शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

ऊर्ध्व वर्धात १०० टक्के जलसाठा

By admin | Updated: September 15, 2015 00:06 IST

जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी दिली असली तरी मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने पाण्याचा येवा वाढला.

अमरावती : जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी दिली असली तरी मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने पाण्याचा येवा वाढला. त्यामुळे सोमवारी उर्ध्व वर्धा धरणात १०० टक्के जलसाठ्याची नोंद झाली. प्रकल्प पूर्ण भरल्याने अमरावती शहरासह १०० गावांच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे. तसेच मोर्शी, तिवसा, चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यामध्ये रबीच्या पिकांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. जिल्ह्यात एकमेव मुख्य प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व वर्धा धरणाची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त जलसाठा ५६४.०५ दलघमी इतका असून पूर्ण संचयन पातळी ३४२.५० मीटर आहे. या तुलनेत १४ सप्टेंबर रोजी ३४२.५० मीटर जलसाठा आहे. हा जलसाठा ५६४.०५ दलघमी इता म्हणजेच १०० टक्के आहे. जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी शहानूर प्रकल्पातील प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त जलसाठा ४६.०४ दलघमी असून पूर्णसंचय पातळी ४४९.५० मीटर आहे. त्या तुलनेत ४४७.०३ मीटर आजचा जलसाठा आहे. हा उपयुक्त जलसाठा ३९.१९ दलघमी असून याची टक्केवारी ८५.१२ इतकी आहे. चंद्रभागा प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त जलसाठा ४१.२५ दलघमी आहे व पूर्णसंचय पातळी ५०६.२० मीटर आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत ५०३.४५. मीटर स्थिती जलाशयाची आहे. हा उपयुक्त जलसाठा ३२.९६ दलघमी इतका असून हा जलसाठा ७९.९० टक्के जलसाठा असल्याची नोंद आहे. ९६ तासांत जोरदार पावसाची शक्यताकोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात येत्या ९६ तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विदर्भात १५ सप्टेंबरपासून ९६ तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३५ दिवसांच्या प्रदीर्घ खंडानंतरही पाऊस पडल्यास शेतीपिकांना संजीवनी मिळणार आहे.