शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
4
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
5
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
6
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
7
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
8
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
9
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
10
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
11
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
12
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
13
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
14
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
15
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
16
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
17
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
18
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
19
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
20
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा

१० हजार वीज जोडण्या प्रलंबित

By admin | Updated: May 15, 2016 00:10 IST

शेतीचे क्षेत्र सिंचित करण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी पावले उचलल्याचे आश्वासन दिले जात आहे.

महावितरणची धिमी गती : शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढअमरावती : शेतीचे क्षेत्र सिंचित करण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी पावले उचलल्याचे आश्वासन दिले जात आहे. परंतु प्रत्यक्षात सिंचित क्षेत्रासाठी वीज जोडणी मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतरही वर्षानुवर्षे वाट पहावी लागत आहे. मागील वर्षात वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्यांपैकी तब्बल १० हजार ७१२ शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहेत. दरवर्षी महावितरणकडून धीम्या गतीने होत असलेल्या वीज जोडणीमुळे यंदाही अर्जदार शेतकऱ्यांना वीजजोडणी मिळेल, याची शाश्वती नसल्याची स्थिती आहे. दुष्काळातही सिंचन सुविधा असतानाही कृषी पंपाकरिता वीज जोडणी मिळविण्यात येत असलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांसमोर पीक वाचविण्याचे आवाहन उभे ठाकले आहे. महावितरण सकारात्मक धोरण ठेवत यासंदर्भातील अडसर दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी उत्पादकता वाढ व प्रयोगशीलता जपण्याचे आवाहन एकीकडे शासनाकडून होत असताना शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना मात्र दुसरीकडे खीळ घालण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. जिल्ह्यासह राज्यात ३१ मार्च २०१५ पर्यंत महावितरणकडे ३८ लाख १२ हजार ६९८ कृषीपंप ग्राहक आहेत. यापैकी मागील वर्षी एक लाख १० हजार ४६ कृषिपंपाला वीजजोडणी देण्यात आली. सुरक्षा अनामत भरून वीजजोडणीसाठी १ लाख ७३ हजार ७५२ अर्ज प्रलंबित आहेत. मात्र त्यानंतरही कृषिपंपांचा अनुरोष कायम असल्याने तो दूर करण्याची मागणी होत आहे. सध्या महावितरणच्या नियमानुसार तीन एचपीच्या वीज कनेक्शनच्या एक ते पाच खांबांसाठी पोल महावितरण पाच हजार १०० रुपये घेते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार आठ दिवसांत वीज कनेक्शन देणे बंधनकारक आहे. परंतु सध्या या सर्व गोष्टीला महावितरणकडून दुजोरा दिला असून वीजजोडणीसाठी शेतकऱ्यांचा महावितरणच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)