शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

जिल्ह्यातील १०० गावे तंटामुक्त

By admin | Updated: March 22, 2015 01:24 IST

तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील एकूण १०० गावे तंटामुक्त म्हणून राज्य शासनाने जाहीर केले.

रोहितप्रसाद तिवारी  मोर्शीतंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील एकूण १०० गावे तंटामुक्त म्हणून राज्य शासनाने जाहीर केले. धारणी तालुक्यातील सर्वाधिक २६ तर सर्वात कमी धामणगाव रेल्वे आणि भातकुली तालुक्यातील प्रत्येकी एका गावाला तंटामुक्तीचा मान मिळाला आहे. तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या कल्पनेतून राज्यात तंटामुक्त गाव मोहीम राबविली जात आहे. गाव तंटामुक्त होण्याकरिता गावागावांत सर्वसमावेशक, राजकारण विरहीत तंटामुक्त गाव समितीची स्थापना केली जाते. गावात तंटे होऊ नये, झालेच तर ते तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून आपसात सोडविले जावेत, शिवाय गावात सलोखा निर्माण व्हावा, महिलांचे, अपंगांचे, मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यात यावे, अवैध धंद्यांवर अंकुश लावून या धंद्यात गुंतलेल्यांना तंटामुक्त गाव समितीच्या प्रयत्नातून पर्यायी रोजगार मिळावा, अतिक्रमण होऊ नये, अंधश्रध्दा निर्मूलन तथा वाईट प्रथा बंद व्हाव्यात इत्यादी उपक्रम तंटामुक्त गाव समितीच्या मार्फत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्हावेत, अशी ही संकल्पना आहे. तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून वर्षभर राबविलेल्या उपक्रमांनंतर तंटामुक्त गावांनी स्वमूल्यांकन करुन गाव तंटामुक्त झाल्याचे जाहीर केल्यावर जिल्हा अंतर्गत मूल्यमापन समिती या गावांना भेटी देऊन त्यांच्या कार्यांचे मूल्यांकन करते, जिल्ह्यांतर्गत समितीने संबंधित गाव निवडल्यावर जिल्हाबाह्य मूल्यांकन समिती भेट देऊन मूल्यांकन करते आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामार्फत गावांची यादी गृहमंत्रालयास पाठविण्यात येऊन राज्य शासन अशा गावांची तंटामुक्त गाव म्हणून घोषणा करते. नुकतेच राज्य शासनाने सन २०१३-१४ च्या राज्यातील निवड झालेल्या तंटामुक्त गावांची यादी, त्यांना मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेसह जाहीर केली. एकूण १७ कोटी १३ लक्ष २५ हजार रुपयाचे बक्षीस राज्यातील अशा गावांना मिळणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १०० गावांची निवड तंटामुक्त गाव म्हणून राज्य शासनाने केली आहे. यात दर्यापूर तालुक्यातील ८, अंजनगाव तालुक्यातील ४, चांदूर बाजार १७, वरुड, मोर्शी आणि चिखलदरा प्रत्येकी ९, तिवसा ६, चांदूर रेल्वे ५, नांदगाव खंडेश्वर ३, भातकुली आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी १, अमरावती २, आणि धारणी तालुक्यातील जिल्ह्यातून सर्वाधिक एकूण २६ गावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.