शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

चार दिवसांत अतिवृष्टीचे १० बळी, २.२६ लाख हेक्टर बाधित

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 6, 2024 18:32 IST

पावसाने नुकसान : २०३ जनावरांचा मृत्यू, ९२९ घरांची पडझड

गजानन मोहोड

अमरावती : चार दिवसांतील मुसळधार पाऊस व अतिवृष्टी यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात १० व्यक्ती वाहून गेल्या व लहानमोठे २०३ पशुधन मृत झाले. पुराच्या पाणी शेतात शिरल्याने, शेतात तलाव साचल्याने व बांध फुटल्यानेही २.२६ लाख हेक्टरमधील कपाशी, तूर व सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्तांचा अहवाल आहे. या आपत्तीमध्ये पश्चिम विदर्भात ३३ तालुक्यांतील १६१७ गावे बाधित झालेली आहेत.

विभागामध्ये ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात १४ तालुके, बुलडाणा ३ व वाशिम जिल्ह्यात १ अशा २० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. शिवाय कित्येक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात ११२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे.या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना आलेल्या पुरात अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यांत प्रत्येकी २, बुलडाणा ३ व वाशिम जिल्ह्यात १ अशा १० व्यक्ती पुरात वाहून गेल्याने मृत झाल्या आहेत. शिवाय ३५ मोठे व १६८ लहान अशा २०३ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात ६६५, वाशिम १५६, अकोला ८२ व बुलडाणा जिल्ह्यात २६ घरांची पडझड झालेली आहे.

पुराने शेती खरडली, शेतांचे झाले तलावचार दिवसांतील मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे २,२६,०६६ हेक्टरमधील कपाशी, तूर व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात १,७१,६०६ हेक्टर, अकोला ४१,८८०, बुलडाणा ११,६००, अमरावती ५५७ व वाशिम जिल्ह्यात ४०७ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. शासनादेशानुसार अतिवृष्टीने बाधित पिकांचे सर्वेक्षण कृषी व महसूल यंत्रणांद्वारा करण्यात येत आहे.

टॅग्स :floodपूरfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती