शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

१० हजार वीज जोडण्या प्रलंबित

By admin | Updated: May 15, 2016 00:10 IST

शेतीचे क्षेत्र सिंचित करण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी पावले उचलल्याचे आश्वासन दिले जात आहे.

महावितरणची धिमी गती : शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढअमरावती : शेतीचे क्षेत्र सिंचित करण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी पावले उचलल्याचे आश्वासन दिले जात आहे. परंतु प्रत्यक्षात सिंचित क्षेत्रासाठी वीज जोडणी मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतरही वर्षानुवर्षे वाट पहावी लागत आहे. मागील वर्षात वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्यांपैकी तब्बल १० हजार ७१२ शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहेत. दरवर्षी महावितरणकडून धीम्या गतीने होत असलेल्या वीज जोडणीमुळे यंदाही अर्जदार शेतकऱ्यांना वीजजोडणी मिळेल, याची शाश्वती नसल्याची स्थिती आहे. दुष्काळातही सिंचन सुविधा असतानाही कृषी पंपाकरिता वीज जोडणी मिळविण्यात येत असलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांसमोर पीक वाचविण्याचे आवाहन उभे ठाकले आहे. महावितरण सकारात्मक धोरण ठेवत यासंदर्भातील अडसर दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी उत्पादकता वाढ व प्रयोगशीलता जपण्याचे आवाहन एकीकडे शासनाकडून होत असताना शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना मात्र दुसरीकडे खीळ घालण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. जिल्ह्यासह राज्यात ३१ मार्च २०१५ पर्यंत महावितरणकडे ३८ लाख १२ हजार ६९८ कृषीपंप ग्राहक आहेत. यापैकी मागील वर्षी एक लाख १० हजार ४६ कृषिपंपाला वीजजोडणी देण्यात आली. सुरक्षा अनामत भरून वीजजोडणीसाठी १ लाख ७३ हजार ७५२ अर्ज प्रलंबित आहेत. मात्र त्यानंतरही कृषिपंपांचा अनुरोष कायम असल्याने तो दूर करण्याची मागणी होत आहे. सध्या महावितरणच्या नियमानुसार तीन एचपीच्या वीज कनेक्शनच्या एक ते पाच खांबांसाठी पोल महावितरण पाच हजार १०० रुपये घेते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार आठ दिवसांत वीज कनेक्शन देणे बंधनकारक आहे. परंतु सध्या या सर्व गोष्टीला महावितरणकडून दुजोरा दिला असून वीजजोडणीसाठी शेतकऱ्यांचा महावितरणच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)