शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

१०० कोटींच्या फायली अभियंत्याविना रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:21 IST

महापालिकेतील सर्वाधिक महत्त्वाच्या बांधकाम विभागाला तीन प्रमुख अभियंते कुठून द्यायचे, असा प्रश्न महापालिका आयुक्तांना पडला आहे. सरकार प्रतिनियुक्तीचा अभियंता देत नाही आणि महापालिकेत त्या पदासाठी कुणी पात्र नाही, अशा अजब विवंचनेत प्रशासनप्रमुख अडकले आहेत.

ठळक मुद्देबांधकाम विभाग बेवारस पदभाराचा प्रश्न अनुत्तरित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेतील सर्वाधिक महत्त्वाच्या बांधकाम विभागाला तीन प्रमुख अभियंते कुठून द्यायचे, असा प्रश्न महापालिका आयुक्तांना पडला आहे. सरकार प्रतिनियुक्तीचा अभियंता देत नाही आणि महापालिकेत त्या पदासाठी कुणी पात्र नाही, अशा अजब विवंचनेत प्रशासनप्रमुख अडकले आहेत. त्यामुळे शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याचा चार्ज कुणाकडे, हा प्रश्न तूर्तास अनुत्तरित आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या तीनही शाखेमध्ये सुमारे १०० कोटींच्या फायली स्वाक्षरीविना रखडल्या आहेत.जीवन सदार यांच्या कंत्राटी कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर सेवानिवृत्त अभियंता अनंत पोतदार यांच्याकडे तीनही पदांचा कार्यभार देण्यात आला. मात्र, पोतदार यांनी चार दिवसांपूर्वीच पत्र लिहून ते महापालिकेत काम करण्यास असमर्थ असल्याचे कळविले आहे. त्यामुळे प्रशासनाने शहर अभियंता, कार्यकारी अभियंता १ व २ ची चाचपणी चालविली आहे.तूर्तास जे अभियंते कार्यरत आहेत, त्यापैकी कुणीही या तीन महत्त्वपूर्ण पदावर बसण्यासाठी पात्र नाहीत. दुसरीकडे पदोन्नतीने पदस्थापना दिल्यास दोघांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे तीनही पदांचा चार्ज द्यायचा तरी कुणाला, या प्रश्नाचे उत्तर तुर्तास जीएडीसह आयुक्तांकडेही नाही. भास्कर तिरपुडे, सुहास चव्हाण आणि रवींद्र पवार या तिघांची नावे जीएडीने प्रस्तावित केलीत. मात्र, पदोन्नतीच्या रांगेत न्यायालयीन प्रकरणाचा अडसर आहे. रवींद्र पवार हे यापूर्वी कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असताना, दोनदा निलंबित झाले आहेत. रमाई घरकुल योजनेच्या कासवगतीने ते आमसभेच्या केंद्रस्थानी ठरले. पवार पदोन्नतीसाठी पात्र असले तरी ते शहर वा कार्यकारी अभियंता पदाला न्याय देऊ शकणार नाहीत, असे सार्वत्रिक मत आहे. त्यामुळे मध्यम मार्ग कसा काढायचा, यावर प्रशासनाच्या पातळीवर चिंतन सुरू आहे.ही कामे रखडलीपंतप्रधान आवास योजनेतील घटक क्रमांक ३, घटक क्रमांक ४ मधील ८६० घरबांधणीचा ७० कोटींचा करारनामा, डीपीसीतील निविदांवर शिक्कामोर्तब, वॉर्डविकास निधीमधील काम, छत्री तलावाचे सौंदर्यीकरण, स्टॉर्म वॉटर ट्रेनेज प्रकल्प, नगरोत्थान योजनेसह सुमारे १०० ते १२५ कोटी प्रकल्प किंमत असणाऱ्या कामांच्या फायली शहर व कार्यकारी अभियंत्यांच्या स्वाक्षरीविना अडल्या आहेत. याशिवाय महिलांची प्रसाधनगृहे, हरित क्षेत्र विकास प्रकल्पाला ब्रेक लागला आहे.प्रतिनियुक्तीच्या अभियंत्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे मागणी करण्यात आली आहे. या आठवड्यात नियुक्ती झाल्यास प्रश्न सुटेल.- संजय निपाणे, आयुक्त