शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चार दिवसांत अतिवृष्टीचे १० बळी, २.२६ लाख हेक्टर बाधित

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 6, 2024 18:32 IST

पावसाने नुकसान : २०३ जनावरांचा मृत्यू, ९२९ घरांची पडझड

गजानन मोहोड

अमरावती : चार दिवसांतील मुसळधार पाऊस व अतिवृष्टी यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात १० व्यक्ती वाहून गेल्या व लहानमोठे २०३ पशुधन मृत झाले. पुराच्या पाणी शेतात शिरल्याने, शेतात तलाव साचल्याने व बांध फुटल्यानेही २.२६ लाख हेक्टरमधील कपाशी, तूर व सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्तांचा अहवाल आहे. या आपत्तीमध्ये पश्चिम विदर्भात ३३ तालुक्यांतील १६१७ गावे बाधित झालेली आहेत.

विभागामध्ये ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात १४ तालुके, बुलडाणा ३ व वाशिम जिल्ह्यात १ अशा २० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. शिवाय कित्येक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात ११२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे.या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना आलेल्या पुरात अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यांत प्रत्येकी २, बुलडाणा ३ व वाशिम जिल्ह्यात १ अशा १० व्यक्ती पुरात वाहून गेल्याने मृत झाल्या आहेत. शिवाय ३५ मोठे व १६८ लहान अशा २०३ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात ६६५, वाशिम १५६, अकोला ८२ व बुलडाणा जिल्ह्यात २६ घरांची पडझड झालेली आहे.

पुराने शेती खरडली, शेतांचे झाले तलावचार दिवसांतील मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे २,२६,०६६ हेक्टरमधील कपाशी, तूर व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात १,७१,६०६ हेक्टर, अकोला ४१,८८०, बुलडाणा ११,६००, अमरावती ५५७ व वाशिम जिल्ह्यात ४०७ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. शासनादेशानुसार अतिवृष्टीने बाधित पिकांचे सर्वेक्षण कृषी व महसूल यंत्रणांद्वारा करण्यात येत आहे.

टॅग्स :floodपूरfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती