शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

चार दिवसांत अतिवृष्टीचे १० बळी, २.२६ लाख हेक्टर बाधित

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 6, 2024 18:32 IST

पावसाने नुकसान : २०३ जनावरांचा मृत्यू, ९२९ घरांची पडझड

गजानन मोहोड

अमरावती : चार दिवसांतील मुसळधार पाऊस व अतिवृष्टी यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात १० व्यक्ती वाहून गेल्या व लहानमोठे २०३ पशुधन मृत झाले. पुराच्या पाणी शेतात शिरल्याने, शेतात तलाव साचल्याने व बांध फुटल्यानेही २.२६ लाख हेक्टरमधील कपाशी, तूर व सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्तांचा अहवाल आहे. या आपत्तीमध्ये पश्चिम विदर्भात ३३ तालुक्यांतील १६१७ गावे बाधित झालेली आहेत.

विभागामध्ये ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात १४ तालुके, बुलडाणा ३ व वाशिम जिल्ह्यात १ अशा २० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. शिवाय कित्येक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात ११२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे.या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना आलेल्या पुरात अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यांत प्रत्येकी २, बुलडाणा ३ व वाशिम जिल्ह्यात १ अशा १० व्यक्ती पुरात वाहून गेल्याने मृत झाल्या आहेत. शिवाय ३५ मोठे व १६८ लहान अशा २०३ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात ६६५, वाशिम १५६, अकोला ८२ व बुलडाणा जिल्ह्यात २६ घरांची पडझड झालेली आहे.

पुराने शेती खरडली, शेतांचे झाले तलावचार दिवसांतील मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे २,२६,०६६ हेक्टरमधील कपाशी, तूर व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात १,७१,६०६ हेक्टर, अकोला ४१,८८०, बुलडाणा ११,६००, अमरावती ५५७ व वाशिम जिल्ह्यात ४०७ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. शासनादेशानुसार अतिवृष्टीने बाधित पिकांचे सर्वेक्षण कृषी व महसूल यंत्रणांद्वारा करण्यात येत आहे.

टॅग्स :floodपूरfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती