून दर चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केल्या होत आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या निकषात अपात्र असतांनाही जिल्ह्यात ८६२८ शेतकऱ्यांनी १०.४१ कोटींचा लाभ घेतला आहे. यासंदर्भात वारंवार सूचना दिल्यानंतरही रक्कम परत केली नसल्याने, ही रक्कम आता वसुलपात्र आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सात-बाऱ्यावर आता बोजा चढविला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे जानेवारी २०१९ पासून दर चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केल्या होत आहे. या योजनेमध्ये नोकरदार व आयकरदाते शेतकरी अपात्र असतांनाही ११,१७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यापैकी १०,४८० शेतकऱ्यांनी किमान एक हप्ताचा लाभ घेतला आहे. या योजनेत अपात्र शेतकऱ्यांनी १२.०७ कोटींचा लाभ घेतला आहे. योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीमध्ये ही बाब स्पष्ट झालेली आहे.

या आयकरदात्या लाभार्थ्यांपैकी १८५२ खातेदारांनी १.६६ कोटींची रक्कम शासनजमा केलेली आहे. तरिही ८६२८ लाभार्थ्यांकडे १०.४१ कोटींची रक्कम वसुलपात्र आहे. या खातेदारांना प्रशासकीय यंत्रणांद्वारा वारंवार सूचना पत्र देण्यात आल्यानंतरही या खातेदारांनी अद्याप रक्कम शासनजमा केलेली नाही. त्यामुळे शासनाद्वारा रक्कम वसुलीची कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी