शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
3
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
4
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
5
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
7
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
8
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
9
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
10
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
11
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
12
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
13
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
14
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
15
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
16
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
17
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
18
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
19
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
20
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

जिल्ह्यातील १०० गावे तंटामुक्त

By admin | Updated: March 22, 2015 01:24 IST

तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील एकूण १०० गावे तंटामुक्त म्हणून राज्य शासनाने जाहीर केले.

रोहितप्रसाद तिवारी  मोर्शीतंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील एकूण १०० गावे तंटामुक्त म्हणून राज्य शासनाने जाहीर केले. धारणी तालुक्यातील सर्वाधिक २६ तर सर्वात कमी धामणगाव रेल्वे आणि भातकुली तालुक्यातील प्रत्येकी एका गावाला तंटामुक्तीचा मान मिळाला आहे. तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या कल्पनेतून राज्यात तंटामुक्त गाव मोहीम राबविली जात आहे. गाव तंटामुक्त होण्याकरिता गावागावांत सर्वसमावेशक, राजकारण विरहीत तंटामुक्त गाव समितीची स्थापना केली जाते. गावात तंटे होऊ नये, झालेच तर ते तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून आपसात सोडविले जावेत, शिवाय गावात सलोखा निर्माण व्हावा, महिलांचे, अपंगांचे, मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यात यावे, अवैध धंद्यांवर अंकुश लावून या धंद्यात गुंतलेल्यांना तंटामुक्त गाव समितीच्या प्रयत्नातून पर्यायी रोजगार मिळावा, अतिक्रमण होऊ नये, अंधश्रध्दा निर्मूलन तथा वाईट प्रथा बंद व्हाव्यात इत्यादी उपक्रम तंटामुक्त गाव समितीच्या मार्फत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्हावेत, अशी ही संकल्पना आहे. तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून वर्षभर राबविलेल्या उपक्रमांनंतर तंटामुक्त गावांनी स्वमूल्यांकन करुन गाव तंटामुक्त झाल्याचे जाहीर केल्यावर जिल्हा अंतर्गत मूल्यमापन समिती या गावांना भेटी देऊन त्यांच्या कार्यांचे मूल्यांकन करते, जिल्ह्यांतर्गत समितीने संबंधित गाव निवडल्यावर जिल्हाबाह्य मूल्यांकन समिती भेट देऊन मूल्यांकन करते आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामार्फत गावांची यादी गृहमंत्रालयास पाठविण्यात येऊन राज्य शासन अशा गावांची तंटामुक्त गाव म्हणून घोषणा करते. नुकतेच राज्य शासनाने सन २०१३-१४ च्या राज्यातील निवड झालेल्या तंटामुक्त गावांची यादी, त्यांना मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेसह जाहीर केली. एकूण १७ कोटी १३ लक्ष २५ हजार रुपयाचे बक्षीस राज्यातील अशा गावांना मिळणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १०० गावांची निवड तंटामुक्त गाव म्हणून राज्य शासनाने केली आहे. यात दर्यापूर तालुक्यातील ८, अंजनगाव तालुक्यातील ४, चांदूर बाजार १७, वरुड, मोर्शी आणि चिखलदरा प्रत्येकी ९, तिवसा ६, चांदूर रेल्वे ५, नांदगाव खंडेश्वर ३, भातकुली आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी १, अमरावती २, आणि धारणी तालुक्यातील जिल्ह्यातून सर्वाधिक एकूण २६ गावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.