शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्ध्व वर्धात १०० टक्के जलसाठा

By admin | Updated: September 15, 2015 00:06 IST

जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी दिली असली तरी मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने पाण्याचा येवा वाढला.

अमरावती : जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी दिली असली तरी मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने पाण्याचा येवा वाढला. त्यामुळे सोमवारी उर्ध्व वर्धा धरणात १०० टक्के जलसाठ्याची नोंद झाली. प्रकल्प पूर्ण भरल्याने अमरावती शहरासह १०० गावांच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे. तसेच मोर्शी, तिवसा, चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यामध्ये रबीच्या पिकांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. जिल्ह्यात एकमेव मुख्य प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व वर्धा धरणाची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त जलसाठा ५६४.०५ दलघमी इतका असून पूर्ण संचयन पातळी ३४२.५० मीटर आहे. या तुलनेत १४ सप्टेंबर रोजी ३४२.५० मीटर जलसाठा आहे. हा जलसाठा ५६४.०५ दलघमी इता म्हणजेच १०० टक्के आहे. जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी शहानूर प्रकल्पातील प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त जलसाठा ४६.०४ दलघमी असून पूर्णसंचय पातळी ४४९.५० मीटर आहे. त्या तुलनेत ४४७.०३ मीटर आजचा जलसाठा आहे. हा उपयुक्त जलसाठा ३९.१९ दलघमी असून याची टक्केवारी ८५.१२ इतकी आहे. चंद्रभागा प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त जलसाठा ४१.२५ दलघमी आहे व पूर्णसंचय पातळी ५०६.२० मीटर आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत ५०३.४५. मीटर स्थिती जलाशयाची आहे. हा उपयुक्त जलसाठा ३२.९६ दलघमी इतका असून हा जलसाठा ७९.९० टक्के जलसाठा असल्याची नोंद आहे. ९६ तासांत जोरदार पावसाची शक्यताकोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात येत्या ९६ तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विदर्भात १५ सप्टेंबरपासून ९६ तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३५ दिवसांच्या प्रदीर्घ खंडानंतरही पाऊस पडल्यास शेतीपिकांना संजीवनी मिळणार आहे.