शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडलेले 104 प्रकल्प ‘बळीराजा नवसंजीवनी’च्या कक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 16:30 IST

राज्यात निधीअभावी रखडलेले २१ मुख्य व ८३ लघु अशा एकूण १०४ प्रकल्पांची कामे आता शासनाच्या ‘बळीराजा नवसंजीवनी’ या नव्या योजनेंतर्गत पूर्ण होणार आहेत.

- गजानन मोहोडअमरावती- राज्यात निधीअभावी रखडलेले २१ मुख्य व ८३ लघु अशा एकूण १०४ प्रकल्पांची कामे आता शासनाच्या ‘बळीराजा नवसंजीवनी’ या नव्या योजनेंतर्गत पूर्ण होणार आहेत. यासाठी ६ हजार ५९१ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. या प्रकल्पांसाठीच्या निधीच्या २५ टक्के म्हणजेच १ हजार ६४७ कोटी रुपयांचा निधी केंद्र शासन देणार आहे, तर उर्वरित निधी नाबार्डच्या माध्यमातून केंद्र शासनच कर्जस्वरूपात उपलब्ध करणार आहे.

राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळप्रवण १४ जिल्ह्यांतील प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. त्यात विदर्भात रखडलेल्या ८१ प्रकल्पांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३,८३६ कोटींचा निधी आवश्यक आहे. यातील ९५९ कोटी केंद्र शासन देणार आहे व उर्वरित २,८७७ कोटी केंद्र शासनच नाबार्डकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध करणार आहे. यामुळे विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर होऊन १ लाख ६ हजार ३२९ हेक्टरने सिंचनक्षेत्र वाढेल. ही विदर्भासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

जलसिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १४ जिल्ह्यांमध्ये अर्धवट स्थितीत असलेल्या या १०४ प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यावर १ लाख ४० हजार ३५ हेक्टरने सिंचन क्षेत्रवाढ होणार आहे. यामध्ये मराठवाड्यातील सात जिल्ह्यांत ३९ हजार ७०६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. यासोबतच १,८८१.७३ दलघमी पाण्याच्या साठ्यातदेखील वाढ होणार आहे. यामुळे कमी पावसाच्या विदर्भ व मराठवाड्यातील जलस्तरदेखील उंचावणार आहे. या विषयीचा प्रस्ताव राज्य शासनाने ३१ मे २०१६ रोजी केंद्राच्या जलसंधारण विभागाला पाठविला, मात्र सचिव पातळीवरच रखडला होता. यामधील मुख्य २१ प्रस्तावांना केंद्रीय जल आयोग व नीती आयोगाची परवानगी बाकी होती. आता मात्र या मंत्रालयाचा कारभार नितीन गडकरी यांच्याकडे असल्यामुळे बळीराजा नवसंजीवनी योजनेने विदर्भ व मराठवाड्याला खऱ्या अर्थाने संजीवनी मिळणार आहे.

जिल्हानिहाय सिंचन क्षमता वाढ* जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार विदर्भात १ लाख ६ हजार ३२९ सिंचनक्षेत्र वाढणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४२ हजार ४३० हेक्टर, अकोला २९ हजार ६१५, वाशिम ११ हजार ७५, यवतमाळ १३ हजार ६४९, बुलडाणा ५ हजार ४२४ व वर्धा ४ हजार ४२४ हेक्टर सिंचन क्षेत्रवाढ प्रस्तावित आहे.

* मराठवाड्यात या प्रकल्पानंतर ३९ हजार ७०६ हेक्टर सिंचन क्षेत्रवाढ होणार आहे. यामध्ये औरंगाबाद १६ हजार ९६६ हेक्टर, जालना ४ हजार २८५, परभणी २ हजार १००, नांदेड ७ हजार ७७८, लातूर ६ हजार ३५०, उस्मानाबाद १ हजार ७८५ व बीड जिल्ह्यात ४४२ हेक्टर सिंचन क्षेत्रवाढ प्रस्तावित आहे.

शेतकरी आत्महत्याप्रवण व दुष्काळबाधित १४ जिल्ह्यांसाठी शासनाचे हे  पॅकेज आहे. २५ टक्के निधी केंद्राचा व उर्वरित निधीदेखील केंद्र शासनाच्या माध्यमातून नाबार्ड कर्जरूपात देणार आहे. यामुळे सिंचनाचा अनुशेष कमी होईल.- प्रवीण पोटे, बांधकाम, उद्योग राज्यमंत्री