शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

१० हजार वीज जोडण्या प्रलंबित

By admin | Updated: May 15, 2016 00:10 IST

शेतीचे क्षेत्र सिंचित करण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी पावले उचलल्याचे आश्वासन दिले जात आहे.

महावितरणची धिमी गती : शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढअमरावती : शेतीचे क्षेत्र सिंचित करण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी पावले उचलल्याचे आश्वासन दिले जात आहे. परंतु प्रत्यक्षात सिंचित क्षेत्रासाठी वीज जोडणी मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतरही वर्षानुवर्षे वाट पहावी लागत आहे. मागील वर्षात वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्यांपैकी तब्बल १० हजार ७१२ शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहेत. दरवर्षी महावितरणकडून धीम्या गतीने होत असलेल्या वीज जोडणीमुळे यंदाही अर्जदार शेतकऱ्यांना वीजजोडणी मिळेल, याची शाश्वती नसल्याची स्थिती आहे. दुष्काळातही सिंचन सुविधा असतानाही कृषी पंपाकरिता वीज जोडणी मिळविण्यात येत असलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांसमोर पीक वाचविण्याचे आवाहन उभे ठाकले आहे. महावितरण सकारात्मक धोरण ठेवत यासंदर्भातील अडसर दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी उत्पादकता वाढ व प्रयोगशीलता जपण्याचे आवाहन एकीकडे शासनाकडून होत असताना शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना मात्र दुसरीकडे खीळ घालण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. जिल्ह्यासह राज्यात ३१ मार्च २०१५ पर्यंत महावितरणकडे ३८ लाख १२ हजार ६९८ कृषीपंप ग्राहक आहेत. यापैकी मागील वर्षी एक लाख १० हजार ४६ कृषिपंपाला वीजजोडणी देण्यात आली. सुरक्षा अनामत भरून वीजजोडणीसाठी १ लाख ७३ हजार ७५२ अर्ज प्रलंबित आहेत. मात्र त्यानंतरही कृषिपंपांचा अनुरोष कायम असल्याने तो दूर करण्याची मागणी होत आहे. सध्या महावितरणच्या नियमानुसार तीन एचपीच्या वीज कनेक्शनच्या एक ते पाच खांबांसाठी पोल महावितरण पाच हजार १०० रुपये घेते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार आठ दिवसांत वीज कनेक्शन देणे बंधनकारक आहे. परंतु सध्या या सर्व गोष्टीला महावितरणकडून दुजोरा दिला असून वीजजोडणीसाठी शेतकऱ्यांचा महावितरणच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)